Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image
सातवी मराठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सातवी मराठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०

डिसेंबर ०४, २०२०

इयत्ता सातवी, मराठी, 20.विचारधन



 महर्षी धोंडो केशव कर्वे : 

हे 'अण्णासाहेब कर्वे' म्हणून ओळखले जात. समाजसुधारणेच्या कामात ते हिरिरीने भाग घेत. हिंगणे स्त्रीशिक्षण संस्था, एस. एन.डी. टी. महिला विद्यापीठ या संस्था त्यांच्या प्रयत्नांनी नावारूपाला आल्या. त्यांनी केलेल्या समाजसेवेच्या गौरवार्थ आपल्या भारत सरकारने त्यांना भारतरत्न' हा किताब दिला. 

त्यांचे विचार- 'विद्यार्थी व विद्यार्थिनी हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत. त्यांनी दोन गोष्टी सतत ध्यानी बाळगाव्यात. 

(१) गतानुगतिक वृत्ती टाकून स्वतंत्र विचार करायला त्यांनी शिकावे, मात्र हे लक्षात ठेवले पाहिजे, की आपल्याला स्वतंत्र विचार करण्याचा जसा हक्क आहे तसाच तो इतरांनाही आहे. केव्हाही मनाचा समतोल ढळता कामा नये. हा तोल सावरणे ही कठीण गोष्ट आहे. हा तोल सांभाळला 

(२) मनाचा समतोलपणा राखावा. नाही, म्हणूनच जगात मोठमोठे अनर्थ घडून आलेले आहेत. मनाचा समतोल सांभाळून व भावनांच्या आहारी न जाता, आपल्याला पटलेली गोष्ट धैर्याने आचरणात आणणारी माणसेच आपले हे स्वराज्य टिकव शकतील. 

समतेचे तत्त्व आचरणात आणणारी व भेदाभेद न मानणारी माणसे मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय या देशाचा उद्धार होणार नाही, अशी माझी ठाम खात्री आहे.'


नामदार गोपाळ कृष्ण गोखले : 

हे लोकमान्य टिळकांचे समकालीन उदारमतवादी म्हणून ते प्रसिद्ध होते. विधायक कार्य करणाऱ्या अनेक संस्थांना त्यांनी चालना दिली. त्यांनी 'सर्व्हट्स ऑफ इंडिया सोसायटी' नावाची संस्था स्थापन केली, 'भारत सेवक समाज' या नावाने आता ती परिचित आहे. गोपाळ कृष्ण गोखले यांना महात्मा गांधी गुरुस्थानी मानत. 

त्यांचे विचार-'आज सर्वांत अधिक गरज असेल, तर ती देशाच्या चारी कोपन्यांत ऐक्याची नि देशभक्तीची शिकवण देणाऱ्या कार्यकर्त्यांची. देशप्रेम इतके पराकोटीला पोहोचायला हवे, की केवढाही त्याग करायला लागो तो आनंददायी वाटला पाहिजे. आज त्यागाची अधिक जरूर आहे. बोलणे नको, काम हवे! आपण सारे भाऊ भाऊ आहोत. आपण सारे हिंदी आहोत. धर्म आणि पंथ यांत गुरफटून जाऊ नका. समाजाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी राष्ट्रीय चारित्र्यही हवे. आज नैतिक सामर्थ्य कमी होत आहे. संकुचित भावना आणि क्षुद्र विचार यांची मगरमिठी न सोडवू तर भाग्योदय कसा होणार? आपल्या सर्व कामांत शिस्त, स्वार्थत्याग व कुशलता हे गुण प्रामुख्याने हवेत.

 राष्ट्राची उभारणी हे सोपे काम नाही. त्यासाठी सबंध आयुष्य द्यावे लागते. आपण खत होऊया, भावी पिढी पीक घेईल. 

बुधवार, २ डिसेंबर, २०२०

शनिवार, २२ ऑगस्ट, २०२०

ऑगस्ट २२, २०२०

इयत्ता सातवी, मराठी,९.नात्याबाहेरचं नातं

             ९.नात्याबाहेरचं नातं




वाक्प्रचार समजून घेवूया .........
(१) आगेकूच करणे - पुढे जाणे.
(२) रंग चढणे -  आनंदाचे अत्युच्च शिखर गाठणे.
(३) आश्चर्याचा धक्का बसणे -  अचानक चकित होणे.
(४) सुन्न होणे - बधिर होणे.
(५) भास होणे - भ्रम होणे.
(६) नजर खिळणे -  एका जागेवर लक्ष लागणे.
(७) नखशिखान्त न्याहाळणे -   आपादमस्तक नीट पाहणे.
(८) भंग करणे - मध्येच खंडित करणे.
(९) कणव निर्माण होणे  -  दया येणे.
(१०) हायसे वाटणे - जिवाला शांती मिळणे, बरे वाटणे.
(११) चेहरा खुलणे - मुखावर आनंद दिसणे.
(१२) चोरट्या नजरेने पाहणे - गुपचूप पाहणे.
(१३) आपुलकी निर्माण होणे - प्रेम वाटणे.
(१४) मनात घिरट्या घालणे - (एखादा विचार) मनात फिरत राहणे.
(१५) मुक्या शब्दांचा मार देणे- न बोलता समज देणे.
(१६) उत्साह द्विगुणित करणे - उत्साह वाढवणे.
(१७) भुरळ घालणे - भूल पडणे, मोह होणे.
(१८) दातखिळी बसणे  -  घाबरून बोलता न येणे.
(१९) मनात घर करणे -  - मनात रुतून बसणे.
(२०) घाबरगुंडी उडणे   घाबरून जाणे.
(२१) काळजात धस्स होणे - घाबरल्यामुळे धक्का बसणे.
(२२) छाप पाडणे  - ठसा उमटवणे, प्रभाव पाडणे.
(२३) शिरकाव करणे   आत घुसणे.
(२४) चाहूल घेणे  अंदाज घेणे.
(२५) बोबडी वळणे - घावरल्यामुळे शब्द न फुटणे.
(१) लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाला थेट घरी आणले.
उत्तर : थंडीने कुडकुडणार्या व कण्हत असलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला कायमचा आधार मिळावा म्हणून लेखकांनी त्याला थेट घरी आणले.
(२) लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाचे नाव 'डांग्या ' ठेवले.
उत्तर : कुत्र्याच्या पिल्लाचे शरीर दांडगे होते, म्हणून लेखकांनी त्याच्या शरीराला साजेसे असे त्याचे नाव डांग्या' ठेवले.
(३) लेखक डांग्याला 'पक्क्या हिमतीचा राखण्या' म्हणतात.
उत्तर : डांग्याची शेतामधली रखवाली अशी होती की, अट्टल चोरांचीही दातखिळी बसायची डांग्याच्या नुसत्या कर्तबगारीने भल्याभल्यांची बोबडी वळायची. म्हणून लेखक डांग्याला 'पक्क्या हिमतीचा राखण्या' म्हणतात.
थंडीच्या झंकाराची वैशिष्ट्घे    १) हळवा. २) सर्वांगाला वेढून टाकणारा. ३) रान, पानाफुलांना आपल्या इशान्यावर नाचवणारा.  ४) नदीच्या झुळझुळणाच्या पाण्याला मंद लहरीवर खेळवणारा.
कुत्र्याच्या पिल्लाला थंडी असहय झाली हे वर्णन करणारी पाठातील वाक्ये
(१) अंगाचं गाठोडं करून पडलेलं.
(२) समोरच्या दोन्ही पायांत मान खुपसलेली.
(३) हुडहुडी रोखण्याचा त्याचा चाललेला प्रयत्न आम्हांला सुन्न करून गेला.
(४) थंडीच्या ओलसरपणानं त्याच्या केसांवर जणू कुणौ पाणी शिंपडलंय की काय असा भास झालेला.
५) इवल्याशा जिवाला तशी थंडी असह्यच

पुढील बाबतीत डांग्याचे वर्णन करा
१) दिसणे : वाढत्या वयावरोबर डांग्याचा चेहरा अधिक प्रसन्न झाला होता. डोळ्यांखालचे पिवळसर पट्टे व मागच्या पायाच्या बोटांवर असलेले लालसोनेरी पट्टे सगळयांचे लक्ष आकर्षित करणारे होते.
२) शरीरयष्टी :  डांग्याची  शरीरयष्टी  अधिक दगकट त्याचे तरगेबांड शरीर सगळयांच्या नजरेला भुरळ घालणारे होते.
३) चाल : डांग्याची दुडुदुडु चाल सर्वांना भावणारी होती.
४) नजर : त्याचे तेजस्वी डोळे बोलके होते.

[तुम्ही काय कराल ?]

(१) एका कुत्र्याच्या पिल्लाच्या पायाला इजा झाली आहे, अशा प्रसंगी तुम्ही काय कराल ?
हे नमुना उत्तर : त्याला उचलून घेईन. रुमालात गुंडाळून ऊब देईन. त्याच्या पाठीवरून हात फिरवीन. त्याला
घरी घेऊन जाईन. जखम नीट पाहून त्यावर घरगुती औषधोपचार करीन. ठरावीक वेळाने दूध प्यायला देईन,
ते बरे होईपर्यंत सर्वतोपरी पिल्लाची काळजी घेईन.

(२) तुमच्या घराच्या बाहेरील बाजूस चिमणी घरटे बांधत आहे.
उत्तर : मी चिमणीचे घरटे तिला बांधू देईन. चिमणी घरटे कसे बांधते, याचे दररोज निरीक्षण करीन. तिला
खायला दाणे व प्यायला पाणी देईन. घरट्यातील चिमणीच्या पिलांची काळजी घेईन. इतर धोक्यांपासून मी चिमणीच्या घरट्याचे रक्षण करीन.


प्रश्न. पुढील शब्दांचे तुम्हांला समजलेले अर्थ लिहा :
(१) हुडहुडी - थंडीने अंग थरथर कापणे, कापरे भरणे.

(रुखरुख  मनात हळहळ वाटत राहणे.
(३) फुलोर - फुलाआधी येणारा परागांचा गुच्छ.
(४) अष्टपैलू व्यक्तिमत्त्व   अनेक गोष्टींत कुशल असणारी व्यक्ती.
(५) विश्वस्त -  विश्वासू राखणदार, मूळ संस्थापकांपेकी एक व्यक्ती.
(६) सोहळा - समारंभ, उत्सव.

प्रश्न   पुढील शब्दांचा सहसंबंध लावा : (रंगछटा आणि नामे)
उत्तरे   
(१) शुभ्र  - चांदणे
(२) प्रसन्न  - सकाळ
(३) लालसोनेरी  - पट्टे
(४) निळसर-     चांदणे
(५) हळदुली -   किरणे



रविवार, २ ऑगस्ट, २०२०

ऑगस्ट ०२, २०२०

इयत्ता -सातवी, मराठी,६.थोरांची ओळख-डॉ. खानखोजे

सोमवार, २० जुलै, २०२०

जुलै २०, २०२०

इयत्ता -सातवी, मराठी 4-श्रावण मास

                4- श्रावणमास

श्रावणमास (कविता)

कवितेचा अर्थ-
श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवळ पसरते. क्षणात पाऊस पडतो, तर दुसऱ्या क्षणाला ऊन पडते. ऊनपावसाच हा लपंडाव पाहून मन आनंदाने फुलून येते. वर आकाशात इंद्रधनुष्याचा दुपेडी गोफ विणलेला दिसतो. इंद्रधनुष्य उमटलेले पाहून असे वाटते की, कुणीतरी आकाशाच्या मंडपाला पवित्र तोरण बांधले आहे.
 ढग दाटून आल्यामुळे सूर्यास्त झाला नि संध्याकाळ झाली असे वाटते न वाटते तोच ढगांचा पडदा बाजूला होऊन पिवळे पिवळे ऊन, उंच घरांवर नि झाडांच्या शेंड्यांवर झळकते. संध्यासमयी ढगांवर असंख्य रंग उमटतात- जणू ते ढग संध्याराग गात आहेत ! सर्व आकाशावर असे सौंदर्याचे महान रूप कुणी (चित्रकाराने) रेखाटले आहे असे वाटते.
आकाशात उडणाऱ्या बगळ्यांची रांग पाहून असे वाटते की, जणू कल्पफुलांचा तो हार आहे आणि जमिनीव बगळ्यांची रांग उतरताना पाहून ग्रहगोल एकत्रपणे धरतीवर उतरले आहेत, असे वाटते. नुकत्याच पडून गेलेल्य पावसाने आपले भिजलेले पंख सावरत पक्षी फडफडत आहेत. हिरवळीवर आपल्या पाडसांसोबत सुंदर हरिणी बागडत आहेत.
हिरव्या माळरानावर गाईगुरेवासरे मजेत चरत आहेत आणि गुराखीसुद्धा आनंदाने गाणी गात फिरत आहेत. गराख्यांच्या सुरेल बासरीतून निघणारे सूर जणू श्रावणाची महती गात आहेत. सोनचाफा फुलला आहे आणि रानामध्ये सुंदर केवडा दरवळत आहे. फुललेली पारिजातकाची फुले पाहून सत्यभामाच्या मनात असलेला राग जसा विरून गेला, तसे आपले मनही पारिजातक पाहून निवळते.
 फुलमालांसारख्या सुंदर मुली सजून-धजून हातात सुंदर परडी घेऊन मधुर आवाज करीत निर्मळ मनाने सुंदर फुले-पाने खुडत आहेत. देवाचे दर्शन घेण्यासाठी (सुवासिनी) स्त्रिया मंदिराकडे जात आहेत. त्यांच्या हृदयात आनंद मावत नाही. त्यांच्या प्रफुल्लित चेहऱ्यावर श्रावण महिन्याचे गोड गाणे जणू उमटले आहे. ते गाणे त्यांच्या मुखावर वाचता येते.

प्रश्न1- 'सुंदर बाला या फुलमाला' या ओळीत सारख्या वर्णाचा उपयोग अधिक केल्यामुळे गोड नाद निर्माण होतो.  कवितेतील अशा ओळी शोधून लिहा.
उत्तर : (१) श्रावण मासी हर्ष मानसी (२) तरुशिखरांवर, उंच घरांवर
(३) उठती वरती जलदांवरती
 (४) उतरुनि येती अवनीवरती
 (५) सुंदर हरिणी हिरव्या कुरणी

प्रश्न 2. पुढील अर्थांच्या कवितेतील ओळी शोधून लिहा :
(१) क्षणात पाऊस पडतो, तर क्षणात ऊन पडते.
 उत्तर : क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.
 (२) झाडांवर, घरांवर कोवळे कोवळे ऊन पडते.
उत्तर : तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे.
(३) हरिणी आपल्या पाडसांसह कुरणात बागडत आहेत.
 उत्तर : सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती.
* प्रश्न 3. पुढील कवितेच्या ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा : श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे; क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.
उत्तर : श्रावण महिन्यात माळरानावर सर्वत्र हिरवळ गच्च दाटलेली असते. क्षणात पावसाच्या सरी येत तर लगेच दुसऱ्या क्षणी लख्ख ऊन पडते. हा ऊनपावसाचा लपंडाव पाहून मन आनंदाने फुलून येते.

मुक्तोत्तरी प्रश्न *
१. पुढील प्रसंगी काय घडते ते लिहा :
(१) पहिला पाऊस आल्यावर ... उत्तर : कडक उन्हाळ्यात वातावरण तापलेले असते. घामाच्या धारांनी जीव हैराण झालेला असतो. पहिला पाऊस पडतो तेव्हा मन आनंदून जाते. हवेत गारवा येतो. सारी सृष्टी पावसात न्हाऊन प्रसन्न दिसू लागते पहिला पाऊस सर्व प्राणिमात्रांना हवाहवासा वाटतो.

 (२) सरीवर सरी कोसळल्यावर...
उत्तर : आषाढ महिन्यात खूप मुसळधार पाऊस येतो. सरीवर सरी कोसळतात, तेव्हा पावसात चिंब भिजावेंसे वाटते. झरे, नदी, नाले ओसंडून वाहतात. पशु-पक्ष्यांना मुबलक पाणी मिळते. सर्व सृष्टी न्हाऊन निघते. पशु पक्षी निवारा शोधतात. शेतकरी आनंदित होतात.


 २. निरीक्षण करा व लिहा : श्रावण महिन्यातले तुम्ही पाहिलेले आकाशातील विशेष बदल
नमुना उत्तर: (१) पांढऱ्या ढगांचे पुंजके तरंगत असतात.
 (२) अचानक वाऱ्याच्या झुळका वाहू लागतात.
(३) आकाश काळ्या ढगांनी दाटून येते.
(४) पावसाची जोरदार सर येते.
(५) थोड्या वेळाने सूर्य ढगाआडून येतो व लख्ख ऊन पडते. कधी रिमझिमत्या सरीत ऊन पडून क्षितिजाक इंद्रधनुष्य उमटते.


२. लेखन विभाग *(१) श्रावण व वैशाख या दोन्ही महिन्यांतील निसर्गात जाणवणारा फरक तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : वैशाखात कडक ऊन पडते. जमिनीला भेगा पडतात. अंगाची लाहीलाही होते. घामाच्या लागतात. नदीनाले आटतात. गुराढोरांना हिरवा चारा मिळत नाही. तहानेने प्राणिमात्रांचा जीव व्याकुळ होतो श्रावणात पावसाची रिमझिम बरसात होते. ऊन कोवळे होते. ऊनपावसाचा आनंददायी लपंडाव सुरू हवेत सुखद गारवा येतो. शेतात पेरलेले बियाणे उगवून येते. शेतकरी आनंदात असतात. नदीनाले भरभरून वा गुराढोरांना हिरवा चारा मिळतो. सगळी सृष्टी हिरवीगार होते. पशु-पक्षी व माणसे आनंदात व उत्साहात वावरतात.

रविवार, १२ जुलै, २०२०

जुलै १२, २०२०

इयत्ता-सातवी,3 तोडणी

                   3 तोडणी


*प्रश्न १. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा : 
(१) मीराने वसंताला 'तमसो मा ज्योतिर्गमय चा सांगितलेला अर्थ, 
उत्तर : 'तमसो मा ज्योतिर्गमय' म्हणजे अंधारातून उजेडाकडे, असा अर्थ मीराने वसंताला सांझि या अर्थाचा उलगडा व्हावा, म्हणून पुढे ती म्हणाली तुला संस्कृतचे वाक्य वाचता आले नाही, म्हणजे आणि पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर उजेड!' 

(२) वसंताच्या मनातील शिक्षणाची ओढ. 
उत्तर : वसंताच्या मनात शिक्षणाची प्रचंड ओढ होती. चिमणीच्या उजेडात मीराला वसंताचे पटट सापडले. तिच्या ओरडण्याने वसंताला शाळेची आठवण झाली. तो खोपीच्या बाहेर येऊन वडिलांना म्हणाला ई मला कधी शाळेत पाठवणार? त्याच्या मनात शिक्षणाविषयी सतत उलघाल होत होती. यावरून वसंताच्या मनातील प्रश्न शिक्षणाची ओढ दिसून येते. 

(३) 'अगं'! पण शंकरनं (दादान) शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार?' या वाक्याचा तुम्हान समजलेला अर्थ. उत्तर : दादांना म्हणजेच शंकरला म्हणजेच वसंताच्या वडिलांना ऊस तोडणीच्या कामात वसंत मदतनी म्हणून हवा होता. म्हणून दादांनी त्याचे शिक्षण थांबवले. त्यामुळे वसंताला वाचन करता येणे शक्य नाही असा या वाक्याचा अर्थ आहे.

पाठ वाचा व त्यावर आधारित खालील चाचणी सोडवा.

गाव सोडून गाडीत बसल्यावर सगळ्याच्या डोळ्यांसमोर फक्त ऊस दिसत होता. निघाल्यापासून गावाकडच्या विचारानं सगळ्यांच्या मनात काहूर उठल होत. परक्या गावात आपण केव्हा आलो हे तारा अन् शकला उमगलंच नाही. सगळ्या तोडणी वाल्यांनी मराठी शाळेजवळच्या मोकळ्या जागेत गाड्या सोडल्या. बैलांच्या मानेवरचं जू खाली ठेवताच सगळी बैल शेपटी अंगावर मारत अंग खाजवायला लागली. बायकांनी गाडीजवळच चुली पेटवल्या. बाप्या माणसांनी बैलं आणि पोरांनी बादल्या, कळश्या घेतल्या व नदीवर गेली. दामले आपली बैलं नदीवरून पाणी पाजून आणली. मीरा आणि वसंत झिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला होता. तारानं भाकरी थापून तव्यावर पिठलं टाकलं तेवढ्यात पोरं पाणी घेऊन आली. 'आवं पाचूंदा सोडा, लक्ष्मीनं दिलेला आवाज दामूनं ऐकला आणि पाचूंदा सोडून गुडघ्यानं सरमड कडाकडा मोडून बैलांसमोर सारलं. तसा रामा, धोंडू, शंकर सगळ्यांनी आपआपल्या परीनं बैलांसमोर सरमड मोडून टाकलं. पिठलं-भाकरी पोटात ढकलून सगळ्यांनी अंथरुणं पसरली.
 तांबडं फुटताच तारा झटकन अंग झटकून उठली. होळी या विशेषणाचे कुठलाही शाळेत स्तिक त्याला इतका मध्ये कवचनात तिनं जर्मनच्या पातेल्यात चहा ठेवला. शंकर जांभई देत उठला. त्यानं अंथरुणाची वळकटी केली. तारानं तोंडावर पोचारा मारला नि बिनदांडीच्या कपात लाल चहा शंकरच्या पुढ्यात केला. 'हं घ्या, च्या घ्या. शंकरनं चहाचा कप हातात घेतला. 'शंकर ! अरे ये शंकर...आरं मामू चिठ्ठी देऊन गेलाय,


Class-7th, Mathematics,Multiplication and Devision of Integers | https://www.godavaritambekar.com/2020/07/class-7th-mathematicsmultiplication-and.html
.......................................................


थळात जायचंय, निघाया पायजे,' दामूचा आवाज कानावर या पडतात हा आलू,... आलू', असं बनवून गायक की धटाधटा चहा पोटात ढकलला, सगळ्यानी नदीच्या काठावर मोकळ्या रानात सामान उतरवलं अन् थळाचा. या रस्ता धरला, शंकर-तारामती आपला कोयता सोबतीला या घेऊन मीरा अन् वसंतला बरोबर घेतलं, आज  'ऊसतोडणी'चा पहिला दिवस असला, तरी उघड़यावर झोपून थंडीनं अंग काकडून निघतं, म्हणून दुपारीच  थळातून लवकर परतायचं, असं सगळ्यांनी ठरवलं  होतं, थळात पाय ठेवताच शंकरने उसावर घाव घालायला सुरुवात केली. मीरानं मोळ्या बांधल्या, नी चारा मिळाल्यानं बैलं मस्त जोगली होती. दिवस माथ्यावर केव्हा आला ते समजलंच नाही, हिरवा चारा मिळाल्यांन बैल मस्त जोगली होती.

     सगळ्यांनी वाढे टाकून शंकूच्या आकाराच्या  कोप्या बांधून सामान लावलं, तसं तारानंही सामान लावून चिमणीचा उजेड करताच मीराला वसंतचं पुस्तक गवसलं. 'वश्या तुपलं पुस्तक...वश्या तुपलं पुस्तक.' देत मीराचा आरडाओरडा ऐकून वसंतला शाळेची आठवण  झाली अन् वसंत कोपीबाहेर बसलेल्या शंकरच्या मागे जाऊन उभा ठाकला. त्यानं शंकरच्या खांदयावर हात .' ठेवून विचारलं, 'दादा, मले साळांत कवा धाडणार?'  थळामध्ये जोशात काम करणाऱ्या वसंत शंकर डात पाह्यलं असल्यानं 'साळा बिळा काय बी नाय, बस

झाली आता तुपली शाळा, खाऊन घे...आन् झोप, तांबड्यात तोडीला जायचं हाय. जा, झोप जा, असे म्हणून गप्प केल, शंकरच्या मागे उभं राहून खांदयावर हात ठेवून विचारताना उसाच्या पाचटानं साळलेल्या अंगावरच्या खुणा पाहून वसंत हबकून गेला होता. त्याच्या मनात शिक्षणाविषयीची उलघाल होत होती. शंकरच्या बोलण्यान वसंत उपाशीच झोपला, तर मीराला फार वाईट वाटल.

 कोपीबाहेर अंधूक उजेडात तारानं चूल शिलगावली तवा ठेवला. भाकरी थापण्याच्या आवाजानं वसंतला जाग आली. शरण नदीवर जाऊन गुंडवर, तर मीरान कळशीभर पाणी आणल. शकरन थळात जायची तयारी चालवली होती. मीरान पाट्यावर मिरचीच वाटण वाटून आईकडे दिल, 'मिरे अग आवर लवकर, त्या वश्याला उटीव. आर आवरा लवकर, गाड्या निघाल्या.' शकरच्या आवाजानं तारान कालवणाला फोडणी दिली. सगळ्यांच्या गाड्या वाटेला लागल्या. शंकरनं आपली गाडी जुंपली. तारा धुडक्यात कोयता, भाकरीचं पेंडक अन् कालवण घेऊन गाडीत बसली, तशी मीराही परकर सावरत बसली. वसंत कोळी मागे खेटून बसला होता. तारा वसंत पाशी जाऊन समजूत काढून त्याला गाडीत बसवल अन् गाडी फुपाट्याच्या रस्त्यानं वाटेला लागली.

शंकर आणि तारा उसावर घाव घालत होते, तर मीरा अन् वसंत त्याच्या मोळ्या बांधून सडकेला आणून टाकत होते. सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची नजर खिळली, तसेच वसंत कागद उचलून हातात धरला; पण कागदावरच्या संस्कृतमध्ये शब्दांचा उलगडा नीट होत नव्हता. रस्त्यावर सापडलेल्या कागदावरचे शब्द वसंत आईला वाचायला लावताच, 'पोरा, मले तरी कुटं वाचता येतंय, मपली शाळा तर दुसरीच झालीय', असं आई म्हणाली. कागदावरच्या शब्दांचा मीराकडूनच नीट उलगडा होईल याची वसंतला खात्री होती, कारण मीराचंही शिक्षण कसंबसं आठवीपर्यंत झालं होतं. तो धावत जाऊन तिला म्हणाला, "ताई, मला सडकेवर कागद गवसला. त्यावर
काय लिव्हलंय बग, काईच कळत नाईये."

पोराचं शिक्षण अर्धवट राहायची भीती ताराच्या मनात आल्यानं तिनं शंकरला बोलतं केलं. “पोराचं शिक्षण तोडलं तुमी, कामाला हातभार लागतो... पण त्याच्या आयुष्याचं काय?" "अगं व्हईल समदं, आता कुटं गाडी जरासी रुळावर आलीय." घाव घातलेला ऊस ताराकडे देत शंकर बोलले.

मीरानं डोक्यावरील मोळी खाली ठेवली. मीरा वसंतच्या हातातील कागद पाहू लागली. वसंत

उत्कंठतेनं मीराकडे बघत होता. "ही वळ व्हय? हे तर संस्कृत मधील वाक्य हाय. 'तमसो मा ज्योतिर्गमय' असं लिव्हलंय," मीरा म्हणाली. "म्हणजे काय गं ताई?" ,, वसंत विचारलं. "तमसो मा ज्योतिर्गमय, म्हंजी अंधारातून उजेडाकडं," मीरानं सांगून टाकलं. "म्हंजे ग ताई?" पुन्हा वसंतनं विचारलं. "आता तुला कसं सांगू? हे बघ वश्या, तुला संस्कृतमधलं वाक्य वाचता आलं न्हाई म्हंजी अंधार, अन् पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर ..." मीराचं बोलणं पोरं व्हायच्या आतच 11 “तर काय व्हईल?" वसंत विचारलं. "तर वाचता येईल म्हणून उजेड, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे,"  असं म्हणत मीरा माघारी फिरली. तितक्यात वसंत मीराचा हात धरून थांबवत म्हटलं, "अगं, पण दादानंच शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार? ताई, काही झालं तरी मी शिकणारच." त्यांचं हे बोलणं ऐकून
तडातडा तुटणाऱ्या उसागत वसंत शिक्षण तुटत असल्याची जाणीव शंकरला झाली.

बाजार असल्यानं आज 'तोडणी' बंद होती. आजूबाजूच्या कोप्यावरली सारी पोरं शाळेत गेल्यानं वसंत एकटाच कोपीबाहेर बसून काय करावं या विचारात होता. शेजारच्या कोपीतून दामूची बायको लक्ष्मी कालवणाच्या फोडणीचं वाटण वाटायला बाहेर आली. पाट्यावर मीठमिरची वाटता वाटता लक्ष्मीनं वसंत कडे पाहिलं. "वश्या, तू आज साळंला न्हाई गेलास व्हय रं?" वसंतनं हातातला खडा खाली फेकत 'कसा जाणार?' म्हणत मानेला झटका देत तो कोपीत शिरला. "आवं ओ वसंताची माय," असं म्हणत लक्ष्मीनं ताराला साद घातली. “आले ओ माय... ११ आले...आले," म्हणत खाली वाटत कोणी बाहेर आलेल्या ताराला पाहून "आवं समदी लेकरं शाळंला गेली, आन् तुपलं?"

वाटणाची परात हातात घेत लक्ष्मी उभी राहिली. बाजार घेऊन आलेल्या दामू अन् शंकरकडे लक्ष्मीची नजर जाताच शंकरकडे हात दाखवत, “हे बघा, यास्नी इचारा की, का शाळेला गेला नाही म्हणून,' लक्ष्मीकडे पाहत तारा उत्तरली. लक्ष्मीनं शंकरकडे नजर लावून, "कावं भावजी, आपल्या समद्यांची पोरं साळंला जात्यात, मग याला कशापाई घरी ठिवलं?
त्याचं शिकायच वय हाय तर शिकू द्या की, मोटा झाला की कामच करणार हाय,

"व्हय व्हय, म्या बी त्येच म्हती. हिच बी शिकणे अर्धच न्हायल" मीराच्या डोक्यावरून हात फिरवत तारा लक्ष्मीच्या बोलण्याला साथ दिली, तारा स्वत:च्या शिक्षणाची आबाळ झाल्याचे म्हणत मीराच्या शिक्षणाची स्तुती केली अन् शंकरला म्हणाली, "आव ही लक्ष्मी माय काय म्हतीया ते तर बघा, वश्याला साळला घाला म्हतीया. थोडस पैक कमी मिळल, पण तो आपल्यासारखा अडाणी तर न्हाई ना न्हाणार. जाऊ या त्यास्नी साळला." शंकर म्हणाला, "लक्ष्मी वैणी समदं खरंय, पण..." हातातली बाजाराची थैली ताराकडे देत शंकरनं मान फिरवली. "आता पनबीन काय बी सांगू नगर, उद्यापासून त्येला साळला दाड. सगळ बोलण ऐकल्यानं दामून तोंड उघडल. कोपीबाहेर चालले सगळं बोलणं आपल्याविषयी असल्यानं वसंतला उभारी आली आणि तो कोपीबाहेर येऊन उभा राहिला. “आता समदीच म्हणत्यात तर जाऊ दया, नाई म्हणू नका. पुढला विचार करा." तारा म्हणाली. वसंतकडे पाहत 'ये, पोरा ये' म्हणून त्याला जवळ घेत तारानं वसंतला कुरवाळल.

'आता तुमी समदीच म्हत्यात तर म्या तरी कशाला आडवा येवू? वसंता, ये इकडे पोरा. आता तू उद्यापासून साळला जायच बर का! हे बघ पुढल्या बाजारी आपण तुझ्यासाठी पेन आणू वसंतला जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवत शंकर म्हणाला. मीराच्याही आनंदाला पारावार राहिला नाही. तिचेही डोळे पाण्यानं भरले. वसंत लगेच मित्रांना गाठलं. 'आता म्या साळा येणार,' असं वसंत सगळ्यांना सांगत सुटला.