चौथी मराठी
जानेवारी २८, २०२१
Res ads
चौथी मराठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
चौथी मराठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
गुरुवार, २८ जानेवारी, २०२१
सोमवार, २५ जानेवारी, २०२१
रविवार, २४ जानेवारी, २०२१
सोमवार, २१ डिसेंबर, २०२०
शनिवार, १२ डिसेंबर, २०२०
शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०
चौथी मराठी
ऑगस्ट १५, २०२०
इयत्ता चौथी मराठी, आम्ही संवाद करतो
आम्ही संवाद करतो
१)मासोळी आणि तिचे पिल्लू
चित्र क्र. १ - मासोळी आणि तिचे पिल्लू आई गं, ती मसोळीचे पिल्लू- नदीकाठची मुलं आपल्याला ओंजळीत का पकडतात ? त्यांना आपल्यासोबत खेळायचे असते का
मसोळी - नाही रे बाळा, काही खेळायचं वगैरे नसते. ते फक्त मस्ती करतात आणि आपण मात्र जीवनाशी जातो. आता ओंजळीत पकडतात मग मोठेपणी जाळ्यात पकडतात.
पिल्लू. मग काय करतात ?
मसोळी -आपल्याला मारतात म्हणून त्यांच्या दूरच राहायचे. लक्षात ठेव.
२)चिमणी आणि तिची पिल्ले:
चिमणी-पिलांनो चला या, हे दाणे मी तुम्हाला भरवते, या पटकन्.
पिल्लु- आई, तुला दाणे दुरून आणायला त्रास होतो का ? उद्यापासून चिमणी चिमणी आम्ही येऊ का तुझ्यासोबत ?
चिमणी- काही नको यायला, मी माझे काम करीन, तुम्ही अजून लहान आहात. नसत्या उठाठेवी करू नका.
चिमणी- अरे, बाळा घरट्याबाहेर वाकून पाहू नकोस, खाली पडलास ना, तर डोके फुटेल. मी येईपर्यंत गुपचूप बसून राहायचे घरट्यात. आले का लक्षात्.
पिल्ले- हो, हो.
३)डायनोसोर आणि पिल्लू
डायनासोर पिल्लू - आई, मी त्या टेकडीपलीकडे माणसांच्या मुलांसोबत खेळायला जाऊ का? नाही, कधीच नाही?
डायनासोर पिल्लू -पण का?
डायनासोर- बाळ तू अजून लहान आहेस, तू माझ्यासाठी लहान जेव्हा तू माणसांत जाशील तेव्हा तू त्यांच्यापेक्षा दहा पटीने मोठा आहेस, पण होशील ते तुला पाहून घाबरतील आणि पळून जातील.
पिल्लू - मी त्यांना प्रेमाने समजावून सांगील ना ? एखाद्या वेळी स्वत:च्या जीवाला वाचवण्याकरीता ते तुला काही
डायनासोर - हो, बाळ. तू शहाणा आहेस, पण तुझ्या प्रचंड शरीराला ते घाबरतील. करतील, तू शहाणा आहेस ना ? इथे जंगलातच खेळायचं.
हो ठीक आहे. मी जंगलातच खेळेल आणि जर जंगलात माणसं आली तर मीच पहिले पळून जाईल म्हणजे त्यांना माझी भीती वाटणार नाही
डायनासोर आता कस शहाण्यासारखं बोलतोय?
चित्र क्र. ४ - कांगारू आणि पिल्लू
कांगरू चे पिल्लु- आई गं, मला या पिशवीबाहेर निघायचं आहे. मैदानात हिरवं गवत खायच आहे. दुडूदुडू उड्या मारायच्या येऊ का बाहेर ?
कांगारु- नाही थोडा वेळ थांब,
पिल्लु- आई तू फारच दृष्ट आहेस. बाळा तू अजून लहान आहेस. तुला काही गोष्टी कळत नाही. जर एखादा वाघ किंवा सिंह तुला पाहिल तर खाऊन टाकतील. तू लहानसा आहेस पळू देखील शकणार नाहीस. बापरे, आई मला तर ऐकूनच भिती वाटत आहे.
कांगारू - बरोबर, भ्यायलाच पाहिजेस तू । अरे, आई सागते ते ऐकायचे तू माझ्या पोटाच्या या पिशवीत आहेस म्हणून सुरक्षित आहे. धोका वाटला तर मी भरधाव वेगाने, टुणटून उड्या मारत पळून जाईल आपले दोघांचेही प्राण वाचतील,
पिल्लु- आई, तू जगातील सर्वात हुशार आई आहेस.
चौथी मराठी
ऑगस्ट १५, २०२०
इयत्ता चौथी, मराठी,१.धरतीची आम्ही लेकरं
धरतीची आम्ही लेकरं
अर्थ - शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची आम्ही मुले आहोत. ज्या जमिनीपुळे आपण आहोत, जी जमीन आपल्याला अन्न, धान्य देते. त्या धरतीची आम्ही मुले आहोत आणि आम्ही फार भाग्यवान आहोत.
(२) शेतावर,.......... रानपाखरं ।।१।।
अर्थ - मुले म्हणतात सकाळ होताच आम्ही शेतावर जाणार आहोत रानावनातील रान पाखरांसोबत गोड गाणी गाणार आहोत.
(३) मेहनत,........ डुले शिवार ॥२॥
अर्थ - वर्षभर शेतात आम्ही कष्ट करतो. त्या श्रमाचे फळ आज मिळाले आहे. शेता पिके डोलत आहेत.
(४) शाळु, जुंधळा....... खाऊ भाकर
अर्थ - शेताता, मोत्यांप्रमाणे जोंधळा चमकत आहे. चमकणाऱ्या या शाळु व जोंधळयाची भाकरी आम्ही वर्षभर खाऊ.
(५) स्थापू समानता .. .....नाही चाकर ।।४।।
अर्थ - धरतीची आम्ही लेकरे एक आहोत. इथे कोणी मालक नाही आणि कोणी नोकर नाही. ही आमची एकता, अखंड टिकणारी, पोलादी आहे. आम्ही सर्व एक आहोत, आम्ही समानता स्थापन करणार आहोत.
६)धरतीची.......... आम्ही लेकरं।।
अर्थ या मातीत जन्मलेली आम्ही धरतीची लेकरे आहोत, नेहमी या धरतीच्या सहवासात राहणारी आम्ही मुले खूप भाग्यवान आहोत.
शब्दार्थ -
धरती जमीन,
लेकरं - मुले,
सदा - नेहमी,
भाग्यवान-नशीबवान,
शेत - शिवार; वावर,
रानीवनी रानात-वनात,
मेहनत -श्रम
जुंधळा - जोंधळा,
चमकत्याती-चमकत आहे
स्थापू-स्थापणार
ऐक्यता-एकता,
धनी-मालक,
श्रम, कष्ट,
चाकर- नोकर.
तोंडी प्रश्न :
(अ) (१) मुले कोणाची लेकरे आहेत ?
(२) लेकरं कशी आहेत ?
(३) मुले कोणासोबत गाणी गाणार आहेत ?
(४) मुलांनी मेहनत किती दिवस केली आहे ?
(५) एकता कशी राहणार आहे?
उत्तर - (१) धरतीची (२) भाग्यवान (३) रानपाखरांसोबत (४) वर्षभर (५) पोलादी.
रिकाम्या जागी कवितेतील योग्य शब्द भरा
प्रश्न १ रिकाम्या जागी कवितेतील योग्य शब्द भरा. (१) रानीवनी . ....जशी रानपाखरं ।।
२) जमिनीवर। केली वरील भरी ।
३).........जुंधळा मोती। चमचम चमकत्या ती
(४) धरतीची आम्ही लेकरं .........।
उत्तर (१) गाती, (२) मेहनत, (३) शाळु, (४) भाग्यवान.
प्रश्न २ - खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) धरतीची मुलं कशी आहेत ?
उत्तर धरतीची मुलं भाग्यवान आहेत.
(२) रानपाखरे कुठे आहेत ?
उत्तर रानपाखरे रानावनात आहेत.
(३) मुले काय स्थापणार आहेत. ?
उत्तर - मुले समानता स्थापणार आहेत.
(४) मुले भाकरी कशाच्या खाणार आहेत ?
उत्तर मुले शाळु आणि जोंधळ्याची भाकरी खाणार आहेत.
प्रश्न ३ खालील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा.
(१) धरतीची मुले भाग्यवान कशी आहेत.? उत्तर - धरतीची मुले सकाळी रानावनात जाऊन रानपाखरा सोबत गायी गातात वर्षभर मेहनत करून शेतात पिके पिकवतात. वर्षभर मोत्याप्रमाणे चमकणाऱ्या शत जोंधळ्याची भाकरी खातात. तेथे कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही अशी समानते स्थापन करतात. अशी पोलादी एकता ते निर्माण करतात. म्हणून ते भाग्यवान आहेत.
शनिवार, ११ जुलै, २०२०
चौथी मराठी
जुलै ११, २०२०
इयत्ता-चौथी 10. धाडसी हाली
१०. धाडसी हाली
![]() |
पुरस्कारासह हाली बरफ |
तुम्हाला कशाची भीती वाटते ? कोणी म्हणेल, "झुरळाला. कोणी म्हणेल छट, झुरळाला काय घाबरायच ? आपण जवळ गेलो तरी ते पळून जात कोणी म्हणेल, मला अंधाराची भीती वाटते. त्यावर कोणी म्हणेल, 'अधाराची भीती? त्यात काय असतं घाबरण्यासारख ? दिवा लावला की अधार गायक ! पण समजा तुम्हाला कोणी विचारल, की तुमच्यासमोर एखादा वाघ किंवा बिबट्या उभा आहे. तर तुम्हाला काय वाटेल?' छे! वाघाला काय घाबरायच ? अस म्हणायची हिंमत कोणी करेल ? नाही ना? पण पुरस्कारासह हाली बरफ आपण अशा एका मुलीला भेटणार आहोत जी वाघाला घाबरून पळाली नाही. उलट तिने वाघापासून तिच्या बहिणीला वाचवले. हाली बरफ ही ती धाडसी मुलगी. या धाडसाबद्दल नवी दिल्ली येथे मा. प्रधानमंत्र्याच्या हस्ते सन २०१३ मध्ये 'वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा धरण आहे. या धरणाच्या परिसरात अभयारण्य आहे. तेथे विविध प्रकारचे जगली प्राणी आहेत. या भागात वेगवेगळ्या पाड्यावर आदिवासी राहतात. त्यांचे जीवन जंगलावर अवलंबून आहे. त्यामुळे जंगलात त्यांचा सतत आणि सहज वावर असतो. जगलाची, तिथल्या प्राण्याची त्यांना खडान्खडा माहिती असते. ते निर्भय असतात. जगल ही आपली संपत्ती आहे. तिचे संवर्धन कसे करावे हे आदिवासी जाणतात.
तानसा धरणाच्या परिसरातील आटगावजवळ नांदगावच्या जमनाचा पाडा आहे. तेथे हाली बरफ ही मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती. निसर्गाच्या सहवासात लहानाची मोठी झालेली पाणीदार डोळ्याची, सावळ्या रंगाची, काटक हाली बरफ ही वारली या आदिवासी समाजाची आहे. हालीचे वडील रघुनाथ हे रेल्वेत कामाला होते. एका अपघातात त्याचा एक हात निकामी झाला. घरच्या गरिबीशी झुंज देणाऱ्या हालीने नेमके कोणते धाडस दाखवले ? चला, आपण तिच्याकडूनच ऐकूया. हालीची घेतलेली ही मुलाखत काळजीपूर्वक समजावून घ्या .
प्रश्न : तू जंगलात कशासाठी गेली होतीस? तुझ्यासोबत कोण होतं ?
हाली -लाकरा आनाला गेलतू, माझे सोबत माझी मोठी बहीण (शकुंतला) होती. पाठीमागशी बहिणीवर वाघाने हल्ला केला. तिचं पाठीचा लचका तोरला, माडी आनी पायाचा लचका कारला. बहीण जखमी झाली.
प्रश्न हाली तुझ्या बहिणीवर हल्ला केल्यावर तू काय केलस ?
हाली-मी आधी घाबर-घाबरशी झालू मग दगड आपटली. लाब-लांबची लोक आरडावरडा केलवर धावत आली. मी जोरात मोठी-मोठी दगड आपटली वाघाला दगड लागली. मंग वाघ पलून गेला.
प्रश्न- लोकानी काय मदत केली?
हाली- मी आरडावरडा केला. तवा काही लोक लाकरा गोला करीत होती. ती पन धावत आली
प्रश्न-ही गोष्ट बाकीच्या लोकाना कशी समजली ?
हाली-गावच्या लोकांनी सांगला.
प्रश्न-तुझ्या जखमी बहिणीला कुठे नेल ? मग ठान्याचे सिविल हासपिटला नेली.
प्रश्न-तुझी बहीण वाचली का? हाली : बहीण वाचली.
हाली- बहीण वाचली
याबद्दल तुला काय वाटत ?
हाली-आमाला बरा वाटला.
प्रश्न-तू बहिणीला वाचवलस. त्यानंतर तुला कोणीकोणी मदत केली?
हाली- आमचा मामा पाडु किरकिरे यानी लई मदत केली. गावचे लोक, शहापूरचे लोक यांनी सुदिक मदत केली. गावाचे शिक्षकानी सुदिक मदत केली
प्रश्न-तुझे पेपरात नाव आलं, बातमी छापून आली, तेव्हा तुला कस वाटल ?
हाली-चांगला वाटला.
प्रश्न-तू बहिणीला वाचवलस, त्यामुळे तुला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला. तुला दिल्लीला येण्याचे आमंत्रण मिळाले. तू कोणासोबत दिल्लीला गेली होतीस ?
हाली: दिल्लीला माझे सोबत माझी आई, माझा मामा होता.
प्रश्न- दिल्लीला गेल्यावर तुला कस वाटल ? तेथील अनुभव सांग.
हाली -दिल्लीला गेलवर चांगला वाटला. तिथ माझेसारखी दुसरी पन पोरा व्हती. काही पोरांची हत्तीवरशी मिरवणूक काढली. मी मोटारीशी फिरलू, चांगला खायाला मिलाला. खेलाला मिलाला. पंधरा दिस दिल्लीत व्हतू.
प्रश्न,- तुला कोणाच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला ?
हाली-मला प्रधानमंत्र्यांनी पुरस्कार दिला.
प्रश्न : तू किती शिकलीस ?
हाली : मी शाळेन गेलू नाय. आमची गरिबी. कुटुंब मोठा, म्हनून शालेन गेलू नाय.
प्रश्न : तुझ्या धाडसाची घटना वाचणाऱ्या मुलामुलींना तू काय सांगशील ?
हाली : घाबरले नाय पायजे. लोकांना वाचवले पायजे.
प्रश्न : एवढा मोठा पुरस्कार तुला मिळाला. सगळ्यांनी तुझं कौतुक केल. मग तुला काय वाटलं?
हाली : मला चांगला वाटला. पन मला काम मिलाला असता, त जास्ती चांगला वाटला असता.
प्रश्न : सध्या तू काय करत आहेस ? हाली : मी लग्न करून रातांधळे पाड्याला राहती. दिवसभर मोलमजुरी करती.
हालीचे आभार मानून आम्ही निघालो, तेव्हा तिचं धाडस, तिची परिस्थिती यांचाच विचार आमच्या मनात होता.