मन शांत करणारे विचार !!
1)काय माहित पण मला असं वाटतं आपलं सर्व दुःख आपल्या मनातच ठेवलं पाहिजे. आहो ! कोणाला दुःख सांगण्याचा हा काळ राहिला नाही.
2)ज्याला एकांतात बसून रडून मोकळ होता येतं आणि आपलं दुःख लपवता येतं तो माणूस जगातील सर्वात शक्तिशाली माणूस असतो.
3)जर एखाद्या व्यक्तीला तुमच्याशी नातं तोडायचा असेल तर ती व्यक्ती पहिल्यांदा तुमच्याशी बोलणं कमी करेल. हळूहळू तुमच्या पासून लांब जायला सुरू करेल पुन्हा तुम्हाला इग्नोर करेल त्यानंतर तो तुम्हाला भासवेल की तुझी गरज माझ्या आयुष्यातली संपली आहे मला आता तू असल्याचा किंवा नसल्याचा काहीच फरक पडत नाही.
4)त्रास हा आपण जीवन जगत आहे तोपर्यंतच होणार मेल्यानंतर जळत आहोत याचे सुद्धा भान राहत नाही.
5)एकटा राहून एकटा असल्याचा त्रास तर होतोच पण सर्वांसोबत असून एकट असलेली भावना माणसाला आतून पोखरत असते.
6)जेवढी भाषा अधिकाराची केली जाते तेवढीच भाषा कर्तव्याची देखील केली पाहिजे.
7) मदत ही एक अशी गोष्ट आहे जी केली की लोक विसरून जातात आणि नाही केली की जन्मभर लक्षात ठेवतात.
8)फुलायचंच आहे तर फुलासारखं फुला जळायचंच आहे तर दिव्यासारखे जळा मिसळायचंच आहे तर दूध आणि पाणी सारखं मिसळा अशीच जीवनाची रीत प्रीत असली तर कधीही भावना तुटणार नाहीत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा