Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३

दहावी मराठी १५. खोद आणखी थोडेसे

दहावी मराठी  १५.  खोद आणखी थोडेसे



कृती १ : (आकलन कृती)

 (२) आकृती पूर्ण करा :

 'मनातले गाणे' असे म्हटल्यावर तुम्हांला सुचणाऱ्या कल्पना 

- आईवडिलांविषयी कृतज्ञता भाव

 - देशप्रेम, मातृभूमीचा अभिमान

 - गुरुजनांविषयी आदर

 - मित्र/मैत्रिणींबद्दलचा जिव्हाळा

------------------------------------------------------

(३) कवितेतील पुढील संकल्पना व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा : 


      कवितेतील संकल्पना                       संकल्पनांचा अर्थ

  (i) सारी खोटी नसतात नाणी  नसतात.      - सगळे लोक फसवे

 (ii) घट्ट मिटू नका ओठ   करावेत.     - मनातील विचार व्यक्त

 (iii) मूठ मिटून म्हणायचे भरलेली कशाला  - भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत.

 (iv) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी  - मनातील  सामर्थ्य व्यापक बनवावे

  --------------------------------------------------------------------                                                                                                        

कृती २ : (आकलन कृती)      

 (३) योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा : 

(i) 'खोदणे' या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे..... 

  - जिद्दीने आणखी प्रयत्न करणे.

---------------------------------            

  (ii) गाणे असते मनी म्हणजे...... 

 - मनात नवनिर्मिती क्षमता असते.

-------------------------------

(४) कवितेच्या आधारे पुढील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा :

  (i) संयमाने वागा तली तळी.             -                 योग्य 

  (ii) सकारात्मक राहा                       -                  योग्य   

  (iii) उतावळे व्हा                              -              अयोग्य             

  (iv) चांगुलपणावर विश्वास ठेवा          -               योग्य

  (v) नकारात्मक विचार करा                -             अयोग्य

   (vi) खूप हुरळून जा                        -             अयोग्य

   (vii) संवेदनशीलता जपा                  -              योग्य

   (viii) जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा  -  योग्य 

   (ix) जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा         -        अयोग्य

    (x) नवनिर्मितीवर विश्वास ठेवा                -          योग्य

    (xi) धीर सोडू नका                              -         योग्य

    (xii) यशाचा विजयोत्सव करा                 -      अयोग्य  

----------------------------------------------------           

कृती ३ : (काव्यसौंदर्य कृती) 

 (१) 'आर्त जन्माचे असते, रित्या गळणाऱ्या पानी' ओळींमधील अर्थ तुमच्या भाषेत लिहा.  उत्तर : कवयित्री आसावरी काकडे यांनी 'खोद आणखी थोडेसे' या कवितेमध्ये माणसाने प्रयत्नवादी होऊन जगण्याची उमेद धरावी, असा उपदेश केला आहे. 

     कवयित्री म्हणतात - • घट्ट ओठ मिटून दुःख सोसत बसू नये. आपल्या मनात खोलवर एक गाणे लपलेले असते, ते शोधून काढायला हवे. हे समजावताना त्यांनी 'गळणाऱ्या पानाचे' प्रतीक वापरले आहे. शिशिरऋतूमध्ये पानगळ होते. झाड निष्पर्ण होते. परंतु जे पान सुकून, रिते होऊन झाडापासून विलग होते त्या पानात झाडावर असताना सोसलेल्या वेदना असतात. हे जन्माचे आर्त, आयुष्यात सोसलेल्या वेदना, त्या सुरकुतलेल्या गळणाऱ्या पानात सामावलेल्या असतात म्हणून पुन्हा वसंतात पालवी फुटण्याची उमेद ते बाळगून असते. गळणाऱ्या पानामधून जीवन जगण्याची उमेद पुन्हा जागृत होते, हा आशावाद या ओळींतून व्यक्त झाला आहे.

--------------------------------------------------------------

(२) 'गाणे असे गं मनी' या ओळीतील तुम्हांला समजलेला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश स्पष्ट करा. 

  उत्तर : आसावरी काकडे यांनी 'खोद आणखी थोडेसे' या कवितेमधून सकारात्मक जीवन जगण्याची शिकवण देताना प्रत्येकाच्या मनात असलेल्या निर्मितिक्षमतेला आवाहन केले आहे.

        कवयित्रींच्या मते - मातीखाली लपलेला झरा शोधेपर्यंत माणसाने अथक प्रयत्न करायला हवेत. धीर एकवटून आयुष्याचा सकारात्मक शोध घ्यायला हवा. घट्ट ओठ मिटून दुःख सोसत राहू नये. प्रत्येकाचे मन हे निर्मितिक्षम असते. त्या अंतर्मनातील गाभ्याशी ज्याचे त्याचे गाणे दडलेले असते. मनाच्या तळाशी असलेले हे गाणे मर्मबंधाची ठेव असते. आपल्यात मग्न होऊन ते गाणे अनुभवणे हे जीवनाचे सार्थक ठरते. आपल्यातल्या निर्मितिक्षमतेचा शोध आपणच घ्यायला हवा. मनात असलेली निर्मितिक्षमता जागी करायला हवी म्हणजे मग 'आनंदाचे डोही आनंद तरंग' ही अवस्था अनुभवता येईल. 

     अशा प्रकारे कवयित्रींनी 'गाणे असते गं मनी' या ओळीतून माणसाला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश दिला आहे.

------------------------------------------------------------

(३) 'परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही' याबाबतीत तुम्ही घेतलेला अनुभव लिहा. 

  नमुना उत्तर : आमचे 'बाभूळगाव' हे गरीब शेतकऱ्यांचे गाव होय। डोंगरझाडी व विकट मार्ग त्यामुळे ते तालुक्याच्या गावापासून लांब व सोयींच्या बाबतीत अडचणीचे आहे. आमच्या गावात जेमतेम चौथीपर्यंतच शाळा, तीही एकशिक्षकी एका पडक्या घरात भरायची. पाचवीनंतरच्या विद्याथ्र्यांना जंगलातून वाट काढत दहा किलोमीटर लांबवर तालुक्याच्या गावच्या शाळेत जावे लागायचे. आमचे रोकडे मास्तर फार मेहनती होते. त्यांनी तालुक्याच्या शिक्षणाधिकाऱ्याला एक अर्ज लिहिला व आम्हां मुलांना प्रत्येक पालकाची त्यावर सही आणायला सांगितले. प्रत्येक विदयार्थ्याने आपापल्या पालकांची सही व अंगठा आणला. पंचक्रोशीतही आम्ही जाऊन मोठमोठ्या माणसांना भेटलो. त्यांच्या शिफारशी गोळा केल्या. गेल्या १५ ऑगस्टला आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले व गुरुजींनी त्यांना पुढच्या शिक्षणव्यवस्थेचा अर्ज दिला. काही निवडक मुलांनी भाषणे करून पुढील शिक्षणाची व्यवस्था गावात होण्यासाठी विनवले. अखेर अथक व निष्ठेने केलेल्या प्रयत्नांमुळे आमच्या गावात जि.प. ची शाळा मंजूर झाली. आम्हांला 'परिश्रमाचे फळ' मिळाले!

--------------------------------------------------------------

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा