Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३

दहावी मराठी २०. सर्व विश्वचि व्हावे सुखी

 दहावी मराठी    २०.   सर्व विश्वचि व्हावे सुखी


कृती १ : (आकलन कृती) 

(१) चौकटी पूर्ण करा :

(1) संत ज्ञानेश्वर यांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेली विश्वप्रार्थना

- पसायदान 

--------------------------------------------

(२) पुढील काव्यपंक्तींचा अर्थ लिहा : 


 (i) जे खळांची व्यंकटी सांडो   - माणसांच्या मनातील दुष्ट भाव नष्ट होऊ दे.

 (ii) दुरितांचें तिमिर जावो    -  (दुरित म्हणजे दुष्कर्म.) सर्व      दुष्कर्मांचा अंधार नष्ट होऊ दे.

 -------------------------------------------------------------

  कृती ४ : (स्वमत/अभिव्यक्ती) 

 • सर्व संतांच्या प्रार्थनेमधील सामाईक सूत्र तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा. 

   उत्तर : सकाळी उठल्यावर किंवा घरातून बाहेर पडताना माणूस देवाच्या पाया पडतो आणि 'दिवस चांगला जाऊ दे; कोणत्याही अडचणी नको येऊ देत' अशी आळवणी करतो. रात्री झोपण्यापूर्वी देवाला नमस्कार करून दिवस चांगला गेल्याबद्दल त्याच्याजवळ कृतज्ञता व्यक्त करतो. खरे तर दिवसभरात कधीही संकट आले की, देवाची प्रार्थना करतो. नीट पाहिल्यावर लक्षात येईल की, प्रत्येक माणूस स्वत:साठी, स्वत:च्या कुटुंबीयांसाठी किंवा मित्रमंडळींसाठी देवाकडे याचना करतो. ही खूपच मर्यादित, वैयक्तिक व स्वार्थी प्रार्थना आहे. कारण सामान्य माणसे स्वत:पलीकडे पाहू शकत नाहीत.

संतांचे तसे नाही. त्यांना सर्व प्राणिमात्रांबद्दलच कळवळा वाटतो. त्यांच्या मनात आपपरभाव नसतो. त्यांना सर्व माणसे समान वाटतात; सारखीच प्रिय वाटतात. म्हणून संतमहात्मे सर्व मानवजातीचे कल्याण इच्छितात. म्हणूनच 'जो जे वांछील तो ते लाहो' असे ज्ञानदेव म्हणतात. नामदेवांना वाटते की, सर्वांच्या मनातला अहंकार नष्ट व्हावा. म्हणजे सगळेजण एकमेकाला स्वतःच्या हृदयात सामावून घेतील. संत एकनाथांना सर्वांच्याच ठिकाणी भगवद्भाव आढळतो. संत तुकाराम महाराज सर्वांनी एकमेकाला साहाय्य करीत परमेश्वर चरणांपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवतात. सर्वच संत स्वतःसाठी काहीही मागत नाहीत. ते समस्त मानवजातीसाठी, समस्त प्राणिमात्रांसाठी परमेश्वराकडे हात जोडून प्रार्थना करतात.

-------------------------------------------------

कृती १ : (आकलन कृती)

 (१) पुढील चौकटी पूर्ण करा :

(i) मानवी सुखदुःखाशी सहृदयतेने समरस होणे

 -   मैत्री 

-------------------------------

(ii) 'सर्वांभूती भगवद्भावो' अशी प्रार्थना करणारे संत

  - संत एकनाथ 

-------------------------------

(iii) सामाजिक प्रबोधनावर भर देणारे संत

  - संत गाडगे माहाराज 

------------------------------------------

(iv) संत तुकारामांचे जीवनसूत्र

- परस्पर सहकार्य 

----------------------------------------------------

(२) आकृत्या पूर्ण करा : 

(i) अपयशी माणसासाठी संतांनी केलेले मार्गदर्शन -

 - धर्मकृत्यांसाठी पैसे खर्च करण्याऐवजी तेच पैसे खर्च करून शिक्षण घ्यावे.

 - स्वतःच स्वतःचा उद्धार करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे.

 - सर्वांनी ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे.

 - नेहमी सत्य तेच मांडावे.

--------------------------------------------------------

(ii) संतांना माणसाकडून अपेक्षित असलेल्या आदर्श कृती-

- विनम्रता जोपासावी.

- सहृदय मनाने समरस झाले पाहिजे.

 - परस्पर सहकार्यातून मानवी जीवनाचे कल्याण साधावे.

  - अज्ञान नाहीसे करावे.

------------------------------------------

(iii) संतांनी सांगितलेले मैत्रीचे निकष-

 - सहृदय मनाने समरस होणे. 

 - दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानणे.

   - दुसऱ्यांच्या दुःखात त्याला आधार देणे.

   - आपपरभाव न मानणे.

------------------------------------------------------


• (३) पुढील तक्ता पूर्ण करा. त्यासाठी कंसातील शब्दांचा उपयोग करा : 

   (नम्रता, मैत्रभाव, विश्वकल्याण, स्वप्रयत्न, सहकार्य)

१) 

 काव्यांश         →     'सर्व विश्वचि व्हावे सुखी

संतांचे नाव     → संत तुकडोजी महाराज

व्यक्त भावना   →    विश्व कल्याण

------------------------------------

२) 

काव्यांश            →   'अहंकाराचा वारा न लागो राजसां '  

संतांचे नाव        →  संत नामदेव

व्यक्त भावना     →  नम्रता

--------------------------------------

३) 

काव्यांश            →  'सर्वांभूती भगवद्भावो' 

संतांचे नाव        →   संत एकनाथ

व्यक्त भावना     →    मैत्री भाव

----------------------------------

काव्यांश       →  'एक एका साह्य करूं। अवघे धरू सुपंथ'

संतांचे नाव      →  संत तुकाराम

व्यक्त भावना   →  सहकार्य

----------------------------------------

५) 

काव्यांश           →  'स्वत:चा उद्धार करा प्रयत्नाने '

संतांचे नाव        →   संत गाडगे माहाराज

व्यक्त भावना     →   स्वप्नयत्न

--------------------------------------------

कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती) 

•  भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ।' या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. 

    उत्तर : ही ओळ ऐकताच आपल्या सर्वांच्या मनात एक भाव नक्की जागा होतो. सर्वांना एकमेकांविषयी प्रेम वाटावे, जिव्हाळा निर्माण व्हावा अशी इच्छा ज्ञानदेव देवाकडे व्यक्त करतात. 

        या ओळीतील 'भूत, मैत्र आणि जीव' हे तीन शब्द खूप महत्त्वाचे आहेत. देह धारण करणारा प्रत्येकजण 'भूत' होय. म्हणून जगातली सगळी माणसे भूत होत. पण फक्त माणसेच नव्हेत, तर सूक्ष्मजीवांपासून ते हत्ती- गेंडे यांसारखे सर्व प्राणिमात्र भूत होत. तसेच वृक्षवेली यासुद्धा सजीवच आहेत. त्यासुद्धा भूत होत. या सर्वांच्या मनात एकमेकांबद्दल निर्मळ, पवित्र अशी प्रेमभावना निर्माण झाली पाहिजे, ही इच्छा ज्ञानदेव देवाजवळ व्यक्त करतात. जात, धर्म, भाषा, प्रांत वगैरे गोष्टींवरून आपण अनेकांना शत्रू समजतो. या भावना बाह्य गुणांवर अवलंबून आहेत. ज्ञानदेव या गोष्टींच्या पलीकडे जायला सांगतात. प्रत्येक जण सुखीच असेल. नेमकी हीच मागणी ज्ञानदेव विश्वात्मक देवाकडे करीत आहेत.

---------------------------------------------------

  या पाठातून तुम्ही काय शिकलात, ते तुमच्या शब्दांत लिहा. 

  उत्तर : सर्व संतांनी व्यापक दृष्टिकोन बाळगून लोकांना उपदेश केला आहे. सर्व लोकांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे. एकमेकांना, अडीअडचणीत असलेल्या सर्वांना मदत करावी. सर्वांमध्ये सहकार्याची भावना हवी. या तऱ्हेने सर्वजण वागू लागले, तर समाजात शांती नदिल. माणसे सुखासमाधानाने जगू लागतील. या अशा वातावरणातच माणसे प्रगती करू शकतात. अशा वातावरणात चोऱ्यामाऱ्या होणार नाहीत. दंगेधोपे होणार नाहीत. कोणाची पिळवणूक होणार नाही. कोणाची फसवणूक होणार नाही. कोणावर अन्याय होणार नाही. एकंदरीत, सर्व व्यवस्था ही न्यायावर आधारलेली राहील. म्हणून सर्वांनी एकोप्याने राहावे, असे सर्व संत सांगतात. इतरेजनांशी सहृदयतेने समरस झाले पाहिजे. सर्वांनी शिक्षण घेतले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. हा पाठ वाचून मला हाच संदेश मिळाला.------

--------------------------------------------------------------

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा