Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, १२ जुलै, २०२३

20 decem

 २० डिसेंबर

प्रार्थना लावियेला दीप प्रेमे, तेवता ठेवू चला.......


श्लोक-- 

विधेअंगी व्हावा विजय । विद्याकरी स्वतंत्र, निर्भय शिक्षणाने वाढावा निश्चय । जीवन जय कराव विद्येमुळे विनय निर्माण व्हावा, विद्येमुळे आपले व्यक्तिमत्व स्वतंत्र व निर्भय बनले पाहिजे. शिक्षणाने 


→ चिंतन 

- मुलांच्य शिक्षणापेक्षा मुलींच्या शिक्षणाला मी प्राधान्य देईन. कारण एक मुलगी शिकली तिच्याद्वारे एक कुटुंब सुशिक्षित होते. कमी वेळात व कमी खर्चात राष्ट्र शिक्षित करण्याचा हा खात्रीलायक उपाय आहे. - 


कथाकथन

लोककल्याणकारी संत गाडगेमहाराज (जन्म २३ १८७६ मृत्यू २० डिसें. १९५६)श्री विदर्भातील कोते या खेडेगावी झाला. ते परीट समाजातील होते. गाडगेमहाराजांनी वयाच्या ८ व्या वर्षापासून आपल्या घरात विपन्न परिस्थिती समाजाच्या मागासलेपणाचे, समाजाच्या अडाणीपणाचे निरीक्षण केले. महाराजांनी आपल्या मामाची शेती स्वतःच्या अपरिमित परिश्रमांतून फुलवून ज्ञान, दारिद्रय, अंधश्रध्दा असलेल्या आपल्या समाजापुढे आपल्या श्रमाचा आदर्श ठेवला. गाडगेमहाराज कठोर परिश्रम करून जीवन जगत होते. एके दिवशी एक जटाधारी तेजस्वी योग्याने शेतात येऊन त्यांना प्रसाद दिला. रात्रभर त्यांना स्मशानात बसवून घेऊन आपली पारमार्थिक साधना त्यांनी गाडगेमहाराजांना गाडगेमहाराजांना त्या जटाधारी योग्याने देवीदास म्हणून संबोधले. एके दिवशी रात्रीच्या वेळी सर्व झोपी गेले असता सर्वस्वाचा त्याग करून ते निघून गेले. गाडगेमहाराजांनी १२ वर्षे अज्ञातवासात काढली. नंतर आपले तन, मन, धन जनसेवेत वेचण्यासाठी, लोककल्याणासाठी त्यांनी कठोर तप आचरिले. या काळात गाडगेमहाराजांनी कंदान्न सेवन करून, चिंध्या पांघरून मस्तकी गाडगे धारण करून देहश्रमाची पराकाष्ठा केली. लोक त्यांना गाडगेबाबा, गाडगेमहाराज म्हणून आदराने हाका मारु लागले, लोकजीवन तेजाने उजळण्यासाठी हातीच्या खराट्याने गावाचे रस्ते झाडीत ते महाराष्ट्रात सर्वत्र फिरले. विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून त्यांनी लोकांची मने स्वच्छ केली. खेडोपाडी, शहरोशहरी जाऊन कीर्तने केली. शिक्षणाचे महत्व गाडगेमहाराजांनी लोकांना पटवून दिले. साक्षरतेचा प्रचार केल्स. प्रसार केला. महाराज म्हणजे लोकजागृती साधणारे एक फिरते विद्यापीठ होते. गाडगेमहाराज जास्त शिकलेले नव्हते; परंतु संतांचे अभंग त्यांना तोंडपाठ होते. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला' असा गजर केल्यानंतर लगेच हरिपाठ म्हणत


सुविचार - 

● देव हा मातीच्या मूती नसून तो माणसात पाहावा. • सहानुभूतीच्या हजार शब्दा मदतीया एक • कोणताही सदविचार किया कल्पना तुमच्या वितात उगम पावली तर तारान • स्वता, झीज सोसणे, सुख-दुःखात भागीदारी, उदारपणा, सत्येपणा, शोषक वी बुद्धी, आत्मविश्वास है या - 


दिनविशेष - 

• संत गाडगेबाबा स्मृतिदिन - १९५६. आधुनिक युगाचे सेवाधर्मी संत म्हणजे एक त्यांचा जन्म झाला. कोणत्याही शाळेत जाऊन त्यांनी शिक्षण घेतले नाही. हे जग म्हणजेच मोठे पुस्तक आहे. ते वाचतात सेवा हा त्यांचा धर्म होता. हाती खराटा घेऊन साफसफाई करणे आणि देवकीनंदन गोपा करणे हे गाडगेबाबांचे व्रत. ते पुरे करण्यासाठी गाडगेबाबा जन्मभर झगडले. अज्ञान, अंधश्रद्धा, व्यसनीपणा, अस्वच्छता, भेदाभेद यावर त्यांनी कीर हल्ला केला. शिक्षण, स्वच्छता, समाजसेवा, धर्मार्थ दवाखाने, विद्यार्थ्यासाठी वसतिगृहे, धर्मशाळा अनेक सामाजिक कार्यात प्रत्यक्ष अनेकांना भाग घेण्यास उद्युक्त केले. आपल्या पायाला कोणालाही स्पर्श करू दिल नाही. अंतर्बाह्य निर्मक पुरुष असेच त्यांन | मुक्ती हाच गाडगेबाबांच्या जीवनाचा मूलमंत्र होता. २० डिसेंबर १९५६ रोजी प्रवासात असतानाच त्यांना मृत्यू आला. 'मी इस्पितळात पडून मरणार नाही. रस्त्यात मरेन' ही त्यांची नेहमीची उक्ती सार्थ झाली. (मोळी विका पण शाळा शिका. संत गाडगेबाबा 

• 

मूल्ये 

शुचिता, स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन, समानता. 


→अन्य घटना

 शास्त्रसुधारक विष्णू वामन बापट स्मृतिदिन १९३३ 


+उपक्रम 

+दररोज वर्ग, शाळा, साफसफाई करणे. गाडगेबाबांची शिकवण आचरणात

 


समूहगान - 

• मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे बसंती चोला... 


→ सामान्यज्ञान 

• प्लॅस्टिकच्या पिशवीतून रोपे लावण्याची पध्दत सर्रास वापरली जाते. परंतु शहाळ्यातून रोपे लावण्याने पर्यावरण संरक्षण होते. शहाळ्याच्या बाहेर भाग तंतुमय असल्याने पाणी हळूहळू आत झिरपते व आतील भागातील आर्द्रता कमी होत नाही. रोपे शहाळ्यासकट रोवली असता. बाहेरचे कवच जमिनीत मिसळून जाते. शहाळ्याच्या बाहेरच्या तंतुमय भागाचा ठिंबक सिंचनाप्रमाणे उपयोग होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा