Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३

दहावी मराठी १३. कर्ते सुधारक कर्वे

दहावी मराठी १३. कर्ते सुधारक कर्वे



कृती २ : (आकलन कृती) 

 (१) पुढील आकृत्या पूर्ण करा : 

 (i) महर्षी कर्वे यांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य प्रकार

 -  राष्ट्रीय स्वातंत्र्य

  -  संपूर्ण स्वातंत्र्य

-------------------------------------------

(ii) महर्षी कर्वे यांचे स्त्री-स्वातंत्र्याबद्दलचे विचार

   - स्त्रियांना गुलामीतून मुक्त करायचे असेल तर देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. 

    - आपण गुलाम आहोत याचे स्त्रीला भान आले पाहिजे. 

    - स्त्रीने शिक्षण घेतलेच पाहिजे. 

     - शांतपणे, सोशीकपणे व सहिष्णू वृत्तीने स्त्री-शिक्षणाची चळवळ केली पाहिजे.

------------------------------------------------------

(iii) महर्षी कर्वे यांची प्रेरणास्थाने

 - पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र 

- ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवनकार्य

-------------------------------------------

(२) महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओघतक्ता तयार करा.

  कार्यात नेमकेपणा होता.

 - ते बोलत नसत. 

  - विचार करीत असत.

 -विचार पक्का झाला की 

  - तो विचार आचरणात आणत. 

  - लोकांना त्यांच्या कृतीतून त्यांचा विचार समजत असे.

-----------------------------------------------

(३) पाठाच्या आधारे वाक्यांचा उर्वरित भाग लिहून वाक्ये  पूर्ण  करा. 

(i) स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे -

 - खडकावर डोके गिळून टाकायला येईल.

----------------------------------------------------------------

 (ii) समाजाविरुद्ध विद्रोह केला तर 

  - वद्रोह करणाऱ्याला समाज गिळून टाकायला येईल.

-----------------------------------------------------------

 (iii) लोकांनी कर्वे यांची ससेहोलपट चालवली तरी

- कर्व्यांनी त्यांना शिव्याशाप दिले नाहीत किंवा आपल्या कार्यापासून विचलित कर्वे झाले नाहीत.

------------------------------------------------------------

कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती)

• 'जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण' हे वचन महर्षी कर्वे यांच्या जीवनाला कसे लागू पडते, ते स्पष्ट करा. 

 उत्तर : अण्णासाहेबांनी फार मोठे स्वप्न पाहिले होते. ते फार मोठी झेप घेऊ पाहत होते. त्यांच्या स्वप्नाला संपूर्ण समाजाची साथ मिळाली. नाही. समाजाने अण्णासाहेबांना ओळखलेच नाही. समाजाने साथ दिली नाहीच; उलट पराकोटीचा विरोध केला. त्यांचा सतत अपमान केला. त्यांना धक्काबुक्की केली. त्यांचे कपडे फाडले. हे रोज घडत होते. त्यामुळे स्वतःचे कपडे रोज रोज शिवण्याची पाळी त्यांच्यावर येई. स्त्री-शिक्षणासाठी देणग्या गोळा केल्या तर भ्रष्टाचाराचा सतत धाक दाखवला जाई. त्यांच्या चळवळीमुळे कुटुंबीयांनाही त्रास सहन करावा लागे. त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यातही आला होता. हे सर्व यातनामय होते. लोककल्याणासाठी अण्णासाहेबांनी या यातना सहन केल्या. आज आपण अण्णासाहेबांची स्मारके उभारतो. परंतु प्रत्यक्ष जीवनात त्यांना दुःख, कष्ट आणि यातनाच सहन कराव्या लागल्या. 'जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण' हे तुकाराम महाराजांचे वचन अण्णासाहेबांना तंतोतंत लागू पडते.

-------------------------------------------------------------------------------

कृती १ : (आकलन कृती) 

 (१) आकृती पूर्ण करा : 

  महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची स्वप्ने

  - स्त्री स्वाभिमानी बनली पाहिजे.

   - स्त्री शिकली पाहिजे.

  - उच्चविद्याविभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा केली पाहिजे.

  - स्त्रीला पुरुषाइतकेच स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.

---------------------------------------------------------

(२) हे केव्हा घडेल ते लिहा : 

(i) कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल , 

     - जेव्हा पुरुषांचेही ‘शिक्षण' होईल.

----------------------------------------------

(ii) स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल, 

- जेव्हा ती उच्चविद्याविभूषित होईल.

-------------------------------

(३) चौकटी पूर्ण करा : 

  (i) लेखकांच्या मते, दुसऱ्याच्या दुःखात दुःखी व सुखात सुखी होणारा   - स्थितप्रज्ञ

(ii) कर्वे यांना लोकमानसाने दिलेली पदवी  - महर्षी

(iii) कर्वे यांना राजमानसाने दिलेली पदवी- भारतरत्न

------------------------------------------------------

कृती २ : (आकलन कृती) 

(१) कार्य या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे लिहा.     

  कार्य या नामाची विशेषणे :

 मोठे, अतोनात, कठीण, ऐतिहासिक, जटिल, अटीतटीचे, महाकठीण, अलौकिक,  महान इत्यादी.

-------------------------------------------

कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती) 

(१) 'कर्ते सुधारक कर्वे' पाठातून महर्षी अण्णा कर्वे यांचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण तुमच्या शब्दांत सांगा. 

 उत्तर : अण्णासाहेब कर्वे यांचे फार मोठे वेगळेपण या पाठातून वाचकांसमोर येते. अण्णासाहेबांनी महान कार्य करून भारताला उपकृत करून ठेवले आहे. जगात अशी अनेक मोठी माणसे होऊन गेली आहेत. पण अण्णासाहेब या सगळ्यांत वेगळे उठून दिसतात. त्याला कारण आहे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला महत्त्वाचा गुण. बऱ्याच वेळा सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना स्वतःच्या सामाजिक कार्याचा गर्व असतो. ती माणसे या गर्वामुळे आक्रमक बनतात. अण्णासाहेबांची प्रकृती याबाबतीत नेमकी उलटी होती. त्यांना प्रचंड आत्मविश्वास होता. पण गर्व नव्हता. ते कधीच आक्रमक बनले नाहीत. उलट ते शांतपणे, कोणावरही न रागावता, आक्रस्ताळेपणा न करता आपले काम करीत. त्यांचे अपमान झाले. अडवणूक झाली. त्यांच्यावर हल्ले झाले. जाता-येता त्यांचे कपडे फाडले गेले. पण ते विचलित झाले नाहीत. घाबरले नाहीत किंवा दुःखीकष्टीही झाले नाहीत. ते स्थितप्रज्ञाप्रमाणे शांत राहिले. नव्हे ते स्थितप्रज्ञच होते. हा त्यांचा गुण, त्यांचा वेगळेपणा मला खूप भावला आहे. खूप आवडला आहे.

-----------------------------------------------------

(२) 'स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे, 'या   विधानामागील अण्णांचा दृष्टिकोन स्पष्ट करा. 

उत्तर : समाजात स्त्रियांची संख्या पुरुषांइतकीच असते. थोडी कमी-जास्त भरेल. पण साधारणपणे स्त्रिया म्हणजे समाजाचा अर्धा भाग होय. दुर्दैवाने आपल्या समाजाने स्त्रियांना मागासलेले ठेवले. त्यामुळे अर्धा समाज मागासलेला राहिला. त्याचे अनंत तोटे समाजाला आजसुद्धा भोगावे लागत आहेत. बैलगाडीचा एक बैल धडधाकट आहे आणि दुसरा कमकुवत, रोगट व लंगडा असेल तर ती बैलगाडी चांगले कार्य पार पाडूच शकणार नाही. आपण जबरदस्ती केली तर ती कशीबशी ओढली जाईल. काम कसेबसे, तेही अर्धेकच्चे पार पडेल. त्याला वेळसुद्धा प्रचंड लागेल. एकूण नुकसानच होईल. असेच नुकसान सामाजिक प्रगतीमध्ये होते. बहुतेक वेळा हे नुकसान मोजता येत नाही. मोजता न आल्यामुळे आपले किती नुकसान झालेले आहे, हे कळतही नाही. स्त्रियांना मागासलेले ठेवल्यामुळे समाजाची अर्धी बुद्धिमत्ता निरुपयोगी राहते. त्या बुद्धीचा समाजाला उपयोग झाला असता, पण ती वाया जाते. पुरुष बहुतांश वेळा स्वार्थी व आत्मकेंद्री असतो. स्त्री अधिक सामाजिक असते. यामुळे कुटुंबातला पुरुष शिकला तर कुटुंबातील एका व्यक्तीचा विकास होतो. मात्र स्त्री शिकली तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. अखंड कुटुंब शिक्षित होते. आपण हे ओळखले पाहिजे. स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीचे स्थान दिले पाहिजे.

 ----------------------------------------------------

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा