Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, ४ जून, २०२४

11 जून दैनंदिन शालेय परिपाठ

 11 जून दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना

 ए मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम....

 

श्लोक

 - क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थच साधयेत्। क्षणत्यागे कुतो विद्या, कणत्यागे कुतो धनम्। क्षणा-क्षणाने विद्या, कणाकणाने धन जमवावे. क्षण गमावला तर विद्या कशी मिळणार, कण गमावले तर धन कसे मिळणार (प्राप्त होणार)


चिंतन

 प्रभूची लेकरे सारी, त्याला सर्वही प्यारी । कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अपदि । - एकाच ईश्वराची आम्ही लेकरे आहोत. नुकतीच जन्मलेली काही मुले जर एकत्र ठेवली तर त्यातून कुठले मूल हिंदूवे, कुठले मुसलमानाचे, कुठले ब्राह्मणाचे, कुठले हरिजनाचे हे ओळखता येणार नाही. म्हणजेच हे भेदभाव देवाने नव्हे माणसा निर्माण केले. या भेदामुळे भने दुखावतात आणि देश कमजोर होतात. माणसाने माणसासारखे जगावे. प्रेम घ्यावे, प्रेम द्यावे. हे विश्वची झे घर असे ज्ञानेश्वरांनी सांगून ठेवले आहे. आपले मन तितके मोठे करायला हवे. आई 

 

→ संस्कार -

 “ 'श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. देवा सांग शुद्ध बुध्दी दे म्हणून."- श्यामचीआई.



→ कथाकथन

 - महात्मा ज्योतिराव फुले - महात्मा ज्योतीराव फुले याचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे निवाई गय दाम्पत्याच्या पोटी झाला. १८४० मध्ये म्हणजे अवघ्या तेराव्या वषी गोविंदरावानी तानातान पाटाच्या कन्येशी (सावित्रीबाईशी ) लावून दिले. आता ज्योतिया विद गरज निर्माण करणारा व मनावर प्रचंड आपात करणारा प्रसंग होता ज्योतिबाच्या ब्राह्मण मित्राच्या उग्नादा. फुलमाया ज्योतिबाया | आपल्या बरोबरीने चालतो आहे हे पाहून कर्मठ सनातनी ब्राह्मणांचा राग अनावर झाला. त्यांनी धक्के मारून ज्योतिबाला वरातीवर काढते. या | आपमानाचा आघात होऊन महात्मा फुलेंनी शूद्रांना गुलामीत ठेवणाऱ्या वेदशास्त्र पुराणांचा धर्मग्रंथाचा बारकाईने चिकित्सक अभ्यास सुरू केला. त्यामुळे सर्वप्रथम बहुजनांना शिक्षण देऊन त्याचं अज्ञान दूर करावयास हवे याची जाणीव ज्योतिदाना झाडी पूर्णकृप | कुटुंबातील स्त्री साक्षर व्हावयास हवी. स्त्रियांना शिकविण्यासाठी स्त्री शिक्षिका हवी कारण तत्कालीन समाज अत्यंत कर्मठ व परंपरावादी होता. त सावित्रीच्या हाती ज्योतिबा गुरूने लेखणी दिली आणि स्त्री शिक्षणाचा ओनामा केला. सावित्री शिकली. ज्योतियाच्या प्रेरणेने भारतातील पहिली शिक्षिका जन्माला आली. अत्यंत कृतज्ञतेने सावित्रीबाई ज्योतिबांच्या काचा देख आपल्या काव्य' या काव्यसंग्रहातील ज्योतियां नमस्कार' या ज्योति संमर्पित कवितेतून करतात. १८४८ साली भिड्यांच्या वाड्यात काढलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेतील मातंग समाजची मुक्ता साळवे ही पहिली चिकित् करणारा अत्यंत तर्कशुध्द निबंध लिहिते. ताराबाई शिंदे ही जगातील पहिली स्त्रीवादी लेखिका ठरते. 'स्त्री पुरुष समानता नावाचा अत्यंत विस्फोटक ग्रंथ लिहून ती पुरूषप्रधान समाजासमोर ते धर्मव्यवस्थेसमोर बिनधास्तपणे अनेक प्रश्न उभे करते ते केवळ सावित्रीबाई व ज्योतिबांच्या समर्थ प्रेरणेमुळे ज्योतिबा एक उत्तुंग व्यक्तीत्व होते. जगातील निवडक विद्वानांपैकी एक होते. सर्वश्रेष्ठ असे सांस्कृतिक पुरूष होते. त्यांचे समाज परिवर्तनाचे प्रचंड कार्य | शासनाने त्यांचा मोठा सत्कार केला. जनतेने त्यांचे निःस्पृह कार्य पाहून त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली. नेलसन मंडेला यांनी त्यांच्याबद्दलच्या हक्कासाठी लढणारा जगातील पहिला महामानव असे गौरवोदगार काढले. अत्यंत संपन्न जीवन जगता येत असतानाही शेतकन्याचा वेष धारण करून अत्यंत साधे जीवन जगणारे ते फार मोठे कॉन्टेक्टरदेखील होते. समाज सुशिक्षित, संपन्न व संघटित करीत असतानाच त्यांनी १८४७ ला 'पुणे कमर्शियल अॅण्ड कॉन्ट्रॅक्टींग कंपनी' स्थापन करून स्थापत्य शास्त्रातील उत्तम नमुने असणारी बांधकामे उभी केली महात्मा ज्योतिबा फुले नावाच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा २८ नोव्हेंबर १८९० रोजी मृत्यू झाला. 

 

→ सुविचारः 

• मानवाचे कर्तृत्व हे ईश्वरकृत नसून ते त्याच्या दीर्घकालीन अनुभवाने, दीर्घदर्शी प्रयत्नांनी आणि बुद्धिमत्तेने केलेल्या सुधारणकीचे फलित होय -सावित्रीबाई फुले.


→ दिनविशेष

 - साने गुरुजी स्मृतिदिन - १९५० : 'श्यामची आई' हे पुस्तक लिहून मुलांच्या हृदयात कायमची जागा मिळविलेल्या साने गुरुजीया जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी कोकणात पालगड येथे झाला. अमळनेर हायस्कूलमध्ये ६ वर्षे शिक्षक म्हणून काम करणारे साने गुरुजी आपल्या प्रेमळ अंतःकरणाने, गोड बोलण्याने मुलांच्यात अतिशय प्रिय झाले. समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले. श्रद्धा, भावना, स्वप्ने व त्या स्वप्नांचा ध्यास म्हणजेच गुरुजींचे साहित्य, पंढरपूरचे मंदिर हरिजनांना खुले व्हावे म्हणून उपोषण केले. साने गुरुजींची गोड गोष्टी, श्यामची आई, सुंदर पत्रे इ.सुमारे १०० च्यावर पुस्तके प्रसिध्द आहेत. समाजातील वाईट गोष्टी हळव्या मनाला सहन न झाल्यामुळे ११ जून १९५० रोजी गुरुजीनी आपले जीवन संपविले. 'साने गुरुजीचे पुण्यस्मरणानिमित्त - (आईचे उपकार) - "आई देह देते. जन्मास घालणारी तीच आणि ज्ञान देणारीही तीच! आई माझा गुरु, आई कल्पतरु, तिचे उपकार कसे मी विसरू? माझ्यात जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे. प्रेमळपणे वागायला बोलायला, चांगले विचार करायला तिनेच मा शिकवले. माझ्यातली सेवावृत्ती, निरहंकारिता, करुणा, क्षमाशीलता हे सारे आईचे देणे, कोंड्याचा मांडा करून कसा खावा आणि दारिद्रयातही स्वत्व, तत्व न गमावता कसे जगावे हेही तिनेच मला घटना प्रसंगातून, आचरणातून शिकवले. आईची स्मृती आळवून तिचे गुणगान करुन हे ओठ पवित्र करीन" 

 - 


→ मूल्ये

 समता, सर्वधर्मसमभाव.



 → अन्य घटना

  • शिवाजी महाराजांनी राजा जयसिंगाची भेट १६६५

   • वासुदेव शास्त्री खरे यांचा स्मृतिदिन. १९२४ 

   • भारताचे थोर गणितज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी आपले मार्गदर्शक डॉ. हॉईल यांच्या सहकार्याने होईल- नारळीकर सिध्दांत स्थापित केला. - १९६४ 

   • नामवंत उद्योगपती घनःश्यामदास बिर्ला यांचे निधन - १९८३ 

   

→ उपक्रम

 •'श्यामची आई' पुस्तक मिळवून वाचा.

 • साने गुरुजींची समूहगीते पाठ करा.


समूहगान

मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा


सामान्यज्ञान

 • काडेपेटीच्या आकाराच्या सोन्याचा ठोकून पत्रा बनविला तर तो टेनिसच्या मैदानाइतका होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा