Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३

5 सप्टेंबर शिक्षकदिन

                 5 सप्टेंबर शिक्षकदिन                 


शिक्षक म्हणजे एक समुद्र.......

                 ज्ञानाचा, पावित्र्याचा, 
                एक आदरणीय कोपरा,
              प्रत्येक व्यक्तीच्या मनातला......

शिक्षक:- अपूर्णाला पूर्ण करणारा......
शिक्षक:- शब्दांनी ज्ञान वाढविणारा
शिक्षक:- जगण्यातुन जीवन घडवणारा
शिक्षक:- तत्त्वातुन मुल्ये फुलवणारा...

माझ्या आयुष्याला आकार, आधार आणि अमर्यादित ज्ञान देणाऱ्या प्रत्येक गुरूवर्यास शतशः नमन.......
मित्रांनो,

           "शिकवता शिकविता आपणास
                  आकाशाला गवसणी
               घालण्याचे सामर्थ्य देणारे
             आदराचे स्थान म्हणजे आपले......."
                         शिक्षक

५ सप्टेंबर... म्हणजे शिक्षक दिन. प्रथमतः आई या गुरूला नंतर... माझ्या वडील या गुरूंना आणि ज्यांनी माझं भविष्य घडविले... त्या तमाम शिक्षकरूपी
देवांना नमन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करतो.

                "चिखलातला जन्मही
                 सुंदर सार्थकी लावावा,
                 निसर्गासारखा शिक्षक
                  प्रत्येकाला मिळावा. "

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
यांचा ५ सप्टेंबर रोजी जन्मदिन 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'शिक्षक' हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान
व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत
असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त
करण्याचा हा दिवस.
                असं म्हणतात की,
                        एक पुस्तक,
                        ए एक पेन,
                       एक विद्यार्थी,
                   आणि एक शिक्षक,
               हे संपूर्ण जग बदलू शकतात.....

शिक्षक म्हणजे,
आयुष्याला कलाटणी देणारी प्रेरणा,ध्येयपूर्तीसाठी मार्ग दाखवणारी दिशा,कधी बिकट परिस्थितीत, प्रेमाची साथ,तर कधी कौतुकांचे गोड शब्द तर कधी हातावर बसणारा छडीचा मार.

शिक्षक म्हणजे,
चांगले संस्कार करणारी मूर्ती,
संकटकाळात धैर्य देणारी स्फूर्ती,
चारित्र्यपूर्ण विद्यार्थी घडवणारा शिल्पकार,
जादूची छडी जी करते विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार.

शिक्षक म्हणजे,
सखोल मूलभूत ज्ञानाचे भांडार,
दूर करी जीवनातील अज्ञानमय अंधार,
अन्यायाविरुध्द आवाज उठविणारी तलवार,
अनुभवातून निर्माण होणारा साक्षात्कार,
असे हे शिक्षकांचे आजन्म न फिटणारे उपकार.
----------------------------

शिक्षकदिना निमित्त भाषण

 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 

             माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, ग्रीक देशातील प्लेटोया विचारवंताचे म्हणणे असे होते की, "तत्वचिंतक शासनकतें व्हावेत." प्लेटोचा हा विचार ज्यांच्या रुपाने भारतामध्ये साक्षात उतरला ते थोर तत्वचिंतक म्हणजे, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन होय. ५ सप्टेंबर १८८८ रोजी, तिरुत्तणी (आंध्रप्रदेश) येथे राधाकृष्णन जन्म झाला. म्रदास येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर मद्रास विद्यापीठातच त्यानी अध्यापनाचे कार्य सुरू केले. त्यानंतर म्हैसूर विद्यापीठातही त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. 

                   त्यानंतर कलकत्ता विद्यापीठामधे अध्यापनासाठी त्यांना सन्मानपूर्वक बोलविण्यात आले. अशा तऱ्हेने उत्तम प्राध्यापक, थोर विचारवंत, तत्वज्ञ, उत्कृष्ट वक्ते म्हणून त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली होती. यांचा भारताबरोबरच परदेशातही या तत्वज्ञाची महती पोहोचली होती आणि म्हणूनच 'ऑक्सफर्ड सारख्या अनेक प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांतून त्यांना व्याख्यानाची व अध्यापनासाठीची निमंत्रणे येऊ लागली. विविध विषयांवर परदेशात व्याख्याने देत असताना, भारतीय तत्वज्ञानावरील समर्पक विश्लेषणाने त्यांनी पाश्चात्यांची मने जिंकली. 

                      स्वामी विवेकानंदाच्या नंतर भारतीय तत्त्वज्ञानाचा विचार सातासमुद्रापलीकडे नेण्याचे काम या ऋषितुल्य शिक्षकाने केले. भारतीय तत्वज्ञान', 'महात्मा गांधी', 'गौतम बुद्ध', 'भारत आणि चीन"यासारख्या अनेक पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले. १९३१ साली ते आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. त्यानंतर बनारस विद्यापीठाचे कुलगुरु व दिल्ली विद्यापीठाचे कुलपती म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांना शासकीय प्रवाहात आणण्याचे काम पंडित नेहरूंनी केले. 

                  राधाकृष्णन यांच्यासारखे कुशाग्र बुद्धिवंत. थोर विचारवंत, ज्ञानसंपन्न तत्वज्ञ शासनात राहिल्यास भारताच्या राजकीय व्यवहाराला तात्विक अधिष्ठान प्राप्त होईल अशी नेहरूंची धारणा होती. १९५२ साली ते भारताचे उपराष्ट्रपती झाले व १९६२ मध्ये भारतातील सर्वोच्च स्थानी 'राष्ट्रपती' म्हणून विराजमान झाले. 

                उच्चविद्याविभूषित तत्त्वज्ञ, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अध्यापक, उत्कृष्ट प्रशासक, द्रष्टे विचारवंत, देशाचे उपराष्ट्रपती, राष्ट्रपती यांसारख्या अनेक सन्माननीय पदांवर काम करूनही शिक्षण क्षेत्र हे त्यांच्या आवडीचे क्षेत्र राहिले आणि  अगदी शेवटपर्यंत त्यांच्यातील शिक्षक सदैव जागा राहिला. म्हणूनच आपण त्यांचा जन्मदिन ५ सप्टेंबर हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करतो. अशा या गुरुच्याही 'महागुरु पुढे नतमस्तक होणे हे आपल्यासारख्या ज्ञानसाधकाचे परमकर्तव्यच आहे. 

              जय हिंद!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा