Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, २ सप्टेंबर, २०२३

18 सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

              १८ सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

→ प्रार्थना 

प्रभु तेरो नाम जो ध्याये फल पावे सुख लाये....

 → श्लोक

  - विपत्काळी धैर्य, प्रभूपणि सहिष्णुत्व बरवे । सभे पांडित्याचा प्रसार, समरी शौर्य मिरवे । स्वकीतीच्या ठायी प्रचुर रति विद्याव्यसन जे । तयांचे हे स्वाभाविक गुण सहा सत्पुरुष जे ॥ 

  - संकट काळात धैर्य असणे; ऐश्वर्याच्या काळात क्षमाशीलत्व असणे; सभेमध्ये विद्वत्ता दिसून येणे; युध्दात पराक्रम गाजविणे, सत्य वार : आवड असणे आणि विद्येचे वेड असणे हे थोर पुरुषांचे जन्मजात सहा गुण आहेत.

→ चिंतन

 शांतता म्हणजे नुसतेच आवाज नसणे नाही. उष्मा, धूळ आणि रोजच्या जीवनाच्या धकाधकीतून दूर होऊन समाधान आणि शांती मिळविण्यासाठी अंतरीच्या गाभाऱ्यात माणूस डोकावून बघतो तेव्हा मिळते ती खरी मनःशांती - सोली सोराबजी

कथाकथन

 - 'जननी आणि जन्मभूमी

 - १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केले. अनाक्रमणाचा करार झाला असताना भारतावर है, झाले. पंचशील तत्यांचा जयघोष चालला होता. 'हिंदी-चिनी भाई-भाई' चे वातावरण होते आणि अचानक चिनी सैन्य भारतात घुसले. प्रेमात आणि सर्व काही क्षम्य असते असे हे व्यावहारिक तत्त्वज्ञान आहे. राजकारणात 'विश्वासघात' ही नीती मानली जाते. चूशूल रणक्षेत्रावर अपुन्या साम शस्त्रांच्या बळावर एक जवान मेजर आपल्या रणकौशल्याची चुणूक चिनी सैनिकांना दाखवित होता. आणि अचानक त्याच्या घरी आईला तार ि आपला मुलगा रणक्षेत्रात धारातीर्थी पडला आहे." राजहंस माझा निजला! कवितेत गोविंदाग्रजांनी म्हटले आहे" ते हृदय कसे आईये, मी उ नाही. या वृत्ताने आई निष्तब्य अवाक झाली. वृत मुलाच्या निधनाचे होते. पण ईश्वरी इच्छेपुढे कोणाचे काही चालत नाही. मातृभूमीच्या र अनेक मातांना पुत्रहीन व्हावे लागते. कुणाचा भाऊ जातो. मरण तर अटळच असते. पण रणांगणावरील मरण स्वर्गप्राप्तीची दिशा दाखविते. आ आपल्यासारखाच पुत्रवियोगाचा धक्क बसलेल्या अनेक मातांचे दुःख आठवित आपले दुःख ती माता हलके करीत होती. दोन दिवस असेच नियन | तिसऱ्या दिवशी अचानक तार आली, “आपला मुलगा जिवंत आहे. त्याला लवकरच लखनौच्या दवाखान्यांत आणले जाणार आहे." मातेच्या अं | पारावार उरला नाही. त्याच्या मृत्युच्या बातमीने आलेल्या डोळ्यातील दुःखी अश्रूंना आनंदाश्रूचे रूप मिळाले. भूमिगत खजिना योध्याला लखनीच्या | हॉस्पिटलमधून दिल्लीच्या इस्पितळात आणण्यात आले. दिल्लीत ही बातमी वणव्यासारखी पसरली. त्या वीर युवकाला पाहण्यासाठी दिल्लीची जनता यज्ञपाल जैनसारखा स्वातंत्र्यसैनिकही हेलावून गेला. तेही त्याला पाहायला गेले. युवकाचा सारा चेहरामोहराचं बदलला होता. तोंड नाक डोळे - - विकृत झाले होते. हातापायांची बोटे तुटली होती. पण आई प्रसन्न दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंदाच्या लहरी उसळत होत्या. यशपालजींनी "आता मुलाकडे पाहून तुम्हाला कसे वाटते?" तिचे डोळे आनंदाने चमकले. "माझ्या मुलाने रणांगणातून पळ काढला नाही. ही केवढी आनंददायक आहे. मृत्यूशी झुंज देत तो रणांगणात दृढ निश्चयाने उभा राहिला, ही केवढी अभिमानाची गोष्ट आहे! परमेश्वराजवळ माझी एवढीच प्रार्थना में हा लवकर बरा होऊ दे व देशाच्या स्वातंत्र्यरक्षणासाठी पुन्हा लढायला जाऊ दे" 'जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी' माता आणि मातृभूमी या स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत. माणसाचं कर्तृत्व हे त्याच्या तत्त्वनिष्ठेशी नि असतं, मरण अपरिहार्य व अटळ आहे. पण अशा मृत्यूचं स्वागत करणारी माणसे कधी मरत नाहीत. ती अजरामरच होतात. वीर पुरुषांच्या माते उद्गार इतरांनाही प्रेरणादायक ठरतात. यालाच मातेचे संस्कार म्हणतात, अशा संस्कारांनी माणसाचे जीवन संपन्न होत असते. 'मदत करणे हीच धैर्यशीलतेच्या मागे असते. 'धाडस' हा सदगुण आहे. ही मदत करण्याचे दोन मार्ग समाजात उपलब्ध आहेत. मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष | शेजान्याला आपण मदत करतोच पण जेव्हा देशावर परकीय आक्रमणे होतात तेव्हा शत्रूशी रणांगणावर जाऊन दोन हात करणे हाही एक असा धाडसाचा, धैर्यशीलत्त्वाचा उत्कृष्ट आदर्श आहे व असे धैर्य दाखविणारा आपला पुत्र आहे. हा मातेचा रास्त अभिमान समाजातील अन्य ज प्रेरणादायक मान वाढतो. राष्ट्राचा ध्वज उंच राहतो. मातेचे मस्तक ताठ राहते.

सुविचार 

 • माता, मातृभाषा, मातृभूमी सर्वश्रेष्ठ त्यांचा आदर करावा

 • जग हे खूप मोठे आहे. जगापेक्षा जीवन मोठे आहे आणि जीवना पेक्षा मनुष्य मोठा आहे.

→ दिनविशेष

 • पहिल्या मराठी नाट्यछटेचा जन्म - १९११. शंकर काशीनाथ गर्गे उर्फ दिवाकर यांचा जन्म १८ जानेवारी १८८९ रोजी पण स्वभावाने अतिशय भिडस्त, नूतन मराठी विद्यालयात ते शिक्षक होते. इंग्लिश साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. फर्ग्युसन कॉलेजम प्राध्यापक वासुदेवराव पटवर्धन यांच्या संगतीत दिवाकरांची प्रतिभा फुलली. ब्राऊनिंगच्या मोनोलॉगच्या वाचनाने दिवाकरांना आपले अनुभव सुखदुःख, आशानिराशा, संताप, उद्वेग, तिरस्कार इ. मनोविकार व्यक्त करणारा वाङ्मयप्रकार गवसला. भिडस्त वृत्तीच्या दिवाकरांना ते फार अंतःप्रेरणेने १८ सप्टेंबर १९११ रोजी 'महासर्प' या नावाचा मराठी मोनोलॉग त्यांनी लिहिला. प्रा. पटवर्धनांनी त्याला 'नाट्यछटा' हे नाव दिले केसरी आणि करमणूक मधून नाट्यछटा प्रसिध्दही झाल्या. आजही त्या टवटवीत आहेत. शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये अजूनही दिवाकरांच्या आवर्जून घेतल्या जातात. अत्यंत अल्प आयुष्य लाभलेल्या दिवाकरांचा १ ऑक्टोबर १९३१ हा स्मृतिदिन.

मूल्ये - 

• ज्ञानवृध्दी, साहित्यप्रेम.

→ अन्य घटना 

• प्रसिध्द ब्रिटिश विद्वान डॉ. सॅम्युएल जॉन्सन यांचा जन्म १७०९

 • मराठा चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना १९२ 

 • महाराष्ट्रातील पहिला तारांगण दर्शक - १९५४ 

 • पहिले भारतरत्न डॉ. भगवादास स्मृतीदिन - १९५८

  • शिक्षणमहर्षी जी.डी. बेंडाळे जन > उपक्रम 

  • दिवाकरांच्या नाट्यछटांचे पुस्तक मिळवून वाचा. ह्र तुम्हाला आवडलेली नाट्यछटा करून दाखवा.

→ समूहगान

 • नन्हा मुन्ना राही हूँ देश का सिपाही हूँ......

→ सामान्यज्ञान

 • भारतात पिनकोड व्यवस्था १५ ऑगस्ट १९७२ पासून सुरू झाली. यासाठी देशाचे आठ विभाग केले आहेत. पहिला अंक दर्शवितो, दुसरा विभाग अंक उपविभाग, पहिले तिन्ही अंक मिळून जिल्हा दर्शवितात तर शेवटचे तीन अंक त्या जिल्ह्यातील पोस्टाचा क्रमांक द • क्लेंडयॅप या फ्रेंच माणसाने सर्व मुळाक्षरे विविध हालचालीत बसवून दर मिनिटाला सुमारे पंचवीस अक्षरांचा संदेश पाठविता येईल, अशी सोपी | शोधून वापरात आणली होती. स्काऊट संदेशवहन, जहाजावरील संदेशवहन यात आजही ही पध्दत शिकविली जा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा