Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, ४ जून, २०२४

8 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 8 जून दैनंदिन शालेय परिपाठ



→ प्रार्थना 

सबके लिए खुला है, मंदिर यह हमारा... 


→ श्लोक 

सुन्दरोऽपि सुशीलोऽपि कुलीनोऽपि महाधनः । शोभते न विनाविद्या, विद्या सर्वस्य भूषणम् ॥ 

एखादी व्यक्ती कितीही सुंदर असली, शीलसंपन्न असली, कुलीन (उत्तम कुळात जन्मलेली) असली, खूप धनवान। असली तरीही विधेशिवाय ती शोभून दिसत नाही. विद्या हे सर्वांचेच भूषण आहे.


 → चिंतन

  महत्त्वाकांक्षेची पूर्तता आपल्या शक्तीवर आणि आपल्या मानसिक बळावर अवलंबून असते. परमेश्वराने मनुष्याची निर्मिती करताना ज्या विशेष देणग्या त्याला दिल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे बुध्दी. या बुध्दीच्या जोरावर मनुष्य श्रेष्ठ होत राहण्याचा प्रयत्न करतो आणि या प्रयत्नातूनच महत्त्वाकांक्षेचा जन्म होतो. पण नुसतीच महत्त्वाकांक्षा काय कामाची? तिच्या पूर्ततेसाठी आपले शारीरिक बळही वाढायला हवे आणि मानसिक शक्तीही. शारीरिक शक्तीसाठी व्यायाम हवा, तर मानसिक शक्तीसाठी हवा आत्मविश्वास, चिकाटी आणि एकाग्रता यांचा त्रिवेणी संगम!


कथाकथन '

द्रोण आणि अर्जुन' एकदा काय झाले, गुरुदेव सर्वांना धनुर्विद्या शिकवत होते आणि त्यांना एकदम तहान लागली. त्यांनी अर्जुन हाक मारली. "कत्सा ! जरा इकडे ये...." अर्जुन ताड्कन उठला नि त्याने गुरुदेवांना प्रणाम केला. " अर्जुना ! मला तहान लागली आहे. जरा यमुनेवरून पाणी घेऊन ये... अर्जुनाने जवळ असलेला हंडा उचलला आणि तडक यमुनेवर गेला. आचार्य वडाच्या झाडाखाली आसन घालून बसले. इतक्यात युवराज दुर्योधन द्रोणांच्या जवळ आला नि पटकन म्हणाला, “गुरुदेव ! एका बाणात शत्रुची मुंडकी एकदम उडविण्याची कला तुम्हाला अवगत आहे ती तुम्ही मला शिकवणार का?" द्रोणांना दुर्योधनाच्या या बोलण्याची गंमत वाटली; पण त्यांनी दुर्योधनाला जवळ बोलावले नि हळुवारपणे म्हटले, " युवराज! मी तुल अवश्य ही विद्या शिकवीन पण प्रथम तुला एक परिक्षा द्यावी लागेल." दुर्योधनाने लगेच 'हो गुरुदेव' असे म्हटले. दुर्योधनाला गुरुदेवांनी सांगितले, “ज्या वाली मी बसलो होतो. त्या झाडाच्या एका फांदीला तू एक बाण मार आणि वडाची पाने खाली पाड; पण एक लक्षात ठेव, पानांचे देठ झाडावरच राहिले | पाहिजेत: "दुर्योधनाने लगेचच बाण सोडला आणि काय गंमत झाली. वडाची काही पाने खाली पडली; पण सर्व पाने अर्धवट पडली होती. अर्धीपाने देठासकट झाडावरच राहिली होती. गुरुदेव काहीही बोलले नाहीत. दुर्योधनाने मान खाली घातली. तेवढ्यात समोरुन अर्जुन येताना दिसला. त्याच्या खांद्यावर पाण्याने भरलेला हंडा होता, पण एक थेंबही त्याच्या अंगावर सांडला नव्हता. वाटेत त्याला अर्धवट पडलेली वडाची पाने दिसली. अर्जुनाच्या सर्व काही एका क्षणात लक्षात आले. त्याने बाण काढला, प्रत्यंचा ओढली आणि बाणावर खांद्यावरची पाण्याने भरलेली घागर तोलून धरली. घागर अधांतरी होती. दुर्योधन पहातव राहीला. अर्जुनाने पुन्हा वाण मंत्र म्हणून सोडला, तेव्हा झाडावरची सर्व अर्धवट पाने खाली पडली; पण त्यांचे देठ झाडावरच साहिले. नंतर त्याने पुन्हा बाण काढला आणि पुन्हा सोडला. त्या एका बाणातून बाणांचा एक झुला तयार झाला आणि ती अधांतरी पाण्याने भरलेली घागर गुरुदेवांच्या मुखाजवळ गेली आणि त्यांच्या मुखात यमुनेचे स्वच्छ पाणी हलकेच पडले. गुरुदेवांना संतोष झाला. त्यांनी फक्त दुर्योधनाकडे पाहिले. दुर्योधन भराभर महालाकडे चालता झाला. तेव्हा दुर्योधनाला उद्देशून आचार्य म्हणाले, “युवराज, तुम्हाला अर्जुनासारखे शरसंधान जमणे कठीण आहे. " 


→ सुविचार

 'एकाग्रता ही यशाची पहिली पयारी आहे.' 

 • 'यश फक्त परिश्रमाने मिळत नाही, त्यासाठी परिश्रमाबरोबर मुत्सद्देगिरी आणि बदलत्या परिस्थितीची अचूक जाणही असावी लागते.


→ दिनविशेष

 प्रकाश पदुकोणने बॅडमिंटनचा राष्ट्रीय चषक जिंकला - १९८१ : बॅडमिंटन हा मूळचा इंग्लंडचा खेळ. १८७० मध्ये पुण्याला ब्रिटीश अधिकाऱ्यांनी खेळाचे काही नियम बनविले. १८९३ पर्यंत त्यात बदल होत गेले. १९३४ साली आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन संस्था स्थापन झाली. भारताच्या प्रकाश पदुकोण या राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यवीराने १९७१ ते १९७९ या काळात ९ स्पर्धा जिंकल्या. १९७१ मध्ये एकाच दिवशी कनिष्ठ व वरिष्ठ दोन्ही गटातील सामने जिंकले. त्यावेळी वयाने तो सर्व खेळाडूंपेक्षा लहान होता. चीनच्या हान जियानचा पराभव करुन प्रकाशने १९८१ मध्ये जेव्हा अल्वा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा संपूर्ण भारतात आनंदाचे उधाण आले. भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासातील तो एक अपूर्व दिवस होता. हृदयातल्या महत्त्वाकांक्षेला अथक परिश्रम आत्मविश्वास आणि चिकाटीचे खत पाणी घातले की किती गोजिरी फळे येतात याचा साक्षात्कार त्या दिवशी साया भारतीय युवक खेळाडूंना झाला. योग्य संधीची वाट पहा आणि ती आपल्या आटोक्यात आली की अथक प्रयत्नांनी काबीज करा असाच संदेश प्रकाशने आपल्या खेळातून दिला. 

 

→ मूल्ये 

खिलाडूवृत्ती, श्रमनिष्ठा.


→ अन्य घटना

 • फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ डॉमिनिको जन्मदिन १६२५ सिद्दीच्या ताब्यात असलेला रायगड किल्ला शाहू महाराजांनी श्रीनिवासराव प्रतिनिधी यांच्या मार्फत पुन्हा हस्तगत केला. १७३३ 

 • एरिटिड या नावाने ओळखले जाणारी उल्कावृष्टी १८६६ -

  • प्रसिद्ध वैज्ञानिक थॉमस पेन स्मृती- १८०९ प्रसिद्ध समीक्षक व विचारवंत प्रा. दिनकर केशव बेडेकर यांचा जन्म १९१० 

  • टिळकांनी मंडाले येथील तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. १९१५ • मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा. राम जोशी यांचा जन्म १९२४

   • भारत ब्रिटनच्या विमानसेवा सुरु १९४८ - 

   • तुकारामदादा गिताचार्य यांचा स्मृतीदिन २००६ 

   • 'फील्ड मार्शल' हे सर्वोच्य लष्करी पद पटकविणारे पहिले भारतीय सेनापती माणेकशा यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती- १९१६९ 

 

→ उपक्रम

 • बॅडमिंटन खेळाची माहिती करून घ्या

 . •तुमच्या शाळेतल्या मैदानावर या दिवशी क्रीडादिन साजरा करा.

  • वेगवेगळ्या खेळांच्या चैंपियनथी नावे जमा करा. 

 

→ समूहगान

 • हम युवकों का 555नारा है, हैड, हैड, हैड...... 

 

सामान्यज्ञान -

 • भारतात एकूण १,११२ प्रमुख दैनिक वर्तमानपत्रे निघतात. त्यापैकी महाराष्ट्रातच मराठीतून १०० पेक्षा जास्त प्रमुख दैनिके निघतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा