Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, २७ मार्च, २०२४

मार्च २७, २०२४

आठवी इतिहास 7.असहकार चळवळ

 7असहकार चळवळ


स्वाध्याय

प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्जासमोर दिलेल्या पर्याय-क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय-क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :


1. इ. स. 1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड -' ------या नावाने ओळखला जातो.


(1) मवाळयुग


(2) जहालयुग


(3) क्रांतिकारीयुग


(4) गांधीयुग


उत्तर-गांधीयुग

_____________

2. गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात ------. या देशातूनकेली.

(1) भारत


(2) इंग्लंड


(3) दक्षिण आफ्रिका


(4) म्यानमार


उत्तर-दक्षिण आफ्रिका

_________________

3. 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय   चळवळीची सूत्रे ----यांच्याकडे आली.


(1) दादाभाई नौरोजी


(2) सुभाषचंद्र बोस


(3) महात्मा गांधी


(4) पंडित जवाहरलाल नेहरू


उत्तर-महात्मा गांधी

_______________

4. 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतलेल्या गांधीजींना ------यांनी देशदौरा करण्याचा सल्ला दिला.


(1) नामदार गोपाळ कृष्ण गोखले


(2) लोकमान्य टिळक


(3) दादाभाई नौरोजी


(4) सुरेंद्रनाथ बॅनर्जी


उत्तर-नामदार गोपाळ कृष्ण गोखले

___________________

5. गांधीजींनी राष्ट्रसेवेचे व्रत स्वीकारल्यानंतर कोठे राहू लागले ?


(1) अहमदाबाद - साबरमती


(2) पुणे - आगाखान पॅलेस


(3) मुंबई - मणिभवन


(4) वर्धा - सेवाग्राम आश्रम


उत्तर-अहमदाबाद - साबरमती

_____________________

6. महात्मा गांधीजींच्या सत्याग्रह मार्गाचा प्रभाव भारताबाहेरील कोणत्या नेत्यांवर पडला?


(1) नेल्सन मंडेला व अॅनी बेझंट


(2) मार्टिन ल्यूथर किंवा व नेल्सन मंडेला


(3) मार्टिन ल्यूथर किंग व अॅलन हयूम


(4) नेल्सन मंडेला व सर विल्यम वेडरबर्न


उत्तर-मार्टिन ल्यूथर किंवा व नेल्सन मंडेला

______________________

7. चंपारण्य जिल्ह्यातील सत्याग्रह करून गांधीजींनी कोणाला न्याय मिळवून दिला ?


(1) गुजरातमधील शेतकरी


(2) गिरणी कामगार


(3) नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना


(4) कामगारवर्ग व सामान्य जनता


उत्तर-नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना

___________________

8.शेतकऱ्यांनी 1918 मध्ये कोणत्या जिल्हयात साराबंदीची चळवळ सुरू केली?


(1) गोरखपूर


- (2) खेडा


(3) सोलापूर


(4) अमरावती


उत्तर-खेडा

________

9. गांधीजींच्या नेतृत्वाखाली अहमदाबाद येथील कामगारांनी केव्हा लढा दिला?


(1) 1917


(2) 1918


(3) 1919


(4) 1920


उत्तर-1918

__________

10. राष्ट्रीय आंदोलन दडपण्यासाठी ब्रिटिश सरकारने---- हा कायदा संमत केला.


(1) रौलट कायदा


(2) माँटफर्ड कायदा


(3) मोर्ले-मिंटो कायदा


(4) 1935 चा कायदा


उत्तर-रौलट कायदा

________________

11. 'रौलट कायदा' हा काळा कायदा म्हणून ओळखला गेला; कारण------


(1) या कायदयान्वये स्वातंत्र्य चळवळ बंद पाडण्यात आली.


(2) या कायदयान्वये संशयित व्यक्तीला विनावॉरंट व विना चौकशी तुरुंगात टाकण्याचा अधिकार ब्रिटिश सरकारला प्राप्त झाला.


(3) या कायद्यान्वये शेतकऱ्यांवर अन्याय्य शेतसारा आकारण्यात आला.


(4) या कायदयान्वये गिरणी कामगारांवर अनेक बंधने लादण्यात आली.


उत्तर-या कायदयान्वये संशयित व्यक्तीला विनावॉरंट व विना चौकशी तुरुंगात टाकण्याचा अधिकार ब्रिटिश सरकारला प्राप्त झाला.

________________________

12. अमृतसरमधील जालियनवाला बाग सभेतील निःशस्त्र लोकांवर -----याने गोळीबार करण्याचा आदेश दिला.


(1) जनरल लेक


(2) जनरल नील


(3) जनरल डायर


(4) जनरल किचनेर 


उत्तर-जनरल डायर

________________

13. अमृतसर येथील हरताळप्रकरणी कोणाला अटक करण्यात आली ?


(1) डॉ. सत्यपाल व सैफुद्दीन किचलू


(2) डॉ. सत्यपाल व महात्मा गांधी


(3) महात्मा गांधी व सैफुद्दीन किचलू


(4) सैफुद्दीन किचलू व रवींद्रनाथ टागोर


उत्तर-डॉ. सत्यपाल व सैफुद्दीन किचलू

_________________________

14. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या ' -------या किताबाचा त्याग केला.


(1) लॉर्ड


(2) सर


(3) रावबहादूर


(4) रावसाहेब


उत्तर-सर

________

15. जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सरकारने कोणत्या कमिशनची नियुक्ती केली?


(1) इंटर


(2) सायमन


(3) रौलट


(4) ओडवायर


उत्तर-इंटर

________

16. भारतीय मुस्लिमांनी कोणाला पाठिंबा देण्याकरिता खिलाफत चळवळ सुरू केली?


(1) इराणचा सुलतान


(2) तुर्कस्तानचा सुलतान


(3) अरबस्तानचा सुलतान


(4) उझबेकिस्तानचा सुलतान


उत्तर-तुर्कस्तानचा सुलतान

___________________

17.------ चळवळीमध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्य विशेषत्वाने दिसून आले.


(1) खिलाफत चळवळ


(2) असहकार चळवळ


(3) चले जाव चळवळ


(4) सविनय कायदेभंग चळवळ


उत्तर-खिलाफत चळवळ

___________________

18. 1920 मधील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनातील ठरावानुसार खालील बाबींवर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. त्यातील चुकीचा पर्याय कोणता ?


(1) शासकीय कार्यालये


(2) न्यायालये


(3) स्वदेशी वस्तू


(4) सरकारी शाळा व महाविदयालय


उत्तर-स्वदेशी वस्तू

______________

19. 1920 च्या ------अधिवेशनात राष्ट्रीय सभेने असहकार चळवळीच्या ठरावाला मंजुरी दिली.


(1) कलकत्ता


(2) मद्रास


(3) नागपूर


(4) अलाहाबाद


उत्तर-नागपूर

___________

20. नागपूरच्या अधिवेशनात---- मांडला, यांनी असहकाराचा ठराव


(1) महात्मा गांधी


(2) चित्तरंजन दास


(3) पंडित जवाहरलाल नेहरू


(4) सुरेंद्रनाथ बॅनर्जी


उत्तर-चित्तरंजन दास

________________

21. कोणत्या घटनेमुळे गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली ? पुढील पर्यायांतून निवडा :


(1) चौरीचौरा येथील पोलीस चौकीला जमावाने आग लावली.


(2) गांधीजींना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली.


(3) जालियनवाला बाग हत्याकांड लॉर्ड कर्झनने घडवून आणले.


(4) रौलट कायदा अमलात आला.


उत्तर-चौरीचौरा येथील पोलीस चौकीला जमावाने आग लावली.

________________________

22. 'यंग इंडिया' या वृत्तपत्रातील लेख राष्ट्रद्रोही आहेत, असा कोणावर आरोप ठेवण्यात आला ?


(1) पंडित जवाहरलाल नेहरू


(2) सुरेंद्रनाथ बॅनर्जी


(3) महात्मा गांधी


(4) चित्तरंजन दास


उत्तर-महात्मा गांधी

________________



23. असहकार कार्यक्रमाबरोबरच गांधीजींनी विधायक कार्यक्रमही दिला. त्या विधायक कार्यक्रमात समाविष्ट नसलेली बाब कोणती ?


(1) मद्यपान बंदी


(2) खादीचा प्रसार


(3) अस्पृश्यता निवारण


(4) परदेशी वस्तूंचा वापर


उत्तर-परदेशी वस्तूंचा वापर

___________________

24. महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ केव्हा स्थगित केली ?


(1) 12 फेब्रुवारी 1920


(2) 12 फेब्रुवारी 1922


(3) 10 फेब्रुवारी 1923


(4) 12 मार्च 1922


उत्तर-12 फेब्रुवारी 1922

____________________

25. ------मध्ये पंडित मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास यांनी 'स्वराज्य पक्षा 'ची स्थापना केली.


(1) 1921


(2) 1920


(3) 1922


(4) 1923


उत्तर-1922

__________




26. 1923 च्या केंद्रीय व प्रांतिक कायदेमंडळांत नसलेला नेता कोण ?


(1) महात्मा गांधी


(2) न. चिं. केळकर


(3) लाला लजपतराय


(4) मदन मोहन मालवीय


उत्तर-महात्मा गांधी

_______________

27. जनतेतील असंतोष दूर करण्यासाठी सरकारने सर सायमन यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती केव्हा नियुक्त केली ?


(1) 1920


(2) 1922


(3) 1925


(4) 1927


उत्तर-1927

__________

28. सायमन कमिशनवर राष्ट्रीय सभेने बहिष्कार घालण्याचे का ठरवले ?


(1) या कमिशनमध्ये सात सदस्य होते


(2) या कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नसल्याने


(3) माँटेग्यू-चेन्सफर्ड सुधारणा कायदा केल्यामुळे


(4) सर सायमन हे या समितीचे अध्यक्ष होते म्हणून


उत्तर-या कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नसल्याने

____________________


29. सायमन कमिशनच्या विरोधातील -----येथील निदर्शनाचे         नेतृत्व लाला लजपतराय करीत होते. 


(1) लाहोर


(2) अमृतसर


(3) कोलकाता


(4) मुंबई


उत्तर-लाहोर

__________

30. सायमन कमिशनविरोधात निदर्शनाचे नेतृत्व करणाऱ्या लाला लजपतराय यांच्यावर -----या उद्दाम पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या लाठीहल्ल्यात घायाळ होऊन त्यातच त्यांचे निधन झाले.


(1) ओडवायर


(2) साँडर्स


(3) डायर


(4) हंटर


उत्तर-साँडर्स

_________

31. "लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एकेक खिळा ठोकला जात आहे." हे विधान कोणाचे आहे?


(1) पं. जवाहरलाल नेहरू


(2) रवींद्रनाथ टागोर


(3) महात्मा गांधी


(4) लाला लजपतराय


उत्तर-लाला लजपतराय

__________________


32. भारतीय नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका कोणी केली ?


(1) भारतमंत्री बर्कनहेड


(2) भारतमंत्री माँटेग्यू


(3) गव्हर्नर मायकल ओडवायर


(4) सर जॉन सायमन


उत्तर-भारतमंत्री बर्कनहेड

__________________





33. 1929 च्या लाहोर येथील राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते ?


(1) मोतीलाल नेहरू


(2) महात्मा गांधी


(3) पंडित जवाहरलाल नेहरू (4) सुभाषचंद्र बोस


उत्तर-पंडित जवाहरलाल नेहरू

________________________





34. संपूर्ण स्वराज्याची मागणी करणाऱ्या तरुणांचे नेते कोण होते?


(1) पंडित मोतीलाल नेहरू


(2) सुभाषचंद्र बोस


(3) महात्मा गांधी


(4) चित्तरंजन दास


उत्तर-सुभाषचंद्र बोस

_______________



35. लाहोर अधिवेशनानंतर----हा दिवस 'स्वातंत्र्यदिन' म्हणून पाळण्यात यावा असे ठरले.


(1) 15 ऑगस्ट


(2) 9 ऑगस्ट


(3) 30 जानेवारी


(4) 26 जानेवारी


उत्तर-26 जानेवारी

_______________





36. रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचा तिरंगा ध्वज केव्हा फडकवला ?


(1) 30 डिसेंबर 1929


(2) 31 डिसेंबर 1929


(3) 31 डिसेंबर 1930


(4) 26 जानेवारी 1930


उत्तर-31 डिसेंबर 1929

___________________




37. सेनापती बापट यांनी----- सत्याग्रहाचे नेतृत्व केले.


(1) पेशावर


(2) धारासना


(3) सोलापूर


(4) मुळशी


उत्तर-मुळशी

___________




38. पांडुरंग महादेव बापट यांनी कोणाच्या हक्कासाठी मुळशी सत्याग्रह केला ?


(1) धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या न्याय्य हक्कांसाठी


(2) मळेवाल्या शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी


(3) कामगारांच्या हक्कांसाठी


(4) शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी


उत्तर-धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या न्याय्य हक्कांसाठी

______________________

39. खालील चित्रातील घटना कोणत्या सालातील आहे?


(1) 1919


(2) 1928


(3) 1927


(4) 1929


उत्तर-1928

___________

मंगळवार, २६ मार्च, २०२४

मार्च २६, २०२४

27 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ

27 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना

- मंगलनाम तुझे सतत गाऊ दे.... 

 श्लोक

  (ग्रामगीता)- नेहमी स्वच्छ धुतलेले नेहमी स्वच्छ धुतलेले कपडे घालावे. एकावेळी एकच कपडा अंगावर घालावा. निसर्गाची हवा, सूर्यकिरण शरीराला लागावे. 

  

→ चिंतन-

 प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्याला जीवनात अशक्य असे काहीच नाही - परिश्रमाचा परीस लाभल्यावर असाध्य काही उरत नाही. संत तुकारामांनी सांगितलेलंच आहे. 'असाध्य ते साध्य करिता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।।' सातत्याने प्रयत्न करणाऱ्या लोकांबद्दल रामदासांनी म्हटलेलं आहे. 'यत्नांचा लोक भाग्याचा । यत्नेवीण दरिद्रता ।।



कथाकथन

 मुलाकात करावी. बाजारातून सामान आणून द्यायची भाडी प्रवासी करनी- लहान-मोठी कामे करायची. घरात सर्वांनीच एकमेकांना मदत केली की कामे हाकी होत आराम. दहा रूपयांची नोट दिली व वाण्याकडून पाय लिटर तेल आणायला सांगितले रामपाल घराकडे निघाला. थोडासा धांदरट होता. भराभर चालत निघाला. रस्त्यात दगडाचा ठेचकाळता व पडला. सारेच तेल जमिनीवर सांडते *" बाटली फुटली. तो रडतच घरी आला. आई समजली, रामाच्या जीवनात वनवास आहे. म्हणून आनंदाला तिने दहा रूपयांची नोट दिली तेल आणायला सांगितले. तो दुकानात गेला. बाटलीत तेल भरून घेतले. रस्त्यातून सावधपणे चालू लागला. तरीही बाजारातील गल अनामिकाचा धक्का लागला, बाटली हातातून निसटण्यापूर्वीच तोल सावरला तरी वाटलीतले अर्धे तेल साइले पण बाटली बावली. अर्ध तेल राहिले, त्याने आईला वाटेत पडलेली हकीगत सांगितली व म्हणाला, "मी अर्ध तेल व संपूर्ण बाटली वाचविली आहे." आईला अर्थ ल होते. पुरे पाव लिटरच तेल हवे होते. आई समजली, हा संसारात सुख-दुःखे भोगेल पण समाधानात राहील. मनाला तिने बाजारात पाठविले. दहा रुपयांची नोट दिली. तिला पुरे पाव लिटरच तेल हवे हेते व त्याची कामाची पद्धतही पाहयची होती. सदानंद खरोखरच सदानंदी होता. पण त्याच्या बाबतीतही तोच प्रकार घडला. अर्धे तेल घेऊन आला. तोही आनंदाप्रमाणेच पडला होता पण निराश झाला नाही किंवा अर्धे तेल वाचविल्याचा आनंदही त्याने व्यक्त केला नाही. तो म्हणाला, "आई तुला पूर्ण बाटली पाव लिटर तेलाने हवी आहे ना? मी देतो. हे पैसे शिल्लक आहेत तेही तुझ्याकडेच ठेव." "मी बाजारात जातो. काही काम करून पैसे मिळवितो आणि तुला पूर्ण तेलच आणून देतो. थोडा वेळ थांबशील ना?" "सहनशीलता' हा गुण आईला कुणी शिकवावा लागत नाही. आई मनात म्हणाली, 'हा मुलगा निराशावादी नाही आणि आशावादीही नाही कर्मयोगी आहे. वास्तववादी आहे. सत्याचे भान याला आहे. जीवनातील वास्तवता - सत्यदर्शन ज्याला घडते, तो स्वतः तर सुखी राहतोच सुख पाहतो, "मेहनती माणसाला कधीच काही कमी पडत नाही." आई सदानंदाला म्हणाली, निसर्गानि सर्व मानवजात समानच निर्माण केली पण काहींना काही गुण अधिक दिले तर काहींना सारखे गुण पण कमी-जास्त प्रमाणात दिले इतर प्राण्यांपेक्षा मानवाला विवेकशीलता मात्र अधिक दिली. त्यामुळे श्रेष्ठकनिष्ठता गुणाप्रमाणे ठरू लागली. काही स्वतःला श्रेष्ठ समजू लागले. काहींच्यावर लोकांकडून श्रेष्ठता लादली गेली काही निसर्गदत्त गुणांनीच श्रेष्ठ ठरले. ज्ञानेश्वर, भगवान येशू, संत तुकाराम, कबीर, शंकराचार्य, विवेकानंद अशी माणसे जन्मतःच निसर्गाची देणगी घेऊन आली. सिंकदर, सम्राट चंद्रगुम, फ्रेडरिक द ग्रेट सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, श्रीकृष्ण इ. नी आपल्या मेहनतीने, गुणसंपदेने, विवेकशीलतेने श्रेष्ठ संपादन केली. पण रावण, कंस, कुंभकर्ण, दुर्योधन, तैमूरलंग, नादीरशाह यासारखे स्वतःलाच श्रेष्ठ म्हणवून घेत असतात. कोणत्याही परिस्थितीत माणसाच्या मनाचा समतोल बिघडता कामा नये. म्हणून 'सदानंद, तू जीवनात सदासुखी राहणार आहेस. माझे तुला आशीर्वाद आहेत. आईने प्रेमाने सदानंदच्या पाठीवरून हात फिरविला व त्याला जवळ घेतले. 


→ सुविचार

 • आई म्हणजे चंदनाची शीतलता, आई म्हणजे आकाशाची विशालता, आई म्हणजे सागराची अथांग. गागरीन स्मतिदिन (१९६८) अंतरिक्षयानातून पृथ्वीभोवती पहिली फेरी मारणारे रशियन अंतराळवीर


दिनविशेष 

● अंतराळवीर युरी गागारीन स्मृतिदिन (१९६८) अंतरिक्षयानातून पृथ्वीभोवती पहिली फेरी मारणारे रशियन अंतराळवीर म्हणून युरी गागारीन यांचे नाव इतिहासात सन्मानाने नोंदविले गेले. १२ एप्रिल १९६१ रोजी या साहसी वीराने आपले साहसी उड्डाण करून गाला थक्क करून सोडले. विज्ञानात रशिया जगात पुढे गेला तो गागारीन यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच. मार्च १९३४ मध्ये एका सामान्य । बात सुताराचा मुलगा म्हणून युरी जन्माला आला. औद्योगिक महाविद्यायातील शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर १९५७ मध्ये अरिन्वर्य येथील एव्हिएशन ॲकॅडमीत त्यांनी पदवी संपादली. त्यानंतर अंतरिक्ष यानातून जवळजवळ १०८ मिनिटे ते अंतराळसंचार करीत राहिले. सोव्हिएट वीर म्हणून सन्मानित झालेले हे युगप्रवर्तक ठरले. अंतराळयानाच्या चाचणीत निमग्न असलेल्या या निधड्या छातीच्या साहसी बीराचे २७ मार्च १९६८ रोजी अवघ्या ३४ व्या वर्षी अपघाती निधन झाले.


 • मूल्ये 

 • • निर्भयता, कर्तव्यदक्षता, साहसीवृत्ती, चिकाटी.


 → अन्य घटना -

  • जर्मन भौतिकीविज्ञ 'क्ष' किरण संशोधक राँटजेन विल्यम कॉनरॉड जन्मदिन. १८४५

  . • विश्वविख्यात हॉकीपटू किशनलाल बाबू स्मृतिदिन. - १९७२.

   • गोहाटी - भारत व बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण. - १९८४.

    • शिवाजी महाराजांची साथ सोडून मोगलांना जाऊन मिळालेले नेताजी पालकर यांचे सक्तीने धर्मांतर केले गेले. १६६७.

     • प्रसिध्द ज्येष्ठ गायक - अभिनेते भार्गवराम आचरेकर यांचे निधन. 

     

→ उपक्रम 

• रेडक्रॉस संस्थेची व तिच्या कार्याची माहिती मिळवा.


→ समूहगान 1

 बालवीर हो सज्ज होऊ या, गात गात ताल घेत मार्ग काढू या. 


सामान्यज्ञान 

• आतापर्यंतच्या अंतराळ मोहिमांमध्ये रशियाने व्हॅलेंटिना तेरेश्कोव्हा आणि स्वेतलाना सावेत्स्काया या दोन महिलांनी पाठविले होते. त्या काही काळ अंतराळात राहिल्या होत्या. • परागकण धुळीच्या कणांसारखे सूक्ष्म आकारमानाचे असतात. त्यांच्यात बरीच विविधता असते. सूर्यफूलाचे परागकण वाटोळे, खजुराचे लंबगोल तर गुलाबाचे त्रिकोणी असतात. चौरसे, अर्धगोल आदि आकारांचे परागकणही आढळतात

.

सोमवार, २५ मार्च, २०२४

मार्च २५, २०२४

26 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ

             २६ मार्च दैनंदिन शालेय परिपाठ

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉सरळ सेवा भरती ।। General knowledge

👉 आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

→ प्रार्थना

 सृष्टीकर्ता ईश प्यारे, एक हो तुम एक हो.... 

 

→ श्लोक 

(ग्रामगीता)- सात्विक, सरळ ठेविता जीवन । ते होय सुंदर व आरोग्यपूर्ण । सात्विकांचि असावी वेषभूषाहि जाण । मानवाची ।। - संत तुकडोजी.

 आपले जीवन सरळ, सात्विक ठेवले असता ते सुंदर व आरोग्य संपन्न होते. म्हणून मनुष्याची वेषभूषा सात्विकच असावी. 


→ चिंतन

- कर्तव्यपूर्तीने खरा आनंद प्राप्त होतो - आपले नेमून दिलेले काम प्रामाणिकपणे, कसोशीने आणि मनापासून राबवयाचे फलप्राप्तीची भलती अपेक्षा धरायची नाही. उलट विहित कार्य हसतमुखाने करत राहायचे. मनात कर्तव्यभाव नित्य जागा असेल तर आनंद


कथाकथन

लोभी राजा एक मिडास नावाचा लोभी राजा होता. त्याच्या जवळ खूप सान होत आण त्या | अधिक हाव सुटे त्याने सगळ सोनं आपल्या खजिन्यात ठेवल होतं. आणि त्या सोन्याच्या साठ्याकडे बघण्यात तो दिवस घालवत असे | एक अपरिचित व्यक्ती तेथे आली आणि त्याला म्हणाली, 'तुला काय पाहिजे ते माग, राजा आनंदानं म्हणाला, 'मी ज्याला स्पर्श करीन होऊ दे.' 'नक्की तुला हेच हवं ना?' राजाने उत्तर दिलं, राजाने उत्तर दिलं, 'होय.' ती व्यक्ती म्हणाली, 'उद्या सकाळी सूर्याच्या पहिल्या | तुला ही सिद्धी प्राप्त होईल तू ज्याला हात लावशील ती वस्तू सोन्याची होईल. राजाला वाटलं हे काही खरं नसावं, आपण बहुधा स्वान दुसऱ्या दिवशी त्याने उठल्याबरोबर पलंगाला, आपल्या कपड्यांना स्पर्श केला आणि त्या सगळ्याचं सोन्यात रूपांतर झालं. त्याने बाहेर पाहिलं. त्याची मुलगी बागेत खेळत होती. त्याने तिला हा चमत्कार दाखवून आश्चर्यचकीत करायचं ठरवलं. त्यामुळे तिला आनंद ह त्याला वाटलं. परंतु बागेत जाण्यापूर्वी त्याने एक पुस्तक वाचायचं ठरवलं. त्याने पुस्तकाला स्पर्श केला तर ते पुस्तक सोन्याचं झालं. करण्यासाठी गेला. त्याने ज्या फळांना, भांड्यांना स्पर्श केला त्या वस्तू सोन्याच्या बनल्या. त्याला भूक लागली होती. तो स्वतःशीच काही सोनं खाऊ - पिऊ शकत नाही' त्याच वेळी त्याची मुलगी धावत आली. त्याने तिला जवळ घेतले तर तिचं ही सोन्याच्या पुतळ्यात झालं. राजाच्या चेहऱ्यावरचा आनंद आता मावळला. राजाने मान खाली घातली आणि तो रडू लागला. राजाला वर देणारी ती व्यक्ती पुन्हा तेथे क आणि मिळालेल्या वरदानामुळे राजा आनंदात आहे ना, असं तिने विचारलं. राजा म्हणाला, मी तर सर्वात दुःखी माणूस आहे. त्या अपरिचित विचारलं, 'तुला काय हवंय? अन्न आणि तुझी लाडकी मुलगी, का सोन्याचे गोळे आणि तुझ्या मुलीचा सोन्याचा पुतळा ?' राजा म्हणाला, 'मी माझं सगळं सोनं देऊन टाकतो. कृपा करून मला माझी मुलगी परत दे, कारण या सगळ्या सोन्यापेक्षाही माझी मुलगी मला आहे, तिच्या पुढे या सगळ्या सोन्याची किंमत शून्य आहे. ती व्यक्ती म्हणाली, 'आता तू शहाणा झालास.' त्या व्यक्तिने दिलेला वर प राजाला त्याची लाडकी मुलगी परत मिळाली. त्याला असा धडा मिळाला, जो पुढच्या आयुष्यात तो कधीही विसरला नाही.' भरून व बाट भलती अपेक्षा धरायची नाही. उलट कार्य गरिबीचा एक आजार एका बाटल नका सद राम भ पा • 


सुविचार - - 

• लोभ हा पापांचा परमेश्वर आहे.


→ दिनविशेष - • उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या कल्पकतेतून व अथक परिश्रमातून किर्लोस्करवाडीचा जन्म : १९९०: दिवशी पुणे-मिरज मार्गावर कंडल रोड या आडवळणी स्टेशनवर लक्ष्मणराव किर्लोस्कर आपल्या सहकाऱ्यांसह उतरले. त्याउ | कारखाना व वसाहत उभारण्याचे स्वप्न उराशी बाळगून उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्करांनी जिद्दीने श्रमून छोटा मांडव उभारला आणि किल | स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली. लक्ष्मणराव बेळगावच्या ठळकवाडीत लोखंडी अवजारांचा स्वावलंबी उद्योग करीत होते. जागेची अडच औंध संस्थानचे नूतन अधिपती श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या आधारामुळे कुंडलजवळची ओसाड जागा त्यांना मिळाली. जिद्दी स अथक परिश्रमातून या ठिकाणी जणू नंदनवन उभे केले. कुंडल रोड हे नाव जाऊन तिथे किर्लोस्करवाडी हे नाव झळकले. 


→ मूल्ये

 • श्रमनिष्ठा, चिकाटी, स्वदेशप्रेम. 


→ अन्य घटना 

• नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे पहिले भाषण झाले - १९०२. 

• प्रसिध्द बालसाहित्यकार दिवाकर बाळकृष्ण जन्म - १९३३. • बांगला देशाचा स्वातंत्र्य दिन. 

• बांगला मुक्तिसेनेने इस्लामाबादचे नाते तोडले १९७१.

 • बहिष्कृत परिषदेचे सहावे बेळगांव जिल्हा - १९२९

 .• पहिली आंतरराष्ट्रीय संस्कृत परिषद संपन्न झाली - १९७२. 


→ उपक्रम 

• लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या चरित्रातील काही घटनांचे कथारूप प्रदर्शन. 

• किर्लोस्कर उद्योगसमूहाची माहिती संकलित करणे

. • किर्लोस्करवाडीची माहिती सांगणे. 


→ समूहगान

 • ऐ मेरे वतन के लोगों, तुम खूब लगा लो नारा... 


→ सामान्यज्ञान -

 • कस्तुरीचा सुगंध शेकडो वर्षे टिकतो. कस्तुरी औषधी आहे. एक पौंड कस्तुरीची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात हो मोजली जाते.

 • मज्जासंस्था व स्नायू यांच्या विकृतीमध्ये स्नायूंच्या क्रियाशीलतेत बिघाड उत्पन्न होऊन ते लुळे व दुर्बलड झाला असे म्हणतात. क्रियाशीलता काही अंशी शिल्लक असल्यास अंश पक्षाघात झाला असे म्हणतात.

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉सरळ सेवा भरती ।। General knowledge

👉 आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 


👉शैक्षणिक बातम्यासाठी येथे क्लिक करा

👉आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
👉 टेलिग्राम ग्रुप जॉइन करा


.

मार्च २५, २०२४

25 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ

25 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ


→ प्रार्थना

 देव दयेचा अथांग सागर, विश्वचि मानी तो अपले घर... 

→ श्लोक 

(ग्रामगीता) - सर्वाविषयी समभाव | सर्वांभूती वासुदेव । 

हे जाणे तोचि खरा मानव । सत्य धर्म हाचि त्याच्या ।। - संत तुकडोजी सर्वांच्या ठिकाणी ईश्वराचे अस्तित्व आहे म्हणून सर्वांविषयी मनात समभावना ठेवावी. हे ज्याला समजेल तोच खरा माणूस. हाच त्याचा खरा धर्म आहे. जय २५ मार्च वार: 


→ चिंतन 

- स्वतंत्रपणे विचार करायला शिका - दुसऱ्याचे विचार डोळे मिटून स्वीकारण्यापेक्षा स्वतः स्वतंत्रपणे विचार करायला शिकावे. डोळस 1 बनावे, चालू घडामोडी, विविध बातम्या, संपादकीय, अग्रलेख हे सारे वाचून मगच विचारपूर्वक आपले मत बनवावे.


+कचन

+ - होळी पौर्णिमा - फाल्गुनी पौर्णिमा'' अशी इतर नावे आहेत. या दिवशी लोक आपल्या अंगणात गोवऱ्या खून (पूरा हिला पुरणाच्या हीचा नैवेद्य अर्पण करतात व शंखध्वनी करीत प्रदक्षिणा घालतात महोत्सव कामदहन होलिकोत्सव कसा सुरु झाला याबद्दलच्या ज्या तीन-चार पौराणिक कथा आहेत. त्यापैकी एक अशी आहे की, हि नावाचा एक हा अतिशय क्रूर राक्षस होता. त्याचे दुसरे वैशिष्ट्य असे की देवांचे नुसते नाव जरी कानी पडले तरी त्याच्या अंगाची लाहीलाही होते. पण, त्याचे नशीब असे की, त्याचा मुलगा प्रल्हाद हा निष्ठावंत देवभक्त निघाला 'देवाचे नाव घेऊ नकोस' असे त्याला वारंवार सांगूनही तो ऐकेना, तेव्हा भडकून गेलेल्या हिरण्यकश्यपूने त्याला जीवे मारण्याचे अनेक प्रयत्न केले. पण, ते निष्फळ ठरले. अखेर त्याने प्रल्हादला आपल्यासारखीच क्रूर असलेली आपली बहीण होलिका हिच्या स्वाधीन केले व त्याला मारायला सांगितले. होलिका राक्षसीने प्रल्हादाच्या नकळत एक मोठे अग्निकुंड पेटविले आणि त्यात जाळण्यासाठी त्याला त्या अग्निकुंडात नेले. पण, ती त्याला त्या अग्निकुंडाकडे ढकलणाचा प्रयत्न करू लागली असता त्या अग्निकुंडाच्या ज्वाला लागून तिच्याच कपड्यांनी पेट घेतला आणि त्यात भाजून तिचा अंत झाला. प्रल्हादाला मात्र कुठल्याही तन्हेची इजा झाली नाही. ते पाहून लोकांनी हर्षभरित होऊन दुष्ट होलिकेच्या नावाने बोंबा मारल्या. वाईटावर चांगल्याचा विजय होतो, हा संदेश देणारा हा होलिकोत्सव तेव्हापासून सुरू झाला. आपल्या हातूनही काया-वाचा-मनाने ज्या काही वाईट गोष्ट घडल्या असतील त्या जळून नष्ट व्हाव्यात हाच या होळीच्या मागचा हेतू आहे. होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी धुळवड असते. त्याला धूलिवंदन असेही म्हणतात. हा दिवस रंग, गुलाल, होळीची राख एकमेकांच्या अंगाव उडवून आनंदात साजरा करतात. तर ज्या गावच्या लोकांचे आपल्या गावावर खरेखुरे प्रेम असते व गावच्या स्वच्छतेवर गावातल्या प्रत्येकाचे आरो अवलंबून आहे, या गोष्टीची ज्यांना जाणीव असते असे बरेच लोक या दिवशी ग्रामसफाई करतात. 


सुविचार 

• वाईट सारे जाळोनी, प्रेम रंग रंगोनी, हात मिळवू एकीनी । - • धर्म हा सर्वांनी पाळला पाहिजे. पण तो सद्धर्म पाहिजे. अधर्म नको.


→ दिनविशेष 

'काळ' साप्ताहिक सुरु केले : १८९८ - शिवराम महादेव पराजये है 'काळ' पराजमहणून आहेत राष्ट्रीय धण्याचे साहित्यिक, पत्रकार व प्रभावी वक्ते. जन्म कुलाबा जिल्हयातील महाड येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण महाड येथे झाले. माध्यमिक - डॉ. आंबेडकर शिक्षण रत्नागिरी व पुणे येथे तर उच्च शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन आणि डेक्कन कॉलेजात झाले. १८८४ मध्ये जगनाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळवून ते यादक झाले. ही शिष्यवृत्ती मिळविणारे ते पहिले विद्यार्थी. उत्कृष्ट देशाभिमानाच्या प्रेरणेने त्यांनी 'काळ' हे साप्ताहिक सुरु केले. याच पत्रातील काही लेखांच्या आधारे सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवला. या खटल्यात त्यांना १९ महिन्याच्या कारावासाची शिक्षा झाली. तथापि १५ महिन्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर सरकारने त्यांच्याकडून मागितलेला दहा हजार रुपयांचा जामीन ते देऊ न शकल्याने त्यांना काळ सामाहिक बंद करावे लागले. निवडक निबंधाचे दहा खंडही सरकारने जप्त केले. पुढे मुंबई प्रांतातील काँग्रेस सरकारने या खंडावरील बंदी उठविली. आपल्या अमोघ वाणीने, ज्वलंत लेखणीने आणि सुस्पष्ट विचारसरणीने जनमानसात परकीय सत्तेविरूध्द असंतोष निर्माण केला. ध्येयवादी पत्रकार म्हणून आजही ते अनेकांच्या समोर आदर्श आहेत. *


 मूल्ये t -

  • देशभक्ती, निर्भयता, स्वाधीनता, आदरभाव. 


→ अन्य घटना -

 • इंग्लंडमध्ये पहिल्या तुरुंगांची स्थापना - १४०६

 . • गव्हाचे उत्तम पीक देणारी जात शोधून काढणारे शास्त्रज्ञ नॉर्मन बोरलॉग यांचा जन्म - १९१४

  • अंतराळ संशोधक वसंतराव गोवारीकर यांचा जन्म १९३३ 'सागरकन्या' बोटीचे जलावतरण १९८३.

   •सुप्रसिध्द मराठी लेखक मधुकर केचे स्मृतिदिन - १९९३. 


→ उपक्रम -

 • विविध दैनिकातील महत्वाची कात्रणे काचफलकात लावणे. • वृत्तपत्रांचे कार्य या विषयीची संकलित माहिती गोळा करणे. • शि.म.परांजपे यांच्या साहित्याविषयी माहिती देणे.


समूहगान

 • जहाँ डाल-डाल पर सोने की चिड़ियाँ करती हैं बसेरा....


 → सामान्यज्ञान

  • कस्तुरीमृग स्वतः जेलीसारखी असते. मादीला तिचा गंध दोन किलोमीटर बरून देखील येतो..

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉सरळ सेवा भरती ।। General knowledge

👉 आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 


👉शैक्षणिक बातम्यासाठी येथे क्लिक करा

👉आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
👉 टेलिग्राम ग्रुप जॉइन करा


.

शुक्रवार, २२ मार्च, २०२४

मार्च २२, २०२४

24 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ

 २४ मार्च



प्रार्थना

ऐ मातृभूमी तेरे चरणों में सिर नवाऊँ... 


→ श्लोक 

 - जगी दिसती विभिन्न धर्म । परि सर्वांचे एकचि वर्म ।  विश्व धारणेचा मार्ग उत्तम । सद्धर्म तोचि ।। जगात जरी वेगवेगळे धर्म दिसले तरी त्या सर्वांचे वर्म एकच आहे. जग व्यवस्थेचा उत्तम मार्ग असेल तोच सदूधर्म. 


→ चिंतन-

 मुले म्हणजे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ - काळाची गरज ओळखून प्रत्येकाने अधिक जबाबदारीने वागायला हवे. समता, स बंधुता, या गोष्टी आचार-विचार उच्चारात उतराव्यात म्हणून प्रयत्नशील राहिले पाहिजे. बोलणे नको, कृती हवी. स्वार्थ नको परार्थ


कथाकथन 

चोरावर मोर रानात बोर आणण्यासाठी चाललेल्या एका बारा तेरा वर्षाच्या मुलाला तहान लागली, म्हणून तो वाटे | विहिरीत पाणी आहे किंवा काय, ते पाहण्यासाठी त्या विहिरीपाशी गेला. त्या विहिरीत तो डोकावून पाहू लागला असता, त्याला समोरून | हुनशी चर्चेचा चोर पाठीवर गाठोडं घेऊन, आपल्याच दिशेनं येत असलेला दिसला. 'हा चोर एकतर आपल्याला मारील, किंवा पळवून नेऊन करायला लावील, 'असं वाटल्यावरून तो मुलगा त्या विहिरीत पाहून मुद्दाम हमसाहमशी रडू लागला. त्या रडणान्या मुलाजवळ येऊन त्या त्याला विचारलं, 'काय रे? तुला रडायला काय झालं?' तो मुलगा आपल्या रडण्यात खंड न पडू देता त्याला खोटेच म्हणाला, 'मी या विहिरीत क पाणी आहे ते पाहण्यासाठी वाकून पाहू लागलो असता, माझ्या गळ्यातील सोन्याची कंठी या विहिरीत पडली. आता कंठीशिवाय जर मी तर आई-बाबा मला बेदम चोप देतील.' 'तुझी कंठी तुला काढून देतो, असं त्या मुलाला खोटंच सांगून आणि चोरीचे पैसे व दागिने यांनी भा आपले बोचके त्याला विहिरीबाहेर उभे राहून सांभाळयला सांगून आपण विहिरीत उडी मारावी व कंठी हाती लागताच, आपले बोचके व याची क घेऊन आपण पसार व्हावं,' असा बेत त्या चोरानं मनाशी केला. त्याप्रमाणे तो त्या मुलाला म्हणाला 'बाळा ! तू हे माझं बोचकं सांभाळ; मी तुझी क तुला विहिरीतून काढून देतो.' त्या हुशार मुलाला चोराच्या मनातलं कळून आलं तरीही त्याने मुद्दाम त्या चोराला होकार दिला. त्याबरोबर त्या चोरानं विहिरीत उडी मारत | तिच्या तळाशी त्या कंठीचा शोध सुरू केला. ही संधी साधून तो मुलगा त्या बोचक्यासह तिथून पसार झाला. गावात जाताच त्या मुलाने ते हो। | पोलीस ठाण्यावर नेऊन दिले. पोलिसांनी घोड्यावर स्वार होऊन त्या चोराचा पाठलाग केला व त्याला पकडले. नंतर त्या मुलाच्या प्रामाणिकपणाबद्द व चातुर्याबद्दल त्यांनी त्याला मोठे इनाम दिले. 


सुविचार -

 • “प्रामाणिकपणा हा एक सद्गुण आहे, तर विजय हा शौर्याचा अलंकार 


→ दिनविशेष

 • लाहोर काँग्रेस ऐतिहासिक अधिवेशन : १९२९ - पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या ल अधिवेशनात हिंदुस्थानच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी कायदेभंग आंदोलन सुरू करण्याचे ठरले. युवा संघटनेत जवाहरलालजींबरोबर सुभाषचंद्र सहभागी होते. २६ जानेवारी हा स्वातंत्रदिन समजून त्या दिवशी देशभर स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचे वाचन करण्याचे ठरले. पुढील प्रतिज्ञा किंवा ज संमत करण्यात आला. 

 • १) अन्य कोणत्याही लोकसमाजाप्रमाणे भारतीय लोकांनाही स्वतंत्र राहण्याचा, आपल्या श्रमाची फळे स्वतः चाखण्या आपल्या विकासाला पूर्ण वाव मिळेल अशा रीतीने जीवनाला आवश्यक असलेल्या सर्व वस्तू मिळविण्याचा हक्क आहे. 

 • २) लोकांचा हक्क येण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारला बदलणे अथवा रद्द करणे याचा अधिकार लोकांना आहे. 

 

→ मूल्ये 

• राष्ट्रप्रेम, आदरभाव, स्वाधीनता, निर्भयता.


 → अन्य घटना 

 • कागदी चलनाचे जनक समजले जाणारे थॉमस रूझवेल्ट यांचा जन्म. - १७९३ 

 • सुप्रसिध्द इंग्लिश कवी वर्डस्वर्थ यांचे ि १८८२

 . • जागतिक रंगभूमी दिन.

  • ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वीरेंद्रकुमार भट्टाचार्य जन्मदिन - १९२४

   • भारतात सर्वात वेगवान धावणारी सुरू झाली. १९४६. 

   • मोरारजी देसाई यांचा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी १९७७. 

   

→ उपक्रम

 • नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या चरित्रातील ठळक घटनांचे गोष्टीरूप दर्शन करून देणे.

  • आझाद हिंद सेना कार्याची ओळख करून देणे. 

 

→ समूहगान 

• ये देश है वीर जवानों का, अलबेलों का मस्तानों का... 


→ सामान्यज्ञान 

• देश व त्याचे चलन : अमेरिका - डॉलर, इंग्लड पौंड, भारत-रूपया, इस्त्रायल पौंड, जपान - येन, पाकिस्तान - - रूपया, 1 - af क्रोन, रशिया - रूबल, बांगला देश - टका, पोलंड - इलोटी, जर्मनी मार्क, श्रीलंका - रूपया.


नागपूर-संत्री

 वसई, जळगांव -केळी

पैठण-कागद

 • बल्लारपूर-पैठणी साड्या

 • देवगड-हापूस अंबा

 • • घोलवड, डहाणू- चित्रे 

• दौलताबाद सिताफळ

• श्रीरामपूर-अलिबाग

• • कोल्हापूर -कुस्ती

• सोलापूर -चादरी

 • सांगल-द्राक्षे

औरंगाबाद-लेण्या


👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉सरळ सेवा भरती ।। General knowledge

👉 आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 


👉शैक्षणिक बातम्यासाठी येथे क्लिक करा

👉आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
👉 टेलिग्राम ग्रुप जॉइन करा


.

मार्च २२, २०२४

23 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ

   २३ मार्च दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना 

असो तुला देवा, माझा सदा नमस्कार... 


→ श्लोक 

(ग्रामगीता)- माऊलीचे स्वभाव कर्म । तोचि जगी म्हणविला मानव धर्म । माऊली स्वभाव कर्म । म्हणोनिच देव प्रिय लोकां ॥ 

- संत तुकडोजी आईचे सहज स्वभावातून जे कर्म होते त्यालाच जगात 'मानव धर्म' म्हटले आहे. आईचे अतिशय प्रेम सर्वांना परिचित आहे, म्हणूनच लोकांना देवावर प्रेम करावे वाटते. 


→ चिंतन 

- स्वराज्याचे सुराज्य - अनेक प्रसिध्द आणि अप्रसिध्द देशभक्तांच्या अपूर्व त्यागातूनच आपला देश स्वतंत्र झाला. देशाभिमान् दृढसंकल्प, कर्तव्यतत्परता, समर्पण वृत्ती या गुणांचा संचय प्रत्येक देशवासीयात होईल तरच मिळालेले स्वातंत्र्य टिकून राहील. स्वराज्याचे सुराज्य होण्याचे स्वप्न सत्यात उतरेल. स्वराज्याचे सुराज्य व्हावे। म्हणून सदैव प्रयत्नशील राहा.


कथाकथन 

हुतात्मा भगतसिंग' - भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी हौताका सरदार भगतसिंगाचा जन्म २८११००जी सध्या पाकिस्तानात असलेल्या पंजाबातील भंग या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. वडील किशनसिंग यांना क्रांतिकारी या मात केल्याबद्दल मंडालेच्या तुरुंगात सजा भोगावी लागली होती. भगतसिंग पाच-सहा वर्षांचा असताना खुला शेतावर गेला होता. चुलते होतात पेरणी करू लागले असता छोटा भगतसिंगही पेरू लागला. ते पाहून चुलत्यांनी विचारले, 'भगत, बाली पेरणी करतोस?' यावर तो म्हणाला. श्री बहुकीच्या बिया पेरीत आहे.' 'का?' असा प्रश्न काकांनी विचारला असता भगतसिंग म्हणाला, 'का म्हणजे काय?' या बंदुकीच्या बियांची झाडं झाली की त्यांच्यावर बंदुका येतील आणि मग त्या बंदुकातून गोळ्या झाडून मी इंग्रजांना मारीन व देश स्वतंत्र करीन प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बंग येथे झाल्यावर भगतसिंग लाहोरच्या डी.ए. व्ही. व पुढे नॅशनल कॉलेजमध्ये जाऊन १९२३ साली बी.ए. झाले. कॉलेज शिक्षण चालू असतानाच त्यांनी आजन्म अविवाहित राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवन समर्पित करण्याची शपथ घेतली. त्याप्रमाणे बी.ए. होताच त्यांनी क्रांतिकारकांच्या संघटनेत प्रवेश केला. पुढे सुखदेव, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, जतींद्रनाथ दास आदि कट्टर क्रांतिकारकांच्या सहाय्याने त्यांनी 'नवजवान भारत सभा' ही संघटना उभी केली. ९ फेब्रुवारी १९३५ च्या रात्री लखनीजवळच्या काकोरी स्टेशनातून सरकारी खजिना देऊन निघालेली एक आगगाडी वाटेत अडवून तिच्यातला सर्व खजिना त्या क्रांतिकारकांनी पिस्तुले खरीदण्यासाठी व बॉम्ब तयार करण्यासाठी बला. ३० ऑक्टोबर १९२८ रोजी सायमन कमिशन लाहोर शहरात गेले असता तिथे लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली निदर्शन सुरू झाले. पोलिसांनी केलेल्या बेदम लाठीहल्ल्यात लालाजींना बराच मार बसला व आजारी पडून त्यातच त्यांचा अंत झाला. याचा सूड घेण्याचे भगतसिंग आदिनी ठरविले व लालाजींच्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या स्कॉटऐवजी गैरसमजूतीने साँडर्सला मारले व मारून पळून जात असता त्यांचा पाठलाग करणाऱ्या चननसिंग यालाही पिस्तुलाने टिपले. पुढे 'डिस्प्युट बिल' व 'पब्लिक सेफ्टीबिल' हे दोन अन्यायकारक कायदे ब्रिटिश सरकारने मंजूर करून घेण्यासाठी केंद्रीय विधानसभेपुढे आणले असता प्रेक्षा कमी शक्तिशाली बॉम्ब टाकून व ब्रिटिश सरकारच्या धिक्काराची पत्रके भिरकावून, भगतसिंग व त्याच्या सहकाऱ्यांनी ब्रिटिश सरकारला हादरून सोडले पण ते पकडले जाऊन त्यांच्यावर खटले भरले गेले व न्यायालयाच्या निर्णयानुसार भगतसिंग, सुखदेव व राजगुरु या तिघांना लाहोरच्या मध्यवर्ती २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली. 


→ सुविचार 

•जे देशासाठी झटले, ते अमर हुतात्मे झाले. '


दिनविशेष

 - शिवराम हरी राजगुरू स्मृतिदिन १९३१ | त्यांचा जन्म पुणे खेड (राजगुरुनगर) येथे १३ १९०८ रोजी झाला. १५ व्या वर्षी ते विद्याभ्यासाठी घरातून निघून बनारसला वझे शास्त्री यांच्याकडे गेले. संस्कृत अभ्यास करून ते तर्कतीर्थ झाले. त्यांना संस्कृत साठी बरोबर इंग्रजी, कन्नड, मल्याळम्, हिंदी व उर्दू या भाषा अवगत होत्या. ते उत्कृष्ट कविता करीत. शिवाजी महाराज व त्यांच्या गनिमी याबद्दल त्यांना अत्यंत कौतुक होते, शारीरिक बलोपासनेच्या आवडीने ते अमरावतीच्या व्यायाम प्रसारक मंडळाचे विशारद झाले. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव यांच्याशी संबंध आल्यानंतर ते जहाल क्रांतिकारक झाले. सायमन कमिशन विरोधी निदर्शनात पोलिस हल्ल्यात लाला लजपतराय जबर जखमी झाले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निर्णय पंजाबी क्रांतिनेत्यांनी घेतला. यासाठी चंद्रशेखर आझाद, शिवराम राजगुरु, भगतसिंग आणि जयगोपाल यांची नेमणूक करण्यात आली. ब्रिटिश पोलिस अधिकारी साँडर्स याच्यावर लाहोरला १९२८ मध्ये हल्ला झाला, तेव्हा पहिल्या दोन गोळ्या राजगुरूंनी झाडल्या. त्यानंतर राजगुरू भूमिगत होते. त्यांना १९२९ मध्ये पुण्यात अटक झाली. भगतसिंग, सुखदेव यांच्याबरोबर त्यांना लाहोरच्या कारागृहात फाशी देण्यात आली. त्यांच्या स्मरणार्थ खेड या त्यांच्या जन्मगावाचे राजगुरुनगर असे नामांतर करण्यात आले. 


मूल्ये -

 • देशप्रेम, निर्भयता, स्वतंत्रता.


 → अन्य घटना 

 • डॉ. राम मनोहर लोहिया जन्मदिन १९१०.

  • जागतिक हवामान दिन. 

  • थोर क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राज - यांचा स्मृतिदिन. १९३१

   • रावसाहेब इंगोले जन्मदिन १९२३

    • ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळविणारा प्रकाश पदुकोण हा पहिला भारतीय खेळाडू ठरला. १९८० 

    • आसामी कवयित्री नलिनी वालादेवी यांचा जन्मदिन. १८९८ 

    • अण्णासाहेब पाटील स्मृती १९८२ लता मंगेशकर व पंडित जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार व सचिन तेंडुलकर, सुलोचना यांना 'पद्मश्री' पुरस्कार मिळाला. १९१९. - 


→ उपक्रम

 • भगतसिंगांबद्दलची कात्रणे गोळा करा

 . • राजगुरूबद्दल अधिक माहिती मिळवा.

  • अन्य क्रांतिकारकांची माहिती मिळवा. 

  

समूहगान 

• राष्ट्र की चेतना का गान वंदे मातरम्. 


→ सामान्यज्ञान 

• घोरपड झाडांच्या ढोलीत किंवा दगडगोट्यांतून राहत असते. पण, तिची वीण मात्र पावसाळ्यात एखाद्या वारुळात होते.

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉सरळ सेवा भरती ।। General knowledge

👉 आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 


👉शैक्षणिक बातम्यासाठी येथे क्लिक करा

👉आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा
👉 टेलिग्राम ग्रुप जॉइन करा


.