Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, ७ जानेवारी, २०२४

dahavi- itihas 6. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास

     ६ मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास





पुढील संकल्पना स्पष्ट करा 
 (१) दशावतारी नाटक 
 उत्तर : (१) हिंदू धर्मात मानलेल्या विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित नाटकांना 'दशावतारी नाटके' असे म्हणतात. (२) दशावतारी नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा व वेशभूषा परंपरागत असते. नाटकातील बहुतेक भाग पदयमय असून काही संवाद पात्रे स्वयंस्फूर्तीनेही बोलतात. (३) नाटक चांगले वठण्यासाठी नाटकाच्या सुरुवातीस सूत्रधार विघ्नहर्त्या गणपतीला पदयातून आवाहन करतो. (४) ही नाटके पौराणिक असून महाराष्ट्रातील 'लोकनाट्य' या काराचाच हा एक भाग आहे.
------------------------------------------------------------------------

भजन
. उत्तर : (१) टाळ, मृदंग किंवा पखवाज आणि पेटी या वादयांच्या स्थीत परमेश्वराच्या गुणवर्णनपर व नामस्मरणपर काव्यरचना मूहिकरीत्या गाणे, यास 'भजन' असे म्हणतात.(२) भजन हा भक्तिसंगीतातील व भक्तिमार्गातील एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे. (३) भजन हा गायनपद्धतीनुसार सुगम शास्त्रीय किंवा मुगम संगीताचा प्रकार असतो. (४) भजनाचे चक्री भजन आणि सोंगी भजन असे दोन प्रकार आहेत. उभ्याने न थांबता चक्राकार फिरत भजने म्हणणे म्हणजे चक्री भजन तर देवभक्ताची भूमिका घेऊन संवादस्वरूपात भजने म्हणणे हे सोंगी भजन होय.
------------------------------------------------------------------------

(३) भारूड.
उत्तर : (१) आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे मराठीतील रूपकात्मक गीत म्हणजे 'भारूड' होय. भारुडे ही पथनाट्याप्रमाणे प्रयोगशील असतात. लौकिक व्यवहारांवर आध्यात्मिक व नैतिक रूपके रचणे म्हणजे 'भारूड' होय. (२) भारुडांत नाट्यात्मकता आणि विनोद असल्याने भारूड हा पचनाप्रकार लोकप्रिय झाला. (३) भारुडांची रचना गेयतापूर्ण असल्याने ती लोकसंगीतावर गायला सोपी असतात. (४) संतांनी भारूड रचनेतून लोकशिक्षण केले.
------------------------------------------------------------------------

कीर्तन :
 उत्तर : (१) गायन, वादन, नृत्य व विनोद यांच्या साहाय्याने ईश्वराचे गुणवर्णन व त्याच्या लीलांचे कथन केला जाणारा लोककलेचा एक प्रकार म्हणजे 'कीर्तन' होय. (२) श्रोत्यांच्या चित्तांत सर्व रसांच्या द्वारे भक्तिरसाचा परिपोष करणे हे कीर्तनाचे प्रयोजन असते. (३) कीर्तनाचे 'पूर्वरंग' व 'उत्तररंग' असे दोन भाग असतात. पूर्वरंगात नमन, अभंग व त्याचे निरूपण असते; तर उत्तररंगात पौराणिक आख्यान असते. (४) कीर्तनाने धर्मप्रसाराबरोबरच सामाजिक ऐक्याचे, दोष- दिग्दर्शनाचे व लोकशिक्षणाचेही कार्य केले. (५) कीर्तनाचे नारदीय किंवा हरिदासी कीर्तन आणि वारकरी कीर्तन अशा दोन परंपरा आहेत.

------------------------------------------------------------------------
(५) अनुबोधपट व वृत्तपट (डॉक्युमेंटरीज). 
(३) खेळ, किल्ले, प्रदेश, प्राणिजगत अशा विविध गोष्टींची माहिती देणारे वृत्तपट तयार होतात. (४) अनुबोधपट व वृत्तपट ही आधुनिक भारतीय इतिहासाच्या अभ्यासाची महत्त्वाची साधने आहेत..उत्तर : (१) ज्या चित्रपटांमधून समाजाला प्रेरणा मिळेल, शिकवण मिळेल अशा छोट्या फिल्म्स्‌ला 'अनुबोधपट' असे म्हणतात; तर ज्या फिल्म्समधून स्थळांची, प्रसंगांची माहिती दाखवली जाते त्यांना 'वृत्तपट' वा 'माहितीपट' असे म्हणतात. (२) भारतीय संस्कृती, स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणारे नेते, सामाजिक समस्या, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती अशा विविध विषयांवरील अनुबोधपट लोकशिक्षणाचे कार्य करतात.
------------------------------------------------------------------------
टिपा लिहा (प्रत्येकी २ गुण)
(१) मनोरंजनाची आवश्यकता.

 उत्तर : (१) मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणूनच प्रत्येक मानवाला मनोरंजनाची आवश्यकता असते. व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी निखळ मनोरंजन महत्त्वाचे असते. (२) चाकोरीबद्ध जगण्यातला कंटाळा दूर करून मनाला चैतन्य व उत्साह येण्यासाठी मनोरंजन आवश्यक असते. (३) मनोरंजन मनाला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम करते. मनोरंजनातून छंद वाढीस लागतात व त्यातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. (४) मनोरंजनामुळे मनाला विरंगुळा मिळतो व मनावरील ताण हलके होतात.

------------------------------------------------------------------------

 (२) मराठी रंगभूमी.
 उत्तर : (१) व्यक्तीने किंवा समुदायाने ललितकला सादर करण्याचे स्थान म्हणजे 'रंगभूमी' होय. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात मराठी रंगभूमीचा उदय झाला. विष्णुदास भावे हे 'मराठी रंगभूमीचे जनक' होत. (२) सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक, पौराणिक नाटकांबरोबरच प्रहसने रंगभूमीवर आली. या नाटकांना लिखित संहिता नसे.. (३) 'थोरले माधवराव पेशवे' या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेली नाट्यपरंपरा सुरू झाली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटकांची परंपरा सुरू झाली. सामाजिक प्रश्न आणि ऐतिहासिक विषय नाटकात हाताळले गेले. (४) मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य अत्रे यांच्या नाटकांनी रंगभूमीला सावरले. वि. वा. शिरवाडकर, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर अशा लेखकांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केले..

------------------------------------------------------------------------
(३) रंगभूमी व चित्रपट या क्षेत्रांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे.  उत्तर : रंगभूमी आणि चित्रपट यांच्याशी संबंधित पुढील अनेक व्यावसायिक क्षेत्रे आहेत- (१) रंगभूमीसाठी नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा करणाऱ्या अनेक तज्ज्ञांची गरज असते. दिग्दर्शक, कलाकार, छाया व प्रकाशयोजना करणारे तंत्रज्ञ व साहाय्यक यांची गरज असते. लेखक, त्यांचे सल्ला- गार, संगीत व भाषा यांतील जाणकार या सर्वांची आवश्यकता असते. (२) चित्रपटासाठीही या सर्वांची आवश्यकता असते; त्याचबरोबर कॅमेरामन, संवादलेखक, कथालेखक, नृत्य दिग्दर्शक, गीतकार अशा तज्ज्ञांची आवश्यकता असते. रंगभूमी व चित्रपट या क्षेत्रांशी संबंधित ही सर्व व्यावसायिक क्षेत्रे आहेत.

------------------------------------------------------------------------
(४) मनोरंजनाची साधने,

उत्तर : मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य असल्याने प्राचीन काळापासूनच त्याने मनोरंजनाची अनेक निर्माण केली. (१) प्राचीन व मध्ययुगीन भारतात उत्सव, सण-सोहळे, खेळ. नाच-गाणे ही मनोरंजनाची साधने होती. (२) बदलत्या काळाप्रमाणे मनोरंजनाच्या साधनांतही बदल गेले. टीव्ही, मोबाइल, व्हिडिओ गेम्स, चित्रपट अशी आधुनि काळातील मनोरंजनाची साधने आहेत. (३) लोकसंगीत, शास्त्रीय संगीत, नाटके, दशावतारी खेळासारख प्रहसने, पुस्तके, वृत्तपत्रे, मासिके अशीही मनोरंजनाची सा उपलब्ध असतात. (४) विविध प्रकारचे खेळ, छंद, पर्यटन आणि आपल्या जिवलगांशी मनमुराद गप्पा मारणे ही सुद्धा मनोरंजनाचीच साधने आहेत. व्यक्तीचे वय, आवड आणि आर्थिक स्थिती यांप्रमाणे मनोरंजनाच्या साधनांत बदल होतात.
------------------------------------------------------------------------

5) लळित.
उत्तर : (१) कोकण-गोवा या परिसरात आढळणारा लळित मान् एक पारंपरिक नाट्यप्रकार आहे. नवरात्रासारख्या उत्सवाची सांगत या लळिताने होते. उत्सवदेवता सिंहासनावर बसली आहे, असे तिच्या दरबारात अठरापगड जातींची सोंगे येऊन मागणी मागता यालाच 'लळित' असे म्हणतात. (२) लळितांतून राम-कृष्ण यांच्या कथा सादर होतात. (३) गावाच्या भल्यासाठी तसेच समाज सदाचरणी व्हावा म्हणून उत्सवदेवतेला मागणे मागितले जाते. (४) लळितांचा समावेश नारदीय कीर्तनपरंपरेत होतो. आधुनिक मराठी रंगभूमीला लळितांची पार्श्वभूमी आहे.
------------------------------------------------------------------------

(६) कीचकवध. (माहीत आहे का तुम्हांला ? पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ४३)
उत्तर : (१) कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी 'कीचकवध' संगीत नाटक स्वातंत्र्यपूर्व काळात लिहिले. हे रूपकात्मक नाटक होते. (२) महाभारतातील कीचकवधाच्या घटनेवर हे नाटक आधारलेले असले तरी नाटककाराचा तेवढाच उद्देश नव्हता, तर त्यातून ब्रिटिश राजवटीवर सूचक टीका करणे, हाही नाटककाराचा हेतू होता. (३) नाटकातील प्रत्येक पात्र तत्कालीन वृत्तीच्या रूपकात सादर केले होते. द्रौपदी म्हणजे असाहाय्य भारत, युधिष्ठिर म्हणजे मवाळपक्ष तर भीम म्हणजे जहालपक्ष आणि कीचक म्हणजे सत्तांध व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन अशा रूपकांत प्रेक्षक हे नाटक पाहत असत. (४) जहाल आणि मवाळ हे तत्कालीन काँग्रेसमधील दोन अंतर्गत गट होते. या नाटकामुळे जनतेत ब्रिटिश साम्राज्याबद्दल चीड निर्माण करण्याचे कार्य केले.
------------------------------------------------------------------------

(७) नटसम्राट. (माहीत आहे का तुम्हांला ? 
उत्तर : (१) प्रसिद्ध नाटककार विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिलेले प्रसिद्ध नाटक 'नटसम्राट' १९७० साली रंगभूमीवर आले. इंग्रजी नाटककार शेक्सपिअर याच्या 'किंग लिअर' या नाटकावर 'नटसम्राट' हे नाटक आधारित आहे. (२) या नाटकाचा शोकात्म नायक गणपतराव बेलवलकर हे पात्र गणपतराव जोशी व नानासाहेब फाटक या त्या काळात गाजलेल्या नटश्रेष्ठांच्या व्यक्तिमत्त्वांतून शिरवाडकरांनी साकारले आहे. या दोन नटश्रेष्ठांच्या व्यक्तिमत्त्वांच्या रंगछटा या पात्रात मिसळलेल्या आहेत. (३) या नाटकातील शोकांतिका एका वृद्ध झालेल्या नटाची आहे. आपले सर्वस्व आपल्याच मुलांना देऊन त्यांच्याकडून अपमानित झालेल्या पित्याचे दुःख यात आहे. ज्याने एके काळी उत्तमोत्तम भूमिका करून रंगमंच गाजवला, त्या नटश्रेष्ठाची ही शोकांतिका आहे. (४) या नाटकाने नाट्यलेखनात आणि रंगमंचावरील प्रयोगदर्शनात एक नवा इतिहास निर्माण केला.
------------------------------------------------------------------------

(८) तमाशा (लोकनाट्य).
 उत्तर : (१) पर्शियन भाषेतून मराठीत आलेल्या शब्दाचा अर्थ 'चित्ताला प्रसन्नता देणारे दृश्य' असा होतो. (२) लोककला आणि अभिजात कलाप्रकारांच्या मिश्रणातून तयार झालेला हा मनोरंजनाचा कलाप्रकार अठराव्या शतकात महाराष्ट्रात चांगलाच लोकप्रिय झाला. (३) तमाशाचे 'संगीत बारी' आणि 'ढोलकीचा फड' असे दोन परंपरागत प्रकार आहेत. संगीत बारीत लावण्या व संगीत यांच्या तालावर नृत्य केले जाते. ढोलकीचा फड या प्रकारात गण म्हणजेच गणेश वंदन, गवळण, बतावणी व नंतर वग म्हणजेच वगनाट्य सादर केले जाते. (४) 'विच्छा माझी पुरी करा' किंवा 'गाढवाचं लग्न' अशी आधुनिक स्वरूपात रंगमंचावर आलेली वगनाट्ये खूप गाजली.
------------------------------------------------------------------------

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा : (प्रत्येकी ३ गुण)
* (१) चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. उत्तर : (१) ऐतिहासिक घटना आणि व्यक्तींवर चित्रपट बनवताना इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो. (२) ऐतिहासिक कथाविषय असल्यास तो वास्तववादी होण्यामा तत्कालीन वातावरणाची निर्मिती करावी लागते. (३) पात्रांच्या तोंडची भाषा, चालण्या-बोलण्याच्या पद्धती याही माहीत असाव्या लागतात. (४) त्या वेळची केशभाषा, वेशभूषा, रंगभूषा इत्यादीचे नियोज करावे लागते. एकूण चित्रपटाचे वातावरण काव्यानुरूप वाटण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमात इतिहास हा विषय आणि ज्यातील जाणकार महत्त्वाचे आहेत.

------------------------------------------------------------------------
(२) संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली.
 उत्तर : संत एकनाथांनी लोकशिक्षणाच्या हेतूने अनेक भारुडे लिहिली. (१) या भारुडांमध्ये नाट्यात्मकता होती. (२) भारुडांच्या विषयांत विविधता होती. (३) विनोदाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देण्याचा उपदेश करण्याचा हा प्रकार लोकांनाही आवडला. (४) ही भारुडे चालींवर गायली जात असत. त्यामुळे लोकसंगीताच्या आधारे तो गायली जात असत. व्यवहारातील साध्या साध्या उदाहरणांतून आणि विनोदाच्या माध्यमातून रचलेली संत एकनाथांची ही भारुडे म्हणूनच लोकप्रिय झाली.
 
------------------------------------------------------------------------
(३) बाहुल्यांचा खेळ हा प्राचीन खेळ मानला जातो.
 उत्तर : (१) मनोरंजनात बाहुल्यांचा खेळ या महत्त्वपूर्ण खेळाचा प्राचीन काळापासून समावेश आहे. (२) मोहेंजोदडो, हडप्पा, ग्रीस, इजिप्त येथे झालेल्या उत्खननांत मातीच्या बाहुल्यांचे अवशेष सापडले आहेत. या बाहुल्या कठपुतळी- प्रमाणे वापरल्या जात असाव्यात. (३) पंचतंत्र, महाभारत अशा प्राचीन ग्रंथांतही या खेळाचा उल्लेख आहे. (४) महाभारतात चौसष्ट कलांपैकी एक कला म्हणून सूत्र बाहुल्यांचा उल्लेख आलेला आहे. यावरून बाहुल्यांचा खेळ हा सार्वत्रिक आणि प्राचीन खेळ आहे, हे सिद्ध होते.

------------------------------------------------------------------------
(४) विष्णुदास भावे यांना 'मराठी रंगभूमीचे जनक' म्हणून ओळखले जाते.
 उत्तर : (१) मराठी नाटकांचा उदय कीर्तन, भारुडे, दशावतारी खेळ कळसूत्री बाहुल्यांचे खेळ यांतून झाला. लळिते आणि लोकनाट्ये यांत मराठी नाटकांची बीजे रोवली गेली. (२) १८४३ साली विष्णुदास भावे यांनी 'सीतास्वयंवर' या नाटकाचा यशस्वी प्रयोग सादर केला. हे पहिले नाटक त्यांनी स्वतःच रचले होते. त्यानंतर महाभारतातील कथानकावरही त्यांनी नाटक रचले. (३) गावोगावी दौरे करून आपल्या नाटकांचे प्रयोग केले. नाटककार, दिग्दर्शक, कपडेवाला, रंगवाला इत्यादी सर्व कामेही तेच करीत असत. (४) नाट्यप्रयोगाची निश्चित एक संकल्पना त्यांनी निर्माण केली. त्यामुळे त्यांना 'मराठी रंगभूमीचे जनक' म्हणून ओळखले जाते.

------------------------------------------------------------------------
(५) ऐतिहासिक नाटकांसाठी इतिहासाच्या जाणकारांची आवश्यकता असते.
उत्तर : (१) ऐतिहासिक नाटकाची संहिता, त्यातील पात्रांचे संवाद कालसुसंगत होण्यासाठी लेखकाला इतिहासाची जाण असणे आवश्यक असते.(२) नाटकाचे नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा इत्यादी तपशील अचूक असणे महत्त्वाचे असते. (३) ऐतिहासिक नाटकांतून तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय चित्र रंगवताना इतिहासाचे ज्ञान असणे गरजेचे असते. (४) ऐतिहासिक नाटकाची भाषा व अभिव्यक्त करायची संस्कृती. यांचे ज्ञान होण्यासाठी इतिहासाच्या जाणकारांची आवश्यकता असते.
------------------------------------------------------------------------

(१) भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची खानी का आहे?
उत्तर : (१) भारतात चलत्चित्रपटाचा प्रारंभ महादेव गोपाळ पटवर्धन कुटुंबीयांनी १८८५ मध्ये केला. (२) भारतातील पहिला लघुपट तयार करून तो १८९९ मध्ये हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर ऊर्फ सावेदादा यांनी मुंबईत आझाद मैदानावर दाखवला. (३) दादासाहेब तोरणे, करंदीकर, पाटणकर व दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञांची मदत घेऊन 'पुंडलिक' हा कथापट १९१२ मध्ये मुंबईत दाखवला. (४) दादासाहेब फाळके यांनी १९१३ मध्ये संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरून स्वतः दिग्दर्शित केलेला 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला भारतीय चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला. अशा रितीने भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करून प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राकडे जातो; म्हणून 'भारतीय चित्रपटसृष्टीची जननी' अशी महाराष्ट्राची ख्याती आहे.

------------------------------------------------------------------------
 (२) पोवाडा म्हणजे काय, हे स्पष्ट करा
 उत्तर : (१) पडलेल्या प्रसंगातील नाट्य किंवा वीर पुरुषांच्या गुणांचे स्तुतीपर वर्णन करणारी वीररसयुक्त रचना म्हणजे 'पोवाडा' होय.. (२) पोवाडा हा गद्य-पद्यमिश्रित सादरीकरणाचा प्रकार असून, तो पूर्वी राजदरबारात वा लोकसमूहासमोर आवेशपूर्णरीत्या डफाच्या तालावर सादर केला जात असे. (३) पोवाड्यातून तत्कालीन सामाजिक, धार्मिक व राजकीय स्थितीचे, सामाजिक रीतिरिवाजांचे वर्णन केलेले असते. (४) लोकजागृती आणि मनोरंजन हा पोवाड्यांचा मुख्य हेतू असतो. (५) दरवारी प्रथा, युद्धांच्या पद्धती, शस्त्रांची नावे यांचे उल्लेख असतात, म्हणून पोवाडा हा इतिहासलेखनाचे उपयुक्त साधनही आहे.
------------------------------------------------------------------------


(४) यांचे स्वरूप कसे असते?
उत्तर : (१) दशावतारी नाटक हे विष्णूच्या दहा अवतार आधारित असते. पात्रांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा साहाय्याने ही नाटके सादर केली जातात. (२) देवांसाठी लाकडी मुखवटे वापरतात. नाटकाचा शेवट फोडून दहीकाला वाटणे व आरती करणे या कृतीने होतो. (३) नाटकातील बहुतेक भाग पदयमय असून, काही संवाद नवी प स्वयंस्फूर्तीने बोलतात. (2 (४) महाराष्ट्रातील लोकनाट्याचाच हा एक प्रकार आहे. शेत उत्त पीकपाणी आल्यावर सुगीच्या दिवसांत कोकण व गोवा येथे दशावता नाटकांचे प्रयोग गावोगावी केले जातात.. सादर

------------------------------------------------------------------------

(५) कीर्तनकार होण्यासाठी कोणत्या गोष्टी असतात ?
 उत्तर : कीर्तनकार होण्यासाठी पुढील गोष्टींची आवश्य असते. (१) कीर्तनकार बहुश्रुत असावा. म्हणजे त्याचा अनुभव असला पाहिजे. (२) पौराणिक आणि सामाजिक विषयांसंबंधी त्याला चांगले असावे. (३) कथानिरूपणाची शैली, प्रभावी वक्तृत्व आणि विनोदाची जोड हे गुण त्याच्याकडे असावेत. (४) गायन, वादन, मुद्राभिनय, नृत्य यांकडे त्याचे असावे. कीर्तनाची पद्धत, पोशाख अशा गोष्टीही त्याने घेतल्या पाहिजेत.
------------------------------------------------------------------------
(७)संदर्भात वि. ज. कीर्तने यांनी केलेले कार्य
 उत्तर : (१) विष्णुदास भावे यांनी प्रथम 'सीतास्वयंवर' हे नाटक रंगभूमीवर आणले. परंतु सुरुवातीच्या या नाटकांना लिखित संहिता नव्हती. त्यातील गोते जरी लिहिलेली असली, तरी संवाद उत्स्फूर्त असत, (२) वि. ज. कीर्तने यांनी १८६१ साली 'थोरले माधवराव पेशवे' हे नाटक रंगभूमीवर आणले. (३) या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे ते मुद्रित स्वरूपात, संहिता असलेले पहिले नाटक होते. (४) या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेल्या नाटकांची नवी परंपरा सुरू झाली.
 ------------------------------------------------------------------------
 (८) रंगभूमीशी कोणकोणते घटक संबंधित असतात ?
 उत्तर : रंगभूमीवर विविध ललितकला व्यक्ती वा समुदायाकडून सादर होत असतात. रंगभूमीशी पुढील घटक संबंधित असतात : (१) नाट्यसंहिता व ती लिहिणारे लेखक, नाट्य दिग्दर्शक व कलावंत. (२) रंगभूषा, वेशभूषा, रंगमंच, नेपथ्य व प्रकाशयोजना करणारे तंत्रज्ञ व त्यांचे साहाय्यक. (३) नृत्य व संगीत पार्श्वसंगीत देणारे कलाकार. (४) नाट्यप्रयोगाचा प्रेक्षकवर्ग व नाटकाची समीक्षा करणारे समीक्षक.

------------------------------------------------------------------------
चित्रपटांचे प्रकार कोणते, ते लिहा. (माहीत आहे का तुम्हांला ? 
 उत्तर: चित्रपटांचे स्वरूप, हेतू, आकार इत्यादींवरून विविध प्रकार पडतात. हे प्रकार पुढीलप्रमाणे - - (१) वार्तापट, अनुबोधपट, प्रसिद्धिपट असे मर्यादित हेतू असणारे लघुपट असतात. (२) व्यंगपट, कथापट, विनोदी चित्रपट असा एक प्रकार होतो. (३) शैक्षणिक चित्रपट, सैनिकी चित्रपट, माहितीपट असे माहितीवजा असणारे चित्रपट असतात. (४) आशयावरून सामाजिक, पौराणिक, राजकीय, मनोरंजनपर असा चित्रपटांचा एक प्रकार केला जातो. (५) साहसी (स्टंट) चित्रपट, चरित्रपर चित्रपट, असा एक प्रकार आहे. (६) अॅनिमेशन केलेले (कार्टून) छोट्या मुलांसाठी असलेले चित्रपट असाही एक प्रकार आहे. सुरुवातीस मूकपट होते, तर आता सर्व बोलपट आहेत.
------------------------------------------------------------------------

पुढील परिच्छेद काळजीपूर्वक वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा (४ गुण) पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक ४१ कीर्तनाच्या नारदीय करत असत.
(१) संत गाडगे महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून कोणते कार्य केले ?
उत्तर : संत गाडगे महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून जातिभेद निर्मूलन, स्वच्छता, व्यसनमुक्ती यांसारख्या सामाजिक दोषांवर निरूपण करून प्रबोधनाचे कार्य केले.
------------------------------------------------------------------------

(२) कीर्तनाचा 'पूर्वरंग' व 'उत्तररंग' म्हणजे काय ?
उत्तर : कीर्तनाचा 'पूर्वरंग' म्हणजे कीर्तनाच्या सुरुवातीस म्हटले जाणारे नमन, निरूपणाचा अभंग व निरूपण आणि 'उत्तररंग' म्हणजे नमन आणि निरूपणानंतर एखादे आख्यान सांगणे होय.

------------------------------------------------------------------------

 (३) राष्ट्रीय कीर्तनाचे स्वरूप स्पष्ट करा.
  उत्तर : (१) स्वातंत्र्य चळवळीच्या काळात कीर्तनातून समाजप्रबोधन आणि देशप्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न कीर्तनातून केला गेला. या कीर्तनांनाच 'राष्ट्रीय कीर्तन' असे म्हटले गेले. (२) ही कीर्तने नारदीय कीर्तनाप्रमाणेच सादर केली जात असत. (३) नेते, शास्त्रज्ञ, समाजसुधारक अशा कर्तृत्ववान व्यक्तींच्या चरित्रांच्या आधारे राष्ट्रीय कीर्तनातून समाजप्रबोधन केले जाते. (४) वाईचे दत्तोपंत पटवर्धन यांनी राष्ट्रीय कीर्तनाची सुरुवात केली.
------------------------------------------------------------------------


पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (प्रत्येकी ४ गुण) (९) बाहुल्यांच्या खेळाच्या पद्धती सांगून, या खेळाची माहिती लिहा.
 उत्तर : (१) बाहुल्यांच्या खेळाच्या राजस्थानी व दाक्षिणात्य अशा दोन पद्धती आहेत. राजस्थानी पद्धतीच्या बाहुलीला 'कठपुतली' असे म्हणतात. या बाहुल्या प्रामुख्याने लाकडी असून त्यावर कापड व कातडे यांचा वापर केला जातो. दाक्षिणात्य बाहुल्या आकाराने मोठ्या असतात. (२) राजस्थानी पद्धतीत ऐतिहासिक व्यक्ती व प्रसंगांवर भर असतो; तर दाक्षिणात्य पद्धतीत पौराणिक प्रसंगांना प्राधान्य असते. (३) लाकूड, लोकर, कातडे, शिंगे व हस्तिदंत यांचा वापर बाहुल्या बनवण्यासाठी केला जातो. (४) कठपुतळीचा प्रयोग रंगण्यासाठी सूत्रधाराचे कौशल्य अत्यंत महत्त्वाचे असते. बाहुल्यांना काळ्या धाग्याने जोडून प्रेक्षकांना न दिसेल अशा पद्धतीने कलाकार बोटांच्या हालचालींनी बाहुल्यांना नाचवत असतो. सूत्रधार बोलेल त्याप्रमाणे बाहुल्यांची हालचाल व नृत्य होते.(५) लहान रंगमंच, प्रकाश व ध्वनी यांचा कल्पकतेने वापर केला जातो. बाहुल्यांचे छाया-बाहुली, हात-बाहुली, काठी बाहुली व सूत्र - बाहुली असे प्रकार आहेत. उत्तर प्रदेश, आसाम, महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, केरळ अशा अनेक राज्यांत कठपुतळीचा खेळ कलावंत सादर करीत असतात.
 ------------------------------------------------------------------------

(२) भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकासाची वाटचाल लिहा.
 उत्तर : भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकासाची वाटचाल पुढीलप्रमाणे झाली. (१) चलत्चित्रणाचा शोध लागल्यावर चित्रपटकलेचा जन्म झाला. १८९९ मध्ये हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर ऊर्फ सावेदादा यांनी भारतात पहिला लघुपट तयार करून त्याचे प्रदर्शन केले. (२) भारतीय चित्रपटांच्या विकासात दादासाहेब तोरणे, करंदीकर, पाटणकर, दिवेकर यांचे योगदान महत्त्वाचे आहे; कारण त्यांनी परदेशी तंत्रज्ञांचे साहाय्य घेऊन 'पुंडलिक' हा कथापट तयार केला.(३) पुढे दादासाहेब फाळके यांनी पूर्ण लांबीचा व सर्व भारतात केलेला 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला चित्रपट तयार त्यांनी पुढे अनेक अनुबोधपटही तयार केले. प्रक्रि (४) आनंदराव पेंटर यांनी भारतात पहिला सिने-कॅमेरा केला. त्यांचे मावस बंधू बाबुराव पेंटर यांनी ऐतिहासिक, सामाजि असे अनेक चित्रपट तयार केले. भालजी पेंढारकरांनी चित्रपटाम राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार केला. (५) कमलाबाई मंगरूळकर या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रण निर्मात्या: तर कमलाबाई गोखले या चित्रपटात काम करणान्य पहिल्या महिला होत. मराठीप्रमाणेच अन्य भाषांतूनही चित्रपटनिर्मि झाली. (६) प्रभात फिल्म कंपनीने अनेक धार्मिक, चरित्रपर, ऐतिहासिक व सामाजिक चित्रपट तयार केले. बॉम्बे टॉकीज, फिल्मिस्तार राजकमल प्रॉडक्शन, नवकेतन, आर. के. स्टुडिओज अशा कंपन्यांन उत्तमोत्तम चित्रपट तयार केले. १९६१ ते १९८१ हा काळ भारतीय चित्रपटांचे 'सुवर्णयुग' मानला जातो.

------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा