Godavari Tambekar

Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

Tuesday, 3 October 2023

October 03, 2023

4 ऑक्टोबर -दैनंदिन शालेय परिपाठ

 ४ ऑक्टोबर



→ प्रार्थना 

- देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना.... 

 

→ श्लोक 

- खरे वचन बोलवी, जडपणास की घालवी । महोन्नतिस डोलवी, दुरित मारूनी चालवी । मनी सुख अमोलवी, यश जगत्रयी कालवी । अनेक गुण पावली, सुजन - संगती झुलवी

 ।। सज्जनांची संगती खरे बोलावयास शिकविते, बुध्दीचे जडत्व नष्ट करते, मोठी उन्नती घडवून आणते, पापे नाहीशी करते, मन प्रसन्न करते, तिन्ही जगात (दश दिशात) कीर्ती पसरविते.. 

 

→ चिंतन 

- शस्त्रांनी जखमी केलेले योध्दे सर्वतोपरी नष्ट झाले असे समजू नये. पण ज्यांची बुध्दी नष्ट केली गेली असे योध्दे खरोखरीच सर्व होतात. शस्त्र फार तर शत्रूचे शरीर नष्ट करील, पण बुध्दी मात्र शत्रूचे घराणे, ऐश्वर्य आणि कीर्ति यांचा नाश करते. साम, दाम, दंड, भेद अशी दुष्ट चार शस्त्रे मानली जातात. शत्रुपक्षावर विजय मिळविण्यासाठी यांचा वापर केला जातो. पक्षभेद, पक्षफुटीमुळे एकी संपते, शक्ती कमी होते. ह भारतावर अधिराज्य गाजविले ते याच भेदनीतीचा उपयोग करून.


→ कथाकथन

जो सर्वांला तो चि आवडे देवाला एक एक बूचा मुलगा राहत होता. गावातील उपेक्षित लोदीन सीमा सेवा करीत असे. इतर लोकांना हा अबू म्हणजे विक्षिपापा उपाय अशी आर्या असत. परंतु अन् त्याच्याकडे फारसे लक्ष देत नसे. लोहारा एांगला पोरगा वाया गेला एक दिवस मनात आले. आपणावर कोण किती प्रेम करतो त्याची परीक्षा घ्यावी व गुणानुक्रमाने नंबर लावावेत. देवाने आपल्याला पाठवण्याचे ठरविले प्रत्येकाला विचारून खात्री करून घ्यायची व त्या माहितीनुसार गुणानुक्रम लावायचे, असे ठरविले. खेड्यातील माणसे संध्याकाळी परी सापड मावळल्यानंतरच गावात जाण्याचे अविले, थोडा अंधार पडताच गावातील सर्व मंडळी मारुतीच्या मंदिरापाशी ही गोष्टी करीत एक होती त्यांना एक तेज पुंज व्यक्ती त्यांच्या दिशेने येताना दिसली. सर्वांचे लक्ष त्या तेज पुंज व्यक्तीकडे गेले. ती व्यक्ती म्हणजे देवाने पाठविलेल सर्व गावकन्यांना म्हणाला, "हे बघा, मला देवाने आपल्या गावात सर्वात जास्त देवावर प्रेम करणारा कोण आहे हे शोधून काढण्याकरिता पाठविले आहे. मी ए माहिती विचारून वहीत लिहितो. ती आपण मला सांगावी. "देवदूतचे बोलणे ऐकताच गावकरी म्हणाले, "हे काय विचारणे झाले?' आम्ही सर्वच लोक देवा करतो. "देवदूत म्हणाला, "तसे नाही, ज्याची माहिती त्यानेच सांगावी" असे म्हणून देवदूताने वही काढली व प्रत्येक व्यक्तीस विचारू लागला. "तू देवावर प्रेम क प्रकारे करतोस ?" कुणी म्हणे, मी दरवर्षी तीर्थयात्रा करतो कुणी म्हणे, 'भी रोज एक तास भजन म्हणतो. कुणी म्हणे, 'मी रोज ताज्या फुलांचा हार करून देवाला प याप्रमाणे प्रत्येक गावातील व्यक्ती काहीतरी सांगून आपले देवावरील प्रेम व्यक्त करी, व देवदूत ती टिपून घेई. सर्वांची नावे लिहून झाल्यानंतर देवदूताने आपली केली व तो जाणार इतक्यात कुणाला तरी आठवण झाली- अरे, आपल्या गावातील अबू तर राहूनच गेला. कुठे गेला कुणास ठाऊक?" तितक्यात अ येताना दिसला. कसली गडबड आहे म्हणून अबू धावतच आला. लोक म्हणाले, "धांचा, देवदूत साहेब ! तो अबू येत आहे, त्याची माहिती लिहून घ्या. " विचारले, "कारे अबू, करतोस देवावर प्रेम ?" अबू शांतपणे म्हणाला, "देव तर मी पाहिला नाही. मग प्रेम कसे करणार?"देवदूत म्हणाला, "ठीक आहे मी जा म्हणाला, "पण गावातील माणसांवर मात्र मी प्रेम करतो." देवदूत म्हणाला, "माणसांवर प्रेम करणान्यांची यादी बनवायला मला देवाने सांगितली नाही. पण तू तर तुझ्या म्हणण्यातील खरेपणा पाहून वहीच्या वरच्या पृष्ठभागावर मी माणसांवर प्रेम करणारा माणूस अबू" म्हणून लिहितो. असे म्हणून देवदूत देवाकडे गेला. बा कुणाचा नंबर आता हे सांगायला मी उद्या पुन्हा याच वेळी तुमच्या गावात येईन. असे सांगून गेला. देवदूत गेल्यानंतर सर्व गावातील लोक अबूला म्हणू लागले. "अ तरी कुठे पाहिला होता देव, पण तू देवावर प्रेम करतो असं सांगितलं असत तर कुठे बिघडलं असतं!" अबूने शांतपणे ऐकून घेतले व आपल्या कामात मग्न झाला दिवशी त्याच वेळी त्याच ठिकाणी गावातील मंडळी एकत्र जमली. देवदूताची मोठ्या आतुरतेने वाट पाहू लागली. प्रत्येकाला वाटत होते की माझाच पहिला नंबर देवदूत बेताच सर्वांनी एकच प्रश्न केला, 'कुणाचा नंबर आला?' देवदूतां महणाला, "चांचा सोतो, मी देवापुढे यही ठेवली. देवाने संपूर्ण वाचली व सांगितले, ""अब्रूचा प्रथम क्रमांक आहे. कारण जी माणसे गावातील सगुण जिवंत माणसांवर प्रेम करीत नाही, ती निर्गुण निराकार देवावर काय प्रेम ?" गावातील लोकांवर प्रेम करून एकात्मता सिद्ध करणारा अबू धन्य झाला.


 → सुविचार • एकीने रहा, नेकीने वागा.'

 • चारित्र्यात सूर्याची तेजस्विता व अंत:करणात चंद्राची शीतलता असावी. 


दिनविशेष 1

-• रशियाचा पहिला उपग्रह स्पुटनिक - १ याचे अंतराळात प्रक्षेपण १९५७ : जगामध्ये सर्वात प्रथम रशियाने 'स्पुटनिक' पहिला कृत्रिम उपग्रह ४ ऑक्टोबर १९५७ रोजी अवकाशात यशस्वीरित्या प्रक्षेपित केला. स्पुटनिक याचा अर्थ प्रवासी. अवकाश भेटून जाणे हे केवळ रक्टिच्या अवलंबून आहे, हे ओळखून किटची गती व अवकाश संचार बांगे मूलभूत संशोधन व प्रयोग रशियात १९३४ पासून सुरु होते. द्रव हायड्रोजन व द्रव ऑक्सि इंधन म्हणून रॉकेटमध्ये उपयोग करून घेता येईल. असा सिद्धांत के.ई. सिओलकोव्हस्की यांनी मांडला. पुढे १९५७ मध्ये ४ ऑक्टोबर रोजी रशियाने आपला कृि उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत दिमाखाने सोडला, आणि अवकाश, विज्ञानाच्या क्षेत्रातील एका क्रांतिकारी पर्वास प्रारंभ केला. अवकाश म्हणजे जिच्यात आपली पृथ्वी सूर्यमालेतील ग्रह, तारे, आपली आकाशगंगा, इतर आकाशगंगा इ. गोष्टी जणू तरंगत आहेत ती पोकळी. त्या पोकळीविषयी व घटकांविषयी माहिती मिळविणे हे अव विज्ञानाचे उद्दिष्ट आहे. दुर्बिणीचा शोध लागल्यानंतर नुसत्या डोळ्यांना न दिसाच्या अशा अवकाशातील अनेक वस्तू दिसू लागल्या. त्यानंतर त आधुनिक साधने व उपकरणे उपलब्ध होती. परंतु आकाशस्थ वस्तूविषयी जी माहिती मिळत असे, ती पृथ्वीच्या पृष्ठभागावरून निरीक्षणे किंवा मापने क असे. दुसन्या महायुध्दात जर्मनीने वसलेल्या व्ही-२ किटची माहिती मिळाल्यावर त्यांच्यासारखी अधिक कार्यक्षम व दूरपल्ल्यांची रकिट बनव करण्यात आले. ते यशस्वी ठरून विज्ञानविषयक संशोधनास उपलब्ध होऊन अवकाश संशोधनास चालना मिळाली. 


→ मूल्ये

 विज्ञाननिष्ठा, चिकाटी, शोध 


→ अन्य घटना

 • छत्रपती प्रतापसिंह भोसले स्मृतीदिन १८७४

  • सुप्रसिद्ध - नट संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे निधन - १९२१. सुप्रसिद्ध कवी सोपानदेव चौधरी यांचे निधन १९८२

   • राष्ट्रीय एकात्मता दिन

  

   

समूहगान 

हिंद देश के निवासी सभी जन एक है.. - 


→ उपक्रम 

भारताने सोडलेल्या कृत्रिम उपग्रहांची माहिती मिळवा 


→ सामान्यज्ञान -

 • कडक हिवाळ्यात ज्या ज्या प्रदेशात बर्फ पडते तेथे झाडांची पाने गळून गेल्याने त्यांची प्रकाश संश्लेषण क्रिया बंद पडून ऑक्सि जवळ जवळ बंद होते. अशा वेळी त्या त्या प्रदेशातील प्राणीसृष्टीला लागणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा समुद्रावर निर्माण होणाऱ्या ऑक्सिजनमधून होतो.

Monday, 2 October 2023

October 02, 2023

3 ऑक्टोबर -दैनंदिन शालेय परिपाठ

 ३ ऑक्टोबर

प्रार्थना 

- ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय...


श्लोक 

- गुणो भूषयते रूपं, शीलं भूषयते कुलम् । सिध्दिर्भूषयते विद्या भोगो भूषयते धनम् ।

-  जय-सावित्री हाला गुणामुळे शोभा येते, शीलसंपन्नतनेने कुलाला शोभा येते, यशामुळे विद्येला शोभा येते. तर उपभोगाने धनाला शोभा येते. 


→ चिंतन साधी राहणी, उच्च विचारसरणी हा गांधीजींनी स्वतःच्या आचारणाने घालून दिलेला आदर्श आहे. ते स्वतः जे कपडे घालीत असत, पदतीचे जेवण घेत असत ते सर्वसामान्य माणसाला परवडणारे साधे असेच होते. गांधीजी स्वतः वकील होते. देशाचे नेते होते, त्यांना कोणतीही नाम वस्तू वापरणे अवघड नव्हते. परंतु या ऐहिक सुखोपभोगापेक्षा मनाच्या, बुध्दीच्या, माणुसकीच्या श्रीमंतीला असणारे महत्व त्यांनी जाणलेले पारतंत्र्याचे चटके, अमानुष वागणुकीच्या यातना यांनी गांधीजी अस्वस्थ झाले आणि त्यातूनच त्यांच्या सत्य, अहिंसा, असंग्रह, असहकार


कथाकथन 

- लालबहादूर शास्त्री (जय जवान जय किसान) – जेमतेम वर्षभरच पंतप्रधानपदावर राहिलेला पण देशाच्या नव्हे, तर जगाच्या सात अजरामर झालेला पंतप्रधान म्हणूनच लालबहादुरांची आठवण राहिली आहे. २ ऑक्टोबर १९०४ साली वाराणसी येथे एका गरीब प्राथमिक शिक्षकाच्या घरी त्यांचा जन्म झाला. ते दीड वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. माता रामदुलारी आपल्या मुलांना पदराखाली पालून हेरी आली. प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणसी येथे झाले. तेथे त्यांना विल्कामेश्वर प्रसाद असे पितृतुल्य गुरु भेटले. गांधी, टिळक, लाला लजपतराय यांच्या जीवनदर्शनाचे तत्व त्यांना समजाविले. अशा उच्च तत्वज्ञानाचा उदय झाला. शिकवण दिली. पोरबंदर येथे गांधी पोरबंदरच्या जोडयाची सवय अपराधाची क्षमा शब्दाचे स्पेलिंग मुलगा बिघडेल. सांगितले लागले. पुढे एका न्याय्य हक्क व नामदार गोपाळ इ. कायदेभंगाचा परपदासाठी यांनी राष्ट्रीय आपले विचार वयाच्या अकराव्या वर्षी बनारस हिंदू विश्वविद्यालयाची कोणशिला बसविण्यासाठी आलेले गांधीजी त्यांना दिसते. तेथे त्यांच्या गाजलेल्या भाषणाने ते भारावून गेले. मग त्यांनी गांधीजींची पाठ सोडली नाही. चंपारण्य सत्याग्रह, रौलेट अॅक्ट, जालियनवाला हत्याकांड इत्यादी घटनांचे प्रतिसाद त्यांच्या मनात घर करून बसले. विदेशीवर बहिष्कार, स्वदेशीचा वापर यातच लालबहादूर गुंतले व त्यातून सुटताच पुन्हा विद्यापीठात दाखल ले. काशी विद्यापीठाचे 'शास्त्री' झाले. आडनाव श्रीवास्तव होते ते 'शास्त्री' झाले. 'सर्व्हरस ऑफ दि पीपल्स' सोसायटीचे सदस्य झाले आणि सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय होते. समानतेचे सूत्र होते. १९२८ साली लाला लजपतराय गेले व पुरुषोत्तमदास टंडन सोसायटीचे अध्यक्ष झाले. ते अलाहाबादला दाखल झाले. त्यांचीच अध्यक्ष म्हणून निवड झाली. विधायक कार्यकर्त्यांची ती पाठशाळाच होती. आचार्य नरेंद्र देव, आचार्य कृपलानी, डॉ. भगवानदास, डॉ. संपूर्णानंद, श्रीप्रकाश यांचा परिचय व मैत्री झाली. नेहरू, शास्त्रींना काँग्रेसचे मवाळ धोरण मान्य नव्हते, १९३७ मध्ये सत्याग्रह करून ते कारावासात गेले. सत्तेची लालसा नव्हती; पण १९४६ साली निवडणुका झाल्या. ते गोविंदवल्लभ पंतांचे सेक्रेटरी झाले. पंत गेल्यावर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. १९५१ साली पं. जवाहरलालजींनी त्यांना काँग्रेसचे सचिव केले. १९५६ साली त्यांना रेल्वेमंत्रीपद दिले. पण एका अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. १९५७ मध्ये त्यांनी काँग्रेसला निवडणुका जिंकून दिल्या. २७ मे १९६४ ला नेहरू गेले. त्यानंतर लालबहादूर एकमताने पंतप्रधान झाले. पाकिस्तानला ही सुसंधी वाटली. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले, 'जय जवान, जय किसान' हा घोषणामंत्र वातावरणात निनादला. भारताने पाकिस्तानात


सुविचार 

• जय जवान जय किसान

• मूर्ती लहान कीर्ती महान

 • असत्य व हिंसा यांचा अवलंब करून खरी लोकशाही कधीही स्थापन करता येणार नाही. 


→ दिनविशेष 

• गांधी सप्ताह : २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर हा ७ दिवसांचा आठवडा- महात्मा गांधीजींच्या स्मृतीनिमित्त महात्मा गांधी म्हणून पाळण्यात येतो. पारतंत्र्याविरूध्द, शोषणाविरुध्द, असत्य असमानता याविरुध्द गांधीजींनी आयुष्यभर संघर्ष केला. आदानं त्यांना राष्ट्रपिता ही मान्यता भारतीयांनी दिली. गांधीजींनी ज्या नीतीतत्त्वांचा पाठपुरावा केला, ती नीतीतचे आचरणात आणणे ही त्यांच्या स्मृतीची खारी ठरेल. गांधीजी म्हणत, "जितके कायदे, तितक्या पळवाटा आणि चोर दरवाजे ! परंतु व्रत मनुष्य स्वच्छेने स्वीकारतो. त्यामुळे व्रत स्वीकारल्यावर पळवाटा आणि चोरदरवाजे शोधत नाही." गांधीजींनी सत्याग्रहींना व्रते घेण्यास सांगितली. या अकरा व्रतांना विनोबांनी एका श्लोकात गुंफले, आश्रमात सकाळच्या आणि संध्याकाळच्या प्रार्थनेमध्ये हा श्लोक एक अविभाज्य भाग बनला. ती व्रते अशी अहिंसा, सत्य, अस्तेय, बह्मचर्य, असंग्रह, शरीरश्रम, अस्वाद, सर्वत्र भयवर्जन, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी, स्पशंभावना, ही एकादश वावी नम्रत्वे व्रतनिश्चये। गांधीजींनी आश्रमालातल्या मुलांना या व्रतासंबंधी पत्रे पाठविली. त्या पत्रांच्या संग्रहाचे 'मंगलप्रभात' या नावाचे पुस्तक प्रसिध्द झालेले आहे.


 मूल्ये 

 • सत्यनिष्ठा, भूतदया

 

 → अन्य घटना 

 • शिवणयंत्र संशोधक होवे एलिअस यांचे निधन - १८६७ 

 • स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म १९०३ 

 • इतिहास - पुरातत्ववेध शास्त्रज्ञ जेम्स बर्डोरप स्मृतिदिन - १९१६

  • पूर्व व पश्चिम जर्मनी एकीकरण- १९९०. 

 

• → उपक्रम 

• महात्मा गांधींचे 'मंगलप्रभात' हे पुस्तक मिळवून वाचा.

•  लाल बहादूर शास्त्रींचे चरित्र वाचा. 


→ समूहगान 

• बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो.... -


सामान्यज्ञान

• राष्ट्रध्वजासाठी विशिष्ट प्रकारचेच कापड वापरावे असा नियम असून कर्नाटकात गदग येथे हे कापड तयार करणारी संस्था आहे. चरख्यावर कातलेल्या सुतापासून हातमागावर ते विणले जाते. त्या कापडाची जाडी व प्रत्येक चौरस सेंमीमधील उभ्या आडव्या धाग्यांची संख्या ठराविक असते.

October 02, 2023

2 ऑक्टोबर -दैनंदिन शालेय परिपाठ

 २ ऑक्टोबर


→ प्रार्थना -

 आई माझा गुरु, आई कल्पतरू, सुखाचा सागरू आई माझी....


→ श्लोक 

- आली जरी कष्टदशा अपार । न टाकिती धैर्य तथापि थोर । केली जरी ज्योत वळेचि खाले । ज्वाला तरी ते वरती उफाळे ।।

-  वाईट परिस्थिती आली, तरी धैर्यवान पुरुष धैर्य सोडीत नाहीत. ज्योत जरी खाली केली, तरी ती वरच्या दिशेलाच उफाळत असते 

→ चिंतन - अहिंसा म्हणजे केवळ हिंसा न करणे नव्हे तर येशूने सांगितले त्याप्रमाणे 'शत्रूवरही प्रेम करा, शेजाऱ्यांवर प्रेम रुपाला गुण अत्यंत एकमेकांवर प्रेम करा.' गांधीजी लिहितात, 'आपला पृथ्वीगोल ज्यांचा बनला आहे. त्या अणूंमध्ये जर एकमेकांशी संलग्न होण्याची प्रेरणा आणि शक्ती नसेल गोलाच्या ठिकऱ्या ठिकन्या होऊन कोणाचे अस्तित्व राहणार नाही. जड वस्तुमात्रांत जशी ही संलग्न राहण्याची प्रेरणा आणि शक्ती होते. पार जीवमात्रातही ती असलीच पाहिजे. ती संलग्न होण्याची व राहण्याची शक्ती म्हणजेच प्रेम. कुटुंबातील माणसांत किंवा मित्रामित्रांत आपल्याला दर्शन होते. (यंग इंडिया दि. ६-१०-१९२१) ' करा, 


→ कथाकथन '

महात्मा गांधी' - हिंदू-मुसलमानांचे तंटे मिटविण्यासाठी जिवाचे रान केले. असत्य व अन्यायविरूध्द झगडण्याची शिक्षा इतिहासा - हरिजनांच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचले, ब्रिटिश सत्तेशी निकराने लढा दिला, द. आफ्रिकेतील हिंदी लोकांना न्याय्य हक्क व सवलती मिशिक्षका सत्याग्रह शस्त्राचा अवलंब करून विजय मिळविला. ज्यांच्या तत्त्वज्ञानाने साऱ्या जगाचे डोळे दिले, अशा महात्मा गांधीचा जन्म गुजरातमध्ये माहेरी झाला. २ ऑक्टोबर १८६९ हा त्यांचा जन्मदिनांक. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते. करमचंद गांधी त्यांनी महाराजांचे दिवाण होते. आई अत्यंत धार्मिक होती. ते शाळेत जाऊ लागले. मित्राच्या नादाने त्यांना वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षी विडीओ लागली. ही चूक ध्यानी येताच, नादान मित्रांची संगत सोडून देऊन, त्यांनी अभ्यासाकडे मन वळविले आणि वडिलांजवळ केलेल्या अ मागितली. त्यांनी मनाशी खरे बोलण्याचा व चूक सुधारण्याचा निश्चय केला. तो पार पाडला. राजकोटमधील शाळेत असताना 'केटल' शब्द प्रतिस शिक्षकाने त्यांना शेजारच्या मुलाचे पाहून लिहिण्यास सुचविले. परंतु स्पेलिंग येत नसल्याने त्यांनी ते चुकीचे लिहिले, परंतु बघून लिहिले नाही. 

१२ व्या वर्षी कस्तुरबाईबरोबर लग्न झाले. सन १८८७ मध्ये मॅट्रिक झाले. पुढील शिक्षणासाठी परदेशात जाऊन आपला मुलगा पि अशी भीती त्यांच्या आईला वाटत होती. तेव्हा त्यांनी आपल्या आईला. "मी वाईट गोष्टीला स्पर्श करणार नाही." असे शपथपूर्वक साि तेव्हा त्यांना परदेशात जाण्यास परवानगी मिळाली. गांधीजी बॅरिस्टर होऊन भारतात परत आले. मुंबई कायकोर्टात वकिली करू लागले. पुढे खटल्यासाठी दक्षिण आफिक्रेत गेले. तेथे भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाविरूध्द लढा दिला. सत्याग्रह पुकारून हिंदी लोकांना न्याय्य हक सवलती मिळवून दिल्या. भारतीय स्वातंत्र्यासाठी धडपडणाऱ्या राष्ट्रीय सभेच्या कलकत्ता येथे भरलेल्या अधिवेशनात प्रथमच हजर राहिले. त्यांचे राजकीय गुरु नामदार गो कृष्ण गोखले यांनी 'गांधीजीच पुढे भारताचे राजकारण करतील' असे भाकित केले. पुढे तेच खरे ठरले. सत्याग्रह, असहकार, दांडी यात्रा चळवळीद्वारा लोकमत जागृत करण्याचा प्रयत्न केला. ६ एप्रिल १९२१ ला त्यांनी पहिला सत्याग्रह केला. १९३० साली असहकार व कायदेभंगाच कार्यक्रम हाती घेतला. उर्मट व उन्मत्त ब्रिटिश राज्यकर्त्यांनी लाठीहल्ला करून त्या वेळी अनेकांना अटक केली. त्यात गांधीजी होते. पुढेपुढे भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र स्वरूप धारण करीत होता. ब्रिटिश हैराण झाले होते. या संदर्भात गांधीजी गोलमेज परिषदांसाठी इंग्लंडला गेले. स्वराज्यप्राप्तीसाठी सत्य व अहिंसेचा वापर केला. दुसऱ्या महायुध्दात जर हिंदी लोकांचे सहकार्य ब्रिटिशांना हवे असेल तर त्यांनी राष्ट्र सरकारची मागणी पुरी करावी, अशी मागणी केली. ८ ऑगस्ट १९४२ ला मुंबई येथे गांधीजींनी 'चले जाव' ची घोषणा केली. आपले विच मांडण्यासाठी त्यांनी 'यंग इंडिया' साप्ताहिक सुरु केले


 सुविचार -

 • एकदा गेलेली वेळ पुन्हा कधीही येत नाही, गेलेला 'काल' पुन्हा आणता येत नाही. आणि येणाऱ्या 'उद्या' बद्दल खात्रीपूर्वक काही सांगता येत नाही. म्हणूनच हाती असणाऱ्या 'आज' चे भान ठेऊन आजचे काम आजच पूर्ण करावे.

  • मन, मनगट, मेंदूचा सर्वांगीण विकास म्हणजे खरे शिक्षण - म. गांधी. 

 

→ दिनविशेष 

- मुंबई दूरदर्शन प्रक्षेपणास सुरुवात - १९७२. - दिनांक १५ सप्टेंबर १९५९ या दिवशी भारतामध्ये प्रथम दिल्ली येथे दूरदर्श सुरुवात झाली. तर हळूहळू प्रसार होत महाराष्ट्रात १९७२ मध्ये मुंबई येथे दूरदर्शन प्रक्षेपण सुरु झाले. हे भारतातील दुसरे दूरदर्शन केंद्र होय. गांधीजयतीक मुहूर्तावर संध्याकाळी ६.३० वा. गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमास सुरुवात झाली. या केंद्रावरून मराठी, हिंदी, गुजरा इंग्रजी व कोकणी या भाषणांमधून कार्यक्रम प्रसारित केले जातात. या दूरदर्शन केंद्रावरून दुसरी वाहिनीही (चॅनेल) सुरु केलेली आहे. भारतात एशिय खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्यानिमित्त १९ नोव्हेंबर १९८२ ला त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधीनी भारतात रंगीत दूरदर्शनची सुरुवात केली दूरदर्शनचे पहिले प्रक्षेपण लंडनमध्ये बीबीसीने १९३६ मध्ये सुरु केले, तर १९५१ मध्ये अमेरिकेत पहिले रंगीत प्रक्षेपण झाले. 


→ मूल्ये 

• ज्ञानसाधना, देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता 


→ अन्य घटना -

 • महात्मा गांधी जयंती - १८६९ 

  • पद्मश्री विनायक पांडुरंग करमकर यांचा जन्म - १८९१.

 • लालबहादूर शास्त्री जयंती - १९०४.० चित्रकार राजा रविवर्मा स्मृतिदिन - १९०६. पं. नेहरुंच्या हस्ते पंचायत राज्याचे उद्घाटन - १९५९. 

  • राष्ट्रीय स्वच्छता दिन - १९६०

   • मुंबईत दूरचित्रवाणी सुरू- १९७२. 

• महाराष्ट्रात प्रौढशिक्षणाचा कार्यक्रम कार्यान्वित - १९७८. 

• शिक्षणमहर्षी पंढरीनाथ पाटील स्मृतीदिन - १९७८.


उपक्रम 

-• भारतातील दूरदर्शन व आकाशवाणी केंद्रे याबद्दल माहिती मिळविणे. 

• महाराष्ट्रातील व इतर राज्यातील 'बालचित्रवाणी' बद्दल


समूहगान -

• सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा... 


सामान्यज्ञान

- • टीव्ही चा मनोरा खूप उंच असावा लागतो. मुंबईचा मनोरा तीनशे मीटर उंच तर सिंहगडावरच पुण्याचा मनोरा बसविला आहे. जगात सर्वात उंच मनोरा ६२८ मीटर उंचीचा असून तो अमेरिकेत फार्गो, नॉर्थकोट येथे आहे.

October 02, 2023

१ ऑक्टोबर -दैनंदिन शालेय परिपाठ

 १ ऑक्टोबर  -दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना

 तुझे मी फेडीन पांग सारे...

 

श्लोक- 

अतिपरिचयादवज्ञा संततगमनादनादरो भवति। मलये भिल्लपुरंधी चन्दनतरूकाष्टं इंधन कुरुते ।

 १अतिपरिचय झाला, सतत येणे-जाणे वाढले की, माणसाचा मान राहत नाही. त्याचा आदर केला जात नाही. मलयपर्वतावरील चंदनाची लाकडे भिल्ल स्त्रिया सरपण म्हणून जाळतात. 


चिंतन-

 गाधीजी म्हणतात की आपल्या अंतरातील आवाज आपल्याला जो आदेश देईल ते सत्य, सत्याला ईश्वर मानून त्याचा लाल आणि तेव्हा तुमचे मन अनन्यनिष्ठ असणे, एकविध असणे आवश्यक आहे. आणि ते तसे राहण्याकरिता भारतीय अध्यात्मशास्त्री सत्य हिंसा ब्रह्मचर्य, अस्तेय व अपरिग्रह या पाच तत्त्वांचा केलेला आहे. नम्रतेवाचून सत्याचा शोध अशक्य आहे. मनुष्याला सत्याचा शोध घेण्यासाठी अहंकार त्यागावा लागतो. त्याशिवाय त्याला असल्यापासून होणाऱ्या दुःखापासून स्वतःला वाचविता येणार नाही.


→कथाकथन 

आपले उध्दारकर्ते आपणच पृथ्वीवर माणसांचे जीवन हे कर्माधीन आहे. जीवनामध्ये यश-अपयश, सुख-दुख, प्रगती अधोगती, - वैभव-दारिद्र्य हे आपल्या कर्मातून प्राप्त होत असते. आपले कर्म उवंगतीला नेणारे असले तर आपली प्रगती होते. आपल्याला परा सुख मिळते. आपले कर्म जर अधोगतीला नेणारे असले, दूषित असले तर आपल्याला दुःख प्राप्त होते. आपण उच्च पदावर पोहचतो. आपल्या उज्वल कर्मानं पोहचतो. आपण अधःपतनाला जातो, खूप खाली जातो, आपल्या कर्माने जातो. आपल्या प्रगतीमध्ये इतर लोक जवाबदार नसतात. दुसरे आपलं कधीच नुकसान करत नाहीत. दुसऱ्यांनी नुकसान केलेले नुकसान थोडंबहुत बाहेरचं नुकसान असतं. खरं नुकसान आपल आध्यात्मिक नुकसान आहे. आणि आध्यात्मिक नुकसान आपल्या हातूनच होत असतं. आपण आपले नुकसान करणारे आहोत आणि आपणच आपले उत्थान करणारे आहोत. परमेश्वरानं आपल्या यशाच्या सर्व किल्ल्या आपल्या हाती दिल्या आहेत. आपल्याला स्वातंत्र्य देऊन टाकलं आहे. परमेश्वराची जबरदस्ती नाही आपल्यावर की, "हे जीवा तू अमूकच कार्य केले पाहिजे." ईश्वरानं खूप स्वातंत्र्य देऊन टाकलं आहे. परमेश्वर आपल्याला शेवटपर्यंत संधी राहतो. ठीक आहे. आता जमलं नाही पुढे करशील. आपल्याला जे दिलं आहे त्याचा उपयोग झाला पाहिजे. धन असलं तर आपण बँकेमध्ये टाकतो. नोंद करतो. खात्यामध्ये बरोबर जमा झाले का ते तपासतो. आपल्या संपत्तीची, कागदपत्रांची आपण खूप काळजी घेतो. ज्या गोष्टी आपल्या मोक्ष मार्गासाठी कुठेच कामात नाही त्या गोष्टींची काळजी येतो आणि आपलं जे अंतःकरण आहे ज्या अंतःकरणात परमेश्वराचा भाव आपण ठेवला पाहिजे, त्या अंत:करणामध्ये राग, द्वेष हे सगळं ठेवतो ती पाण ठेवती, साफ करीत नाही. उलट त्यामध्ये आणखी आणखी भर आपण टाकतो. दररोज निंदा ऐकतो. कानातून आपल्या जीवनात विष ओतलं जात असते. आपलं जीवन दररोज दूषित होत असतं. आपलं अंतःकरण स्वच्छ केलं पाहिजे. भक्तीनं, भावानं, परमेश्वराच्या भजनानं आपल्या अंतःकरणाची शुध्दी होऊ शकते. मिळेल तिथे, मिळेल त्या प्रकारे भगवंताचं भजन केलं पाहिजे. आवडेल तो देव, त्या देवाची आराधना केली पाहिजे. जसं जमेल तसेसमेश्वराकडे गेलं पाहिजे. आपली अध्यात्मिक उन्नती साधली गेली पाहिजे. आपली आध्यात्मिक उन्नती साधली तर हे जे कर्म आहे हे यज्ञ कर्म आहे.


+सुविचार 

• माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी - डॉ. आंबेडकर 

• आपण आपल्या उज्ज्वल कर्मानं उर्ध्वगतीला जातो, आणि दूषित कर्मानं अधःपतनाला जातो. + दिनविशेष 1-

 • भारतात पहिले पोस्टाचे तिकीट छापण्यात आले - १८५४. लॉर्ड डलहौसी भारताचा व्हॉईसरॉय असताना भारतात पहिले पोस्टाचे विकीट छापण्यात आले. त्यापूर्वी थोडेच दिवस इंग्लंडमध्ये सर्वप्रथम छापील तिकीट लावून टपाल पाठविण्यास सुरुवात झाली होती. १ ऑक्टोबर १८५४ ला टपालतिकीट छापण्यात आल्यानंतर भारतीय टपालाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सुरुवातीची तिकिटे पांढऱ्या कागदावर निळ्या रंगात छापलेली होती. ल्यावर व्हिक्टोरिया राणीचे चित्र होते. १९११ मध्ये जगातील पहिली हवाई टपाल सेवा सुरू करणारा भारत हा पहिला देश होय. १९२६ मध्ये नासिक येथे | सरकारी मुद्रणालयाची स्थापना झाली आणि त्या ठिकाणी भारतीय तिकिटे छापली जाऊ लागली. 

 

→ मूल्ये -

• जनसेवा, राष्ट्रीय एकात्मता

 

 →अन्य घटना - 

 • डॉ. अॅनी बेझंट जन्मदिन - १८४७ 

 • मेट्रिक दशमान पद्धती आरंभ - १९५८.

 • ग. दि. माडगूळकर जन्मदिन - १९१९.

  • शिक्षणतज्ज्ञ बाबुराव जगताप स्मृतिदिन - १९७८. 

  

 → उपक्रम - 

 पोस्टाच्या फिलाटेली या उपक्रमाबाबत माहिती मिळवावी

  . • तिकिटे जमविण्याचा छंद जोपासावा. 

  

• समूहगान

  • बहू असोत सुंदर संपन्न की महा...

  

 → सामान्यज्ञान

  १-० १९९१ पासून दरवर्षी १ ऑक्टोबर हा जागतिक वयोवर्धन दिन म्हणून साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्रसंघातर्फे ठरविण्यात आले आहे. आयुष्यभर संपूर्ण कुटुंबाचे ओझे स्वतःच्या खांद्यावर वागविणाऱ्या व्यक्तीस आयुष्याच्या संध्याकाळी मात्र एकाकी व नीरस जीवन जगण्याची वेळ येते, बदलत्या संस्कृतीत उपेक्षेचे जीवन जगावे लागते. आयुष्याच्या संध्याकाळी वृद्धांना सन्मानाने, प्रतिष्ठेने जगता यावे म्हणून हा दिन साजरा करण्याची कल्पना प्रत्यक्षात आली आहे.

Saturday, 30 September 2023

September 30, 2023

दहावी मराठी २०. सर्व विश्वचि व्हावे सुखी

 दहावी मराठी    २०.   सर्व विश्वचि व्हावे सुखी


कृती १ : (आकलन कृती) 

(१) चौकटी पूर्ण करा :

(1) संत ज्ञानेश्वर यांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेली विश्वप्रार्थना

- पसायदान 

--------------------------------------------

(२) पुढील काव्यपंक्तींचा अर्थ लिहा : 


 (i) जे खळांची व्यंकटी सांडो   - माणसांच्या मनातील दुष्ट भाव नष्ट होऊ दे.

 (ii) दुरितांचें तिमिर जावो    -  (दुरित म्हणजे दुष्कर्म.) सर्व      दुष्कर्मांचा अंधार नष्ट होऊ दे.

 -------------------------------------------------------------

  कृती ४ : (स्वमत/अभिव्यक्ती) 

 • सर्व संतांच्या प्रार्थनेमधील सामाईक सूत्र तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा. 

   उत्तर : सकाळी उठल्यावर किंवा घरातून बाहेर पडताना माणूस देवाच्या पाया पडतो आणि 'दिवस चांगला जाऊ दे; कोणत्याही अडचणी नको येऊ देत' अशी आळवणी करतो. रात्री झोपण्यापूर्वी देवाला नमस्कार करून दिवस चांगला गेल्याबद्दल त्याच्याजवळ कृतज्ञता व्यक्त करतो. खरे तर दिवसभरात कधीही संकट आले की, देवाची प्रार्थना करतो. नीट पाहिल्यावर लक्षात येईल की, प्रत्येक माणूस स्वत:साठी, स्वत:च्या कुटुंबीयांसाठी किंवा मित्रमंडळींसाठी देवाकडे याचना करतो. ही खूपच मर्यादित, वैयक्तिक व स्वार्थी प्रार्थना आहे. कारण सामान्य माणसे स्वत:पलीकडे पाहू शकत नाहीत.

संतांचे तसे नाही. त्यांना सर्व प्राणिमात्रांबद्दलच कळवळा वाटतो. त्यांच्या मनात आपपरभाव नसतो. त्यांना सर्व माणसे समान वाटतात; सारखीच प्रिय वाटतात. म्हणून संतमहात्मे सर्व मानवजातीचे कल्याण इच्छितात. म्हणूनच 'जो जे वांछील तो ते लाहो' असे ज्ञानदेव म्हणतात. नामदेवांना वाटते की, सर्वांच्या मनातला अहंकार नष्ट व्हावा. म्हणजे सगळेजण एकमेकाला स्वतःच्या हृदयात सामावून घेतील. संत एकनाथांना सर्वांच्याच ठिकाणी भगवद्भाव आढळतो. संत तुकाराम महाराज सर्वांनी एकमेकाला साहाय्य करीत परमेश्वर चरणांपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवतात. सर्वच संत स्वतःसाठी काहीही मागत नाहीत. ते समस्त मानवजातीसाठी, समस्त प्राणिमात्रांसाठी परमेश्वराकडे हात जोडून प्रार्थना करतात.

-------------------------------------------------

कृती १ : (आकलन कृती)

 (१) पुढील चौकटी पूर्ण करा :

(i) मानवी सुखदुःखाशी सहृदयतेने समरस होणे

 -   मैत्री 

-------------------------------

(ii) 'सर्वांभूती भगवद्भावो' अशी प्रार्थना करणारे संत

  - संत एकनाथ 

-------------------------------

(iii) सामाजिक प्रबोधनावर भर देणारे संत

  - संत गाडगे माहाराज 

------------------------------------------

(iv) संत तुकारामांचे जीवनसूत्र

- परस्पर सहकार्य 

----------------------------------------------------

(२) आकृत्या पूर्ण करा : 

(i) अपयशी माणसासाठी संतांनी केलेले मार्गदर्शन -

 - धर्मकृत्यांसाठी पैसे खर्च करण्याऐवजी तेच पैसे खर्च करून शिक्षण घ्यावे.

 - स्वतःच स्वतःचा उद्धार करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे.

 - सर्वांनी ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे.

 - नेहमी सत्य तेच मांडावे.

--------------------------------------------------------

(ii) संतांना माणसाकडून अपेक्षित असलेल्या आदर्श कृती-

- विनम्रता जोपासावी.

- सहृदय मनाने समरस झाले पाहिजे.

 - परस्पर सहकार्यातून मानवी जीवनाचे कल्याण साधावे.

  - अज्ञान नाहीसे करावे.

------------------------------------------

(iii) संतांनी सांगितलेले मैत्रीचे निकष-

 - सहृदय मनाने समरस होणे. 

 - दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानणे.

   - दुसऱ्यांच्या दुःखात त्याला आधार देणे.

   - आपपरभाव न मानणे.

------------------------------------------------------


• (३) पुढील तक्ता पूर्ण करा. त्यासाठी कंसातील शब्दांचा उपयोग करा : 

   (नम्रता, मैत्रभाव, विश्वकल्याण, स्वप्रयत्न, सहकार्य)

१) 

 काव्यांश         →     'सर्व विश्वचि व्हावे सुखी

संतांचे नाव     → संत तुकडोजी महाराज

व्यक्त भावना   →    विश्व कल्याण

------------------------------------

२) 

काव्यांश            →   'अहंकाराचा वारा न लागो राजसां '  

संतांचे नाव        →  संत नामदेव

व्यक्त भावना     →  नम्रता

--------------------------------------

३) 

काव्यांश            →  'सर्वांभूती भगवद्भावो' 

संतांचे नाव        →   संत एकनाथ

व्यक्त भावना     →    मैत्री भाव

----------------------------------

काव्यांश       →  'एक एका साह्य करूं। अवघे धरू सुपंथ'

संतांचे नाव      →  संत तुकाराम

व्यक्त भावना   →  सहकार्य

----------------------------------------

५) 

काव्यांश           →  'स्वत:चा उद्धार करा प्रयत्नाने '

संतांचे नाव        →   संत गाडगे माहाराज

व्यक्त भावना     →   स्वप्नयत्न

--------------------------------------------

कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती) 

•  भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ।' या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. 

    उत्तर : ही ओळ ऐकताच आपल्या सर्वांच्या मनात एक भाव नक्की जागा होतो. सर्वांना एकमेकांविषयी प्रेम वाटावे, जिव्हाळा निर्माण व्हावा अशी इच्छा ज्ञानदेव देवाकडे व्यक्त करतात. 

        या ओळीतील 'भूत, मैत्र आणि जीव' हे तीन शब्द खूप महत्त्वाचे आहेत. देह धारण करणारा प्रत्येकजण 'भूत' होय. म्हणून जगातली सगळी माणसे भूत होत. पण फक्त माणसेच नव्हेत, तर सूक्ष्मजीवांपासून ते हत्ती- गेंडे यांसारखे सर्व प्राणिमात्र भूत होत. तसेच वृक्षवेली यासुद्धा सजीवच आहेत. त्यासुद्धा भूत होत. या सर्वांच्या मनात एकमेकांबद्दल निर्मळ, पवित्र अशी प्रेमभावना निर्माण झाली पाहिजे, ही इच्छा ज्ञानदेव देवाजवळ व्यक्त करतात. जात, धर्म, भाषा, प्रांत वगैरे गोष्टींवरून आपण अनेकांना शत्रू समजतो. या भावना बाह्य गुणांवर अवलंबून आहेत. ज्ञानदेव या गोष्टींच्या पलीकडे जायला सांगतात. प्रत्येक जण सुखीच असेल. नेमकी हीच मागणी ज्ञानदेव विश्वात्मक देवाकडे करीत आहेत.

---------------------------------------------------

  या पाठातून तुम्ही काय शिकलात, ते तुमच्या शब्दांत लिहा. 

  उत्तर : सर्व संतांनी व्यापक दृष्टिकोन बाळगून लोकांना उपदेश केला आहे. सर्व लोकांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे. एकमेकांना, अडीअडचणीत असलेल्या सर्वांना मदत करावी. सर्वांमध्ये सहकार्याची भावना हवी. या तऱ्हेने सर्वजण वागू लागले, तर समाजात शांती नदिल. माणसे सुखासमाधानाने जगू लागतील. या अशा वातावरणातच माणसे प्रगती करू शकतात. अशा वातावरणात चोऱ्यामाऱ्या होणार नाहीत. दंगेधोपे होणार नाहीत. कोणाची पिळवणूक होणार नाही. कोणाची फसवणूक होणार नाही. कोणावर अन्याय होणार नाही. एकंदरीत, सर्व व्यवस्था ही न्यायावर आधारलेली राहील. म्हणून सर्वांनी एकोप्याने राहावे, असे सर्व संत सांगतात. इतरेजनांशी सहृदयतेने समरस झाले पाहिजे. सर्वांनी शिक्षण घेतले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. हा पाठ वाचून मला हाच संदेश मिळाला.------

--------------------------------------------------------------

 

September 30, 2023

दहावी मराठी 19 तू झालास मूक समाजाचा नायक

 दहावी मराठी  19 तू झालास मूक समाजाचा  नायक

कृती १ : (आकलन कृती) 

 (१) आकृत्या पूर्ण करा : 

 (i) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट

 - मळवाट 

---------------------------------------

(ii) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे

 - खाचखळगे 

--------------------------------------

iii )   डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली कार्ये - 

→  परिस्थितीवर मात करून नवा इतिहास घडवला.

 →  मूक समाजाचे नेतृत्व केले. 

 →  बहिष्कृत भारत जागा केला.

  →  चवदार तळ्याचा संग्राम केला.

------------------------------------------

(२) कवितेतील संदर्भ आणि स्पष्टीकरण यांच्या जोड्या लावा :

कवितेतील संदर्भ                         स्पष्टीकरण

(i) मळवाट              (अ) अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न   शकणारा समाज 

(ii) खाचखळगे          (आ) पारंपरिक वाट

(iii) मूक समाज        (इ) अडचणी, कठीण परिस्थिती

 उत्तर  : (i) मळवाट  →  पारंपरिक वाट

    ii) खाचखळगे    → अडचणी, कठीण परिस्थिती

    iii) मूक समाज   →  अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न  शकणारा समाज 

-----------------------------------------------

                       

कृती २ : (आकलन कृती) 

(१) चवदार तळ्याच्या घटनेनंतरच्या पन्नास वर्षांत वातावरणात झालेल्या बदलाचे वर्णन करणाऱ्या ओळी लिहा.

- (i) सूर्यफुले ध्यास घेत आहेत.

  -  (ii) बिगूल प्रतीक्षा करीत आहे.

 -------------------------------------------

(२) चवदार तळ्याच्या घटनेसंदर्भात तुलना करा :

  पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती

 - (i) सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. 

  - (ii) रणशिंग फुंकले होते.

  - (iii) चवदार तळ्याचे पाणी पेटले होते.

  पन्नास वर्षांनंतरची परिस्थिती 

        - सूर्यफुले ध्यास घेत आहेत. 

       - आता बिगूल वाट पाहत आहे. 

       - आता चवदार तळ्याचे पाणी थंड आहे.

--------------------------------------------------------------

कृती ३ : (काव्यसौंदर्य कृती) 

(१) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कवितेतून जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दांत लिहा. 

  उत्तर : पारंपरिक वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या व दैन्य, दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडणाऱ्या मूक समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नवविचारांचा प्रकाश दाखवला. अन्यायाविरुद्ध न बोलणाऱ्या समाजात जागृती निर्माण केली. सर्व सुखांनी पाठ फिरवलेली असताना व अडचणींचा मार्ग असताना पारंपरिक वाटेने जायचे नाकारून, कठीण परिस्थितीवर मात करून डॉ. बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवला. बहिष्कृत भारताला आत्मविश्वास दिला. अगाध ज्ञानाच्या बळावर लढा पुकारून शोषित जनतेच्या पायातल्या बेड्या मुक्त केल्या. चवदार तळ्याचा संग्राम यशस्वी केला. अशा प्रकारे पीडित व शोषित समाजाला सन्मानाने जगायला शिकवले.

-------------------------------------------------------------

(२) अगाध ज्ञानाच्या बळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर केलेले कार्य, तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा. 

  उत्तर : अतिशय कठीण परिस्थितीमा डॉ. बाबासाह आंबेडकरांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी ही पदवी संपादन केली, ते उच्य विषित होते. त्यांनी ज्ञानाच्या बळावर इथल्या बहिष्कृत समाजाला अन्त करण्याचे अतिशय महत्त्वाचे कार्य अंगिकारले, शोषित, पीडित व वर्णव्यवस्थेतून नाकारलेल्या, समुदयीपासून वंचित असलेल्या जनतेला संघटित केले. त्यांनी 'शिका, संघटित व्हा व कर्म देऊन शोषित समाजाला आत्मविश्वास दिला. अन्यायाविरुदय या देण्यास प्रवृत्त केले. चवदार तळयाचा संग्राम यशस्वी केला. समाजाला बोधितत्त्वाची शिकवण देऊन बौद्ध धर्म स्वीकारला. स्वतंत्र भारता संविधान लिहून भारतीय राज्यघटनेचे ते शिल्पकार ठरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना, त्यांच्या अगाध कर्तृत्वाला मानवंदनासाठी ''भारतरत्न' हा सर्वोच्च बहुमान सन्मानाने बहाल करण्यात आला.

 ------------------------------------------------------------

 

September 30, 2023

दहावी मराठी १८. निर्णय

दहावी मराठी १८.  निर्णय


कृती १ : (आकलन कृती)

आकृत्या पूर्ण करा : 

 हॉटेलमधील मनोज या वेटरच्या अंगचे गुण

 - प्रमाणिकरण

  - प्रसंगावधान

------------------------------------

    दुकानातील रोबोची वैशिष्ट्ये

-  रोबो हुबेहूब माणसासारखे दिसतात.

  - वागतातही माणसासारखे.

   - त्यांची किंमत प्रत्येकी एक लाख रुपये

 - सर्व्हिसिंगचा खर्च दर दोन महिन्यांनी अडीच हजार रुपये

------------------------------------------------

कृती २ : (आकलन कृतों

 रोबोंना काम करण्यासाठी सज्ज करण्याच्या कृतींच्या घटनाक्रमाचा ओघतक्ता तयार करा :

-  (i) चार्जिंग सुरू करणे.

-(ii) रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत चार्जिंग चालू ठेवणे. 

- (iii)सकाळी ६ वाजता कडक इस्त्रीचे कपडे रोबोंना चढवणे. 

- ((iv) डाव्या खांदयावरील पॉवर स्वीच सुरू करणे.

------------------------------------------------

कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती) 

•  रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक पाठाच्या आधारे स्पष्ट करा. 

उत्तर: रोबो हे एक यंत्र आहे. माणूस हा एक मन व हृदय असणारा बुद्धिमान सजीव प्राणी आहे. रोबो सजीव नाही. हॉटेल हेरिटेजमध्ये काम करणारे चार रोबो वेटर हे यंत्र होते. यंत्र असल्यामुळे ते कामे अचूक, अधिक वेगाने आणि सफाईदारपणे करीत असतात. त्यांच्यात कामचुकारपणा असण्याचा प्रश्न निर्माण होत नव्हता. अचानक एके दिवशी त्यांच्यात बिघाड झाला आणि विचित्र पद्धतीने वागून त्यांनी मोठा गोंधळ उडवून दिला. तिथे माणसे असती तर वेगळे चित्र दिसले असते. मानवी वेटरांनी परिस्थिती बघून स्वतःहून कामात योग्य ते बदल केले असते. रोबोंसारखी विचित्र कृती नक्कीच केली नसती. दुसऱ्या प्रसंगी तर झोपलेली बाई आणि बेशुद्ध पडलेली बाई यांच्यातला फरक रोबोंना कळलाच नाही. ती बाई बेशुद्ध पडलेली आहे, हे मनोजला कळले. म्हणून योग्य ती उपाययोजना तातडीने केली गेली आणि त्या बाईचा प्राण वाचला. रोबोला स्वतःची बुद्धी नसल्यामुळे तो स्वतंत्रपणे विचार करू शकला नाही. जिथे जिथे यंत्रमानव आहेत तिथे तिथे हेच घडणार.

----------------------------------------------------------

 •  'तंत्रज्ञान हे माणसाला पूरक आहे, पर्याय नाही, या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.

     उत्तर : मी माझे विचार एका उदाहरणाच्या साहाय्याने सांगतो. एक उच्चशिक्षित दरोडेखोर असतो. तो स्वतःच्या घरातल्या संगणकासमोर बसतो आणि संगणकामार्फत लोकांच्या बँक खात्यांमधून त्यांचे पैसे पळवतो. या दरोडेखोरांना मदत कुणाची होत आहे? त्या संगणकाची, यंत्राची. आता विचार करा. त्या यंत्राच्या जागी माणूस असता तर ? त्या माणसाने त्या दरोडेखोराला मदत केली नसती. म्हणजे आपण करीत असलेले काम योग्य की अयोग्य, चांगले की वाईट, हे यंत्राला ठरवता येत नाही. ते माणूसच ठरवू शकतो. कारण माणसाकडे मन, बुद्धी व भावना या गोष्टी असतात. यंत्राकडे मात्र या गोष्टी नसतात. माणूस स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या अंतःकरणाने काम करतो. यंत्र हे सांगकाम्या नोकर असते. त्याला सज्जन- दुर्जन, पाप-पुण्यवान है काहीही कळत नाही. म्हणून यंत्र कधीच मानवाची जागा घेऊ शकत नाही. कामे त्वरेने, अचूक व सफाईदारपणे करण्यासाठी की मदद करते; म्हणजे ते माणसाला पूरक आहे. ते माणसाला पर्याय ठरू शकत नाही. 

--------------------------------------------------

•  "माणुसकीमुळे माणूस श्रेष्ठ ठरतो, 'या विधानाचा अर्थ स्पष्ट करा. 

  उत्तर : हॉटेल हेरिटेजमध्ये घडलेल्या प्रसंगातून आपल्याला खूप मोलाचा संदेश मिळतो. या हॉटेलमध्ये रोबो वेटर ठेवल्यामुळे खूप फायदा झाला. वेटरसंबंधातल्या समस्या दूर करता आल्या, यात शंका नाही. पण कोणत्याही मानवी व्यवहारांमध्ये एवढे पुरेसे नसते. माणसांशी माणसासारखे वागण्याला खूप महत्त्व असते. असे वागता येण्यासाठी प्रथम आपल्या मनात माणुसकी असावी लागते. रोबो यांत्रिकपणे निर्णय घेतात. एक गोष्ट येथे लक्षात घेतली पाहिजे की, कोणत्याही घटनेने माणसांच्या जीवनात भावनिक व वैचारिक वादळे निर्माण होतात. हा परिणाम प्रत्येकाला ओळखता आला पाहिजे. हे फक्त मानवी मनालाच शक्य आहे. माणसाकडेच माणुसकी असते. सर्व प्राण्यांमध्ये माणूस श्रेष्ठ ठरला, याचे कारण माणसाकडे असलेली माणुसकी होय..

 --------------------------------------------

September 30, 2023

दहावी मराठी १७. सोनाली

दहावी मराठी १७. सोनाली



कृती १ : (आकलन कृती) 

(१) आकृत्या पूर्ण करा :

 लेखकाने निवडलेल्या पिलाची वैशिष्ट्ये

 - जन्म होऊन दोन महिने झाले होते 

 - कमी फिसकार गारे व शांत स्वभावाचे 

 - इतर पिल्लांपेक्षा सशक्त

------------------------------------------

कृती १ : (आकलन कृती)

१) सोनाली आणि रुपाली यांची झोपण्यापूर्वीची दंगामस्ती

- दोघीही बिछान्यात चक्क नाचत, कुदत.  

 - थकल्यावर झोपण्यासाठी आपापली जागा पकडत. 

- रूपाली 'फुस्' करून अंग टाकी व झोपी जाई. 

 - सोनालीला लगेच झोप येत नसे. तिला लहान मुलासारखे थोपटावे लागे. मगच ती झोपी जाई.

------------------------------------------------

कृती २ : (आकलन कृती) 

 (१) तुलना करा : 

सोनाली 

- (i) रुपालीपेक्षा ७ दिवसांनी लहान, लहानखुरी.  दिसायला 

- (ii) रूपाली गुरगुरली की सोनाली बापडी होऊन कोपऱ्यात बसे. 

 - (iii) वय वाढल्यावर रूपालीच्या दुप्पट-चौपट वाढली. 

- (iv) रुपालीला सहज तोंडात उचलून धरी. पण रूपालीला तिचे दात लागत नसत.

 *****

 रूपाली

-(i) वयाने सोनालीपेक्षा मोठी. सुरुवातीला अंगापिंडाने- सुद्धा मोठी.

-(ii) सोनालीवर ताईगिरी करायची. सोनालीवर गुरगुरायची. तिला दमात घ्यायची.

 -(iii) वय वाढल्यावर लहानखुरीच राहिली. 

 -(iv) रुपालीने तरीही आपला ताईपणा सोडला नाही. गुरगुरून 'दटावीत असे. सोनालीला

----------------------------------------------------------------------

 सोनाली आणि रूपाली यांच्यातील मैत्री दर्शवणाऱ्या त्यांच्या दोन सवयी लिहा. 

-(i) सोनाली व रूपाली एकत्र फिरत, एकत्र झोपत 

-(ii) एकत्र जेवण घेत.

-----------------------------------------------------

कृती १ : (आकलन कृती)  

(१) पुढील वाक्यांतून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा :

वाक्ये                   स्वभावाचे पैलू

    (i) रूपाली सोबत नसली तर पंजे मारी. सोनाली जाळीच्या दारावर 

   - सोनाली रूपालीवर मैत्रिणी- सारखे प्रेम करीत होती.

----------------------------------------------------

      (ii) सोनालीने डरकाळी फोडली. मोठ्ठी एक शांत होऊन

       - जेवणाच्या वेळी फसवले, तर तिला संताप येई.

---------------------------------------------------

 (iii) सोनाली लेखकाचे पाय चाटू लागली.

- झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागण्याची ही वृत्ती दिसून येते.

-----------------------------------------------

(३) पुढील घटना केव्हा घडल्या ते लिहा : 

घटना केव्हा घडली? 

 घटना                            

(1) सोनाली अण्णांवर रागावली. 

(ii) सोनालीने  पातेल्याची चाळणी केली. 

(iii) लेखक हातातले काम टाकून दरवाजाजवळ धावले.

केव्हा घडली?

- (i) जेवणाचा डबा न घेताच अण्णा गच्चीत सोनालीकडे गेले, तेव्हा. 

- (ii) सोनालीला दूध प्यायला दिलेले पातेले लेखक परत आणायला विसरले, तेव्हा. 

-  (iii) सोनालीची बंगल्याच्या घुमली, तेव्हा. डरकाळी आवारात. 

------------------------------------------------------

कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती)

  •'पशूंना कोणी फसवले तर त्यांना राग येतो,' यासंबंधी तुम्ही अनुभवलेली घटना तुमच्या शब्दांत लिहा. 

           उत्तर : ही आमच्या गावातली प्रत्यक्षात घडलेली घटना आहे. सुट्टीमध्ये टेकाडावरच्या वडाच्या झाडावर पकडापकडी खेळणे हा आमचा लाडका खेळ असे. असेच आम्ही एकदा पारंब्यांना लोंबकळत खेळत होतो. निरंजनने बिस्किटे आणली होती. ती आम्ही वरच्या वर एकमेकांकडे फेकत आणि झेलत होतो. झोके घेता घेता झेल घेणे खूप कौशल्याचे होते. आम्ही बिस्किटे खात होतो. एखादे खाली पडत होते. आमच्या सोबतचा कुत्रा ते पडलेले बिस्कीट खाई. ते पाहून निरंजनला लहर आली. तो खाली उतरला. त्याने एक बिस्कीट दूर फेकले. दूरवर जाऊन त्या कुत्र्याने ते खाल्ले. नंतर नंतर निरंजन बिस्किटे फेकण्याची बतावणी करू लागला. विचारा कुत्रा धावत जाई पण त्याला काही मिळत नसे. तो रागाने गुरगुर करीत होता. निरंजनने पातळसा दगड घेऊन बिस्कीट म्हणून फेकला. कुत्रा मोठ्या आशेने तिकडे धावला. पण बिस्कीट नाही, हे कळताच तो चवताळला. संतापाने निरंजनकडे धावला. निरंजन घाबरून पारंबीवर चढला. सरसर वर चढू लागला. चवताळलेला कुत्रा तिथे आलाच. त्याने झेप घेतली आणि निरंजनला पकडले. पण निरंजनची पॅन्ट फक्त त्याच्या तोंडात आली. पॅन्ट टर्रर्र करून फाटली. आम्ही सगळे स्तब्ध होऊन बघतच राहिलो. 

-------------------------------------------------------

कृती : (स्वमत/अभिव्यक्ती) 

• सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा. 

 उत्तर : वन्य प्राणी हिंस असतात, अशी सर्व माणसांची समजूत आहे. अन्य प्राण्यांना मारण्यासाठीच ते टपलेले असतात, अशीही एक समजूत माणसांमध्ये निर्माण झालेली आहे. पण वन्य प्राणी माणसांप्रमाणे उत्कटपणे प्रेम करू शकतात, नव्हे करतात, हा हृदय अनुभव या पाठात ठायी ठायी प्रत्ययाला येतो. दीपालीवर सोनालीचा खूप जीव होता. दीपाली सोनालीबरोबर तासन्तास खेळत बसे. पण तिला सोनालीने कधीही इजा केली नाही. एकदा दीपाली सोनालीबरोबर खेळत बसली होती. तेवढ्यात एक पेशन्ट तिथे आला. त्याला ते दृश्य पाहून धक्काच बसला. दीपाली चुकून सिंहिणीकडे गेली असावी, या कल्पनेने तो धावला आणि त्याने दीपालीला चटकन उचलून घेतले. एक परका माणूस प्रिय व्यक्तीला उचलून घेतो याचा सोनालीला संताप आला. ती त्याच्यावर फिसकारली आणि चवताळून त्याच्यावर धावली. तिचा तो अवतार पाहून त्याने दीपालीला तशीच टाकली. तेवढ्यात अण्णा बाहेर आले. त्यांना घडलेली हकिकत समजली. तो प्रसंग प्रत्यक्ष पाहण्यासाठी अण्णांनी त्या गृहस्थाला दीपालीला उचलायला सांगितले. त्या गृहस्थाने दीपालीला हात लावला, मात्र सोनाली चवताळून त्याच्या अंगावर धावली. लेखकांचे घर हे आता तिला स्वतःचे घर वाटत होते. घरातली माणसे ही आता तिची माणसे झाली होती. परक्या माणसांनी घरातल्या माणसांना हातसुद्धा लावणे तिला मंजूर नव्हते. सोनालीच्या मनातली प्रेमाची ही उत्कट भावना या प्रसंगातून व्यक्त होते..

----------------------------------------------------------------------------

 

September 30, 2023

दहावी मराठी १६. आकाशी झेप घे रे (कविता)

दहावी मराठी १६. आकाशी झेप घे रे (कविता) 

कृती १ : (आकलन कृती) 

(१) योग्य पर्याय ओळखा :

(1) सुखलोलुप झाली काया म्हणजे  - सुख उपभोगण्याची सवय लागते.

(ii) पिंजरा सोडून शेप घेतल्याने  - आपल्याला स्व-सामर्थ्याची जाणीव होते.

(iii) देवाने पंख दिल्यामुळे   - शक्तीने संचार करता येतो.

---------------------------------------------------

(३) कवीने यशप्राप्तीच्या संदर्भात सांगितलेली सुवचने लिहा :

 (i) - तुला देवाने पंख दिले आहेत. सामर्थ्याने विहार कर.

  (ii) - कष्टाविण फळ मिळत नाही.

---------------------------------------------------------

कृती २ : (आकलन कृती) 

 (१) तुलना करा :

 पिंजऱ्यातील पोपट

(i) पारतंत्र्यात राहतो 

 (ii) लौकिक सुखात रमतो 

(iii) कष्टाविण राहतो

(iv) जीव कावराबावरा होतो

 (v) मनात खंत करतो

*******

 पिंजऱ्याबाहेरील पोपट 

- स्वातंत्र्य उपभोगतो 

- स्वबळाने संचार करतो 

- कष्टात आनंद घेतो

- मन प्रफुल्लित होतेसुंदर जीवन जगतो

------------------------------------------

(४) पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा :

- तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने

---------------------------------------------

कृती ३ : (काव्यसौंदर्य कृती) 

 (१) 'आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा' या ओळींतील मथितार्थ स्पष्ट करा. 

  उत्तर : 'आकाशी झेप घे रे' या कवितेमध्ये कवी जगदीश खेबुडकर यांनी पारतंत्र्यात खितपत पडलेल्या पाखराला म्हणजेच माणसांच्या परावलंबी मनाला मोलाचा उपदेश केला आहे व स्वातंत्र्याचे मोल समजावून सांगितले आहे. 

    प्रस्तुत ओळीतील मथितार्थ असा की यामध्ये पाखराला आकाशात भरारी घेण्याचे आवाहन केले आहे. वैभव, सत्ता, संपत्ती हा लौकिकातील सोन्याचा पिंजरा आहे. त्यात अडकलेल्या जिवाची गती खुंटते. त्याच्या जीवनाची प्रगती होत नाही. सुखसोईमुळे कर्तृत्व थांबते. म्हणून हा सोन्याचा पिंजरा सोडून ध्येयाच्या मोकळ्या व उंच आकाशात तू झेप घे. अशा प्रकारची आत्मिक शिकवण या ओळींतून प्रत्ययाला येते.

----------------------------------------------------------

(२) 'स्वसामर्थ्याची जाणीव' हा उत्तम व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे, ' हे विधान स्पष्ट करा.

 उत्तर : जीवन जगत असताना माणसाला अनेक अडचणींना तोंड दयावे लागते. समस्यांचा सामना करता करता कधी माणूस हतबल होऊन जातो. मग तो देवावर हवाला ठेवू लागतो. नशिबाला दोष देतो. पण हे असे वागणे अगदी नकारात्मक आहे. परिस्थिती बदलण्याचा माणसाने निकराने प्रयत्न करायला हवा. 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे।' अशी समर्थ रामदासांची उक्ती आहे. त्याप्रमाणे आत्मबळ एकवटणे महत्त्वाचे ठरते. स्वतःच्या सामर्थ्यावर भरवसा ठेवता आला पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन गोरगरिबांच्या शिक्षणाची सोय केली. 'रयत शिक्षण संस्था' निर्माण केली. आज त्याचा महावृक्ष झाला आहे. यावरून असे स्पष्ट होते की 'स्वसामर्थ्याची जाणीव' हा उत्तम व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे. 

--------------------------------------------------------

(३) 'घर प्रसन्नतेने नटले, ' याची प्रचिती देणारा तुमचा अनुभव लिहा. 

   उत्तर : कवी जगदीश खेबुडकर यांनी 'आकाशी झेप घे रे' या कवितेमध्ये माणसाला उपदेश करताना घर प्रसन्नतेने नटायचे असेल तर श्रमदेवाची पूजा करावी लागेल, हे समजावून सांगितले आहे. कोणतीही गोष्ट घरबसल्या मिळत नाही. 'दे रे हरी । खाटल्यावरी' असा चमत्कार होणे शक्य नसते. घर प्रसन्नतेने कसे नटते याची प्रचिती देणारा माझा स्वतःचा अनुभव सांगतो - मला माझ्या आईसाठी थंडीमध्ये स्वेटर विणायचे होते, मी अभ्यासाची व शाळेची वेळ सांभाळून फावल्या थोड्या वेळात दररोज एक तास काढून कष्टाने स्वेटर विणले, ते आईला देताना तिच्या डोळ्यांत जे आनंदाश्रू चमकले, तेच माझ्या कष्टाचे फळ होते. आईचा तो आनंद पाहून मला घर प्रसन्नतेने नटल्याचा अवीट अनुभव आला.

------------------------------------------------------

• प्रश्न. पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा :      'घामातुन मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले. '

 उत्तर : आशयसौंदर्य : सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांची 'आकाशी झेप घे रे' ही मराठी चित्रपटातील एक गीतरचना आहे. स्वसामर्थ्यावर अदम्य विश्वास ठेवून कर्तृत्वाचे मोकळे आकाश ओळखावे आणि ध्येयाकडे उंच भरारी घ्यावी, परावलंबित्व सोडून स्वावलंबी व्हावे, ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. स्वकर्तृत्वाने यशाचे शिखर गाठावे व उच्च ध्येयाकडे झेप घ्यावी. पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचे मोल जाणावे, हा अमूल्य संदेश ही कविता देते.

काव्यसौंदर्य : वरील ओळींमध्ये कवींनी श्रमाचे महत्त्व सांगितले आहे. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. अविरत प्रयत्न व काबाडकष्ट करून जेव्हा शेतकरी शेतामध्ये खपतो, तेव्हा त्याला मोत्यांसारखे पीक मिळते. त्याच्या घामातून मोती फुलतात. ते धनधान्य त्याच्या घरी येते, तेव्हा त्याच्या श्रमाचे सार्थक होते. जणू श्रमदेव त्याच्या घरी अवतरतात.

भाषिक वैशिष्ट्ये : ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. रसाळ शब्दकळा व नेमके मर्म सांगणारी भाषा हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. 'पिंजरा' हे सुखलोलुपतेचे प्रतीक वापरले आहे व त्यात कैद झालेल्या मानवी मनाला 'पक्षी' म्हटले आहे. साध्या शब्दांत गहन आशय मांडला आहे. यमकप्रधान गेय रूपामुळे कविता मनात ठसते.

------------------------------------------------

 

September 30, 2023

दहावी मराठी १५. खोद आणखी थोडेसे

दहावी मराठी  १५.  खोद आणखी थोडेसे



कृती १ : (आकलन कृती)

 (२) आकृती पूर्ण करा :

 'मनातले गाणे' असे म्हटल्यावर तुम्हांला सुचणाऱ्या कल्पना 

- आईवडिलांविषयी कृतज्ञता भाव

 - देशप्रेम, मातृभूमीचा अभिमान

 - गुरुजनांविषयी आदर

 - मित्र/मैत्रिणींबद्दलचा जिव्हाळा

------------------------------------------------------

(३) कवितेतील पुढील संकल्पना व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा : 


      कवितेतील संकल्पना                       संकल्पनांचा अर्थ

  (i) सारी खोटी नसतात नाणी  नसतात.      - सगळे लोक फसवे

 (ii) घट्ट मिटू नका ओठ   करावेत.     - मनातील विचार व्यक्त

 (iii) मूठ मिटून म्हणायचे भरलेली कशाला  - भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत.

 (iv) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी  - मनातील  सामर्थ्य व्यापक बनवावे

  --------------------------------------------------------------------                                                                                                        

कृती २ : (आकलन कृती)      

 (३) योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा : 

(i) 'खोदणे' या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे..... 

  - जिद्दीने आणखी प्रयत्न करणे.

---------------------------------            

  (ii) गाणे असते मनी म्हणजे...... 

 - मनात नवनिर्मिती क्षमता असते.

-------------------------------

(४) कवितेच्या आधारे पुढील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा :

  (i) संयमाने वागा तली तळी.             -                 योग्य 

  (ii) सकारात्मक राहा                       -                  योग्य   

  (iii) उतावळे व्हा                              -              अयोग्य             

  (iv) चांगुलपणावर विश्वास ठेवा          -               योग्य

  (v) नकारात्मक विचार करा                -             अयोग्य

   (vi) खूप हुरळून जा                        -             अयोग्य

   (vii) संवेदनशीलता जपा                  -              योग्य

   (viii) जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा  -  योग्य 

   (ix) जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा         -        अयोग्य

    (x) नवनिर्मितीवर विश्वास ठेवा                -          योग्य

    (xi) धीर सोडू नका                              -         योग्य

    (xii) यशाचा विजयोत्सव करा                 -      अयोग्य  

----------------------------------------------------           

कृती ३ : (काव्यसौंदर्य कृती) 

 (१) 'आर्त जन्माचे असते, रित्या गळणाऱ्या पानी' ओळींमधील अर्थ तुमच्या भाषेत लिहा.  उत्तर : कवयित्री आसावरी काकडे यांनी 'खोद आणखी थोडेसे' या कवितेमध्ये माणसाने प्रयत्नवादी होऊन जगण्याची उमेद धरावी, असा उपदेश केला आहे. 

     कवयित्री म्हणतात - • घट्ट ओठ मिटून दुःख सोसत बसू नये. आपल्या मनात खोलवर एक गाणे लपलेले असते, ते शोधून काढायला हवे. हे समजावताना त्यांनी 'गळणाऱ्या पानाचे' प्रतीक वापरले आहे. शिशिरऋतूमध्ये पानगळ होते. झाड निष्पर्ण होते. परंतु जे पान सुकून, रिते होऊन झाडापासून विलग होते त्या पानात झाडावर असताना सोसलेल्या वेदना असतात. हे जन्माचे आर्त, आयुष्यात सोसलेल्या वेदना, त्या सुरकुतलेल्या गळणाऱ्या पानात सामावलेल्या असतात म्हणून पुन्हा वसंतात पालवी फुटण्याची उमेद ते बाळगून असते. गळणाऱ्या पानामधून जीवन जगण्याची उमेद पुन्हा जागृत होते, हा आशावाद या ओळींतून व्यक्त झाला आहे.

--------------------------------------------------------------

(२) 'गाणे असे गं मनी' या ओळीतील तुम्हांला समजलेला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश स्पष्ट करा. 

  उत्तर : आसावरी काकडे यांनी 'खोद आणखी थोडेसे' या कवितेमधून सकारात्मक जीवन जगण्याची शिकवण देताना प्रत्येकाच्या मनात असलेल्या निर्मितिक्षमतेला आवाहन केले आहे.

        कवयित्रींच्या मते - मातीखाली लपलेला झरा शोधेपर्यंत माणसाने अथक प्रयत्न करायला हवेत. धीर एकवटून आयुष्याचा सकारात्मक शोध घ्यायला हवा. घट्ट ओठ मिटून दुःख सोसत राहू नये. प्रत्येकाचे मन हे निर्मितिक्षम असते. त्या अंतर्मनातील गाभ्याशी ज्याचे त्याचे गाणे दडलेले असते. मनाच्या तळाशी असलेले हे गाणे मर्मबंधाची ठेव असते. आपल्यात मग्न होऊन ते गाणे अनुभवणे हे जीवनाचे सार्थक ठरते. आपल्यातल्या निर्मितिक्षमतेचा शोध आपणच घ्यायला हवा. मनात असलेली निर्मितिक्षमता जागी करायला हवी म्हणजे मग 'आनंदाचे डोही आनंद तरंग' ही अवस्था अनुभवता येईल. 

     अशा प्रकारे कवयित्रींनी 'गाणे असते गं मनी' या ओळीतून माणसाला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश दिला आहे.

------------------------------------------------------------

(३) 'परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही' याबाबतीत तुम्ही घेतलेला अनुभव लिहा. 

  नमुना उत्तर : आमचे 'बाभूळगाव' हे गरीब शेतकऱ्यांचे गाव होय। डोंगरझाडी व विकट मार्ग त्यामुळे ते तालुक्याच्या गावापासून लांब व सोयींच्या बाबतीत अडचणीचे आहे. आमच्या गावात जेमतेम चौथीपर्यंतच शाळा, तीही एकशिक्षकी एका पडक्या घरात भरायची. पाचवीनंतरच्या विद्याथ्र्यांना जंगलातून वाट काढत दहा किलोमीटर लांबवर तालुक्याच्या गावच्या शाळेत जावे लागायचे. आमचे रोकडे मास्तर फार मेहनती होते. त्यांनी तालुक्याच्या शिक्षणाधिकाऱ्याला एक अर्ज लिहिला व आम्हां मुलांना प्रत्येक पालकाची त्यावर सही आणायला सांगितले. प्रत्येक विदयार्थ्याने आपापल्या पालकांची सही व अंगठा आणला. पंचक्रोशीतही आम्ही जाऊन मोठमोठ्या माणसांना भेटलो. त्यांच्या शिफारशी गोळा केल्या. गेल्या १५ ऑगस्टला आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले व गुरुजींनी त्यांना पुढच्या शिक्षणव्यवस्थेचा अर्ज दिला. काही निवडक मुलांनी भाषणे करून पुढील शिक्षणाची व्यवस्था गावात होण्यासाठी विनवले. अखेर अथक व निष्ठेने केलेल्या प्रयत्नांमुळे आमच्या गावात जि.प. ची शाळा मंजूर झाली. आम्हांला 'परिश्रमाचे फळ' मिळाले!

--------------------------------------------------------------