Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, २९ ऑक्टोबर, २०२३

28 ऑक्टोबर-दैनंदिन शालेय परिपाठ

 २८   ऑक्टोबर-दैनंदिन शालेय परिपाठ



→ प्रार्थना

 सुखी ठेवी सर्वांस देवराया... 

 

 → श्लोक

   जन्माला देह पोशिला सुखाचा । काय भरंवसा याचा आहे ।। येकलेंचि यावे येकलेंचि जावे। हेचि अनुभवावे आपणाची || कोण हे आघवे सुखाचे संगती । अंतकाळी होती पाठीमोरे ।। चोखा म्हणे याचा न धरी भरवंसा । शरण जा सर्वेशा विठोबाशी ।।संत-चोखामेळा  

 जन्माला आलेल्या मानवी देहाचे सुखाने पालन पोषण केले. पण या मानवी देहाची काहीही शक्ती नाही. या जगामध्ये एकट्यालाच यावे ला आणि एकट्यालाच जावे लागते. याचा अनुभव आपणच घ्यावा. या ठिकाणी सर्वजण सुखाचे सोबती असतात. मरणाच्या वेळी कोणीही सोबत न सर्व सोडून जातात. चोखोबा म्हणतात, या ठिकाणच्या सगे सोयऱ्यांवर विश्वास धरू नकोस. सर्व कर्ता, करविता, 'विठोबा' आहे. त्याला शरण बाब 

 

→ चिंतन

 योग्य माणसाला जर एखादी कला शिकविली तर त्या व्यक्तीच्या गुणवैशिष्ट्यांमुळे त्या कलेचा आगळाच विकास होतो. स्वाती नकार मेघाचे पाणी समुद्रातल्या शिंपल्यात पडले तर त्याचे मोती बनतात. तेच थेंब मातीवर पडले तर विरून जातात. विद्या देणाऱ्या प्रमाणेच विद्या करणाराही लायक हवा. शिकण्याची गोडी आणि बुध्दिचापल्य असेल तरच शिकविणाऱ्याच्या श्रमाचे चीज होऊ शकते. 'शिष्यात् इच्छेत् पराज | शिष्याला आपल्यापेक्षाही अधिक विद्या आलेली पाहून आपल्या पराजयाचाही गुरुला आनंदच होतो.



कथाकथन -

 फुल्यांची सावित्री : कुठे सती सावित्री तर कुठे फुल्यांची सावित्री एक पती सोबत सती जाते, तर विद्येचे पवित्र कार्य भारतीय स्त्रियांच्या जीवनवाटी अंधार आणि काट्यागोट्यांनी भरलेल्या होत्या त्या वाटेने एक दीप घेऊन सर्वांना प्रकाशाकडे नेणाऱ्या व "देते उच्चारी जैसी क्रियाकारी ! तीच नर-नारी पूज्यनीय" असे आवर्जून सांगणाऱ्या सावित्रीबाई यांचा जन्म खंडोजी सिंदूजी नेवसे पाटील इनामदार प | मु. नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे ३ जानेवारी १८३१ ला झाला. अगदी वयाच्या नवव्या वर्षी तेरा वर्षीय जोतिबा फुले यांच्या सोबत | १८४० मध्ये नायगाव येथे विवाह झाला. त्यांची मावस बहीण सगुणाबाई क्षीरसागर ही विधवा होती बडील गोविंदराव व स्वतः ज्योतिबा फुले. सगुणाबाई क्षीरसागर सावित्रीबाई फुले यांना स्वतः जोतिबा फुले १८४२ पासूनच शेतात कामे करतांनाच आंब्याच्या झाडाखाली शिकवू ला | मिसेस मिचेल यांनी सगुणाबाई व सावित्री आई फुले यांच्या परीक्षा घेऊन त्यांना आपल्या नॉर्मल स्कूलध्ये तिसऱ्या वर्षात प्रवेश दिला. १८५४-४६३ स. १८४३-४७ मध्ये दोघींचेही प्रशिक्षणाचे चौथे वर्ष पूर्ण झाले. दोन्ही प्रशिक्षित शिक्षिका झाल्या केशव सीताराम भवाळकर यांनी सुद्धा सावित्री आम अध्यापन कार्य कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. त्या काळामध्ये शूद्रांनी शिक्षण घेऊ नये. शूद्राने शिकणे हा धर्मद्रोह होय, पाप वाढतील स्त्री शिक्षण घेणे म्हणजे महाभयंकर पाप समजल्या जात होते. त्या काळात तर उच्चवर्णीयांच्या घरातील स्त्रियासुद्धा शिक्षणापासून वंचित होत्या. अविद्येचा अंधकार घनदाट पसरला होता. सर्व अनर्थाचे कारण म्हणजे अविद्या हा जोतिबाचा मंत्र म्हणून १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यात बुधवार के | येथे भिड्यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली, त्या शाळेत एकून सहा मुली होत्या त्यापैकी चार ब्राह्मण, एक धनगर व एक मराठा आ | विद्याथ्र्यांनी होत्या. इ. स. १८४८ ते १८५२ पर्यंत पुणे शहराच्या परिसरात एकूण अठरा शाळा काढल्या. मुलींच्या पहिल्या शाळेत, स्वतः सावि | फुले शिक्षिका होत्या. त्या जेव्हा शाळेत अध्यापन कार्य करण्यासाठी घरून निघायच्या तेव्हा भटब्राह्मण चिडवायचे, शिव्या द्यायचे तेच कशाला व (शूद्र) सुद्धा दगड घोड्यांचा, शेणाचा वर्षाव करायचे. अपमानित करायचे तरीसुद्धा सावित्री आई जरासुद्धा विचलित झाली नाही, तर आपले अध्याप कार्य जोमाने सुरूच ठेवले, सावित्रीआई ह्या निपुत्रितक होत्या काशीबाई नावाच्या एका विधवा ब्राह्मणेय आत्महत्या करण्यापासून सावित्रीबा | वाचविले तिला आधार दिला. जोतीराव सावित्रीबाईनी काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेतले होते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर त्यांचे उर्वरित कार्य व सत्यशोधक समाजाची धुरा सावित्रीबाईंनी सांभाळली. सावित्रीबाईंनी स्त्रीमु | चळवळ, मानवमुक्ती संग्राम विद्या प्रसाराचे कार्य केले. पहिली भारतीय मुख्याध्यापिका मराठी काव्याची जननी ('काव्यफुले १८५४ केशवसुतात ।।। वर्ष अगोदर) पहिली आदर्श शिक्षिका म्हणून मोलाचा मान सावित्रीबाई यांनाच जातो. त्यांनी इ. स. १८९३ मध्ये सासवड येथे भरलेल्या सत्य | परिषदेचे अध्यक्षपदसुद्धा भूषविले होते. अशा वंदनीय सावित्रीआईनी महाराष्ट्रात प्लेगची साथ सुरू झाली असता रुग्णांना आईप्रमाणे मदत केली. पो | झालेल्या एक दलित मुलाला आपल्या खांदयावरून आपला दत्तक पुत्र डॉ. यशवंत याच्या दवाखान्यात आणतांना सावित्रीबाई यांनाही प्लेग त्यांचा १० मार्च १८९७ प्लेगमुळे अंत झाला. त्यावेळेस त्यांचे वय ६६ वर्षे होते. 


→ सुविचार

 • जीवन म्हणजे एक आव्हान, प्रदीर्घ साहस व पात्रतेची कसोटी



→ दिनविशेष 

• जीवन म्हणजे एक आव्हान, प्रदीर्घ साहस व पात्रतेची कसोटी 1 - • सरदार यशवंतराव होळकर स्मृतिदिन - १८११. - मराठेशाहीचे प्रसिध्द वीर यशवंतराव होळकर यांची योग्यता फार मोठी आ परिस्थितीतही तो इंग्रजांपुढे नमला नाही तर त्यांच्याशी निधड्या छातीने युध्द करून मॉन्सनसारख्या सेनापतीवर त्यांनी मात केली. उत्कृष्ट सेनापती महा त्यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात कायम राहिले. मराठ्यांच्या लढाऊ वृत्तीचे दिव्य सामर्थ्य सर्व जगाला पुन्हा एकदा त्यांनीच दाखविले. इंग्रजांना परा करण्यासाठी बेडरपणे झुंजा घेऊन जेरीस आणणारा मराठेशाहीच्या उत्तरार्धातील शूरवीर योध्दा म्हणून यशवंतरावांचे नाव इतिहासात प्रसिध्द राहील | शत्रूवर मात करण्यासाठी तोफा ओतण्याचे काम ते स्वतः करीत असत. शेवटपर्यंत त्यांच्या सामर्थ्याचा दरारा एवढा होता की, त्यांच्या वाटेस जाण्य साहस कोणीही केले नाही. आयुष्याच्या शेवटी यशवंतरावांना चित्तभ्रम झाला आणि भानापूर येथे त्यांचा अंत झाला.


 → मूल्ये 

 • न्यायनिष्ठा, राष्ट्रप्रेम, शौर्य. - 


→ अन्य घटना

 • बादशहा जहांगीर स्मृतिदीन - १६२७

 • भगिनी निवेदितांचा जन्म १८६७

 • राष्ट्रीय सभेची स्थापना - १८८५. 


→ उपक्रम -

 • होळकर घराण्यातील कर्तृत्ववान व्यक्तींची माहिती सांगा.

  • सावित्रीबाईंना वाचा. 


→ समूहगान 

• आम्ही बालक या देशाचे, शिकू धडे सारे विज्ञानाचे .. 


→ सामान्यज्ञान 

- • एलिझाबेथ ब्लॅकबेल ही जगातील पहिली महिला डॉक्टर होय. केवळ एक स्त्री असल्यामुळे अमेरिकेतील २६ वैद्यकी महाविद्यालयांनी तिचे प्रवेश अर्ज कचऱ्याच्या टोपलीत टाकले. तिने न्यूर्यार्क, बोस्टन आणि फिलाडेल्फियामध्ये महिलांसाठी वैद्यकीय महाविद्याल | स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले. • आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा