Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२०

इयत्ता सहावी, भूगोल,५.तापमान

                   तापमान

प्रश्न १. पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा :
 (१) समुद्रकिनारी भागात तापमान सम असते.
 उत्तर : (१) समुद्रकिनारी भागात बाष्पाचे प्रमाण अधिक असते. (२) बाष्प हवेतील तापमान साठवू शकते. (३) त्यामुळे समुद्रकिनारी भागात दिवसभराच्या कमाल व किमान तापमानात मोठा बदल होत नाही. त्यामुळे समुद्रकिनारी भागात दिवसभराच्या कमाल व किमान तापमानात मोठा बदल होत नाही. म्हणून समुद्रकिनारी भागात तापमान सम असते.

 (२) खंडांतर्गत भागात तापमान विषम असते.
 उत्तर : (१) खंडांतर्गत भागात बाष्पाचे प्रमाण कमी असते. म्हणजेच तेथे हवा कोरडी राहते. (२) त्यामुळे खंडांतर्गत भागात दिवसभराच्या कमाल व किमान तापमानात मोठा बदल होतो. म्हणून खंडांतर्गत भागात तापमान विषम असते.

 (३) उत्तर गोलार्धात समताप रेषांमधील अंतर कमी-जास्त झालेले आढळते. 
उत्तर : (१) उत्तर गोलार्धात जमिनीचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. (२) उत्तर गोलार्धात अक्षांश व जमिनीचे प्रमाण या दोन्ही घटकांचा परिणाम तापमानाच्या वितरणावर होतो. म्हणून उत्तर गोलार्धात समताप रेषांमधील अंतर कमी-जास्त झालेले आढळते.

(४) उष्ण व शीत सागरी प्रवाह जेथे एकत्र येतात; त्या भागात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. 
उत्तर : (१) उष्ण व शीत सागरी प्रवाह जेथे एकत्र येतात; त्या भागात प्लवंक हे माशांचे खाद्य मोठ्या प्रमाणात वाढते. (२) त्यामुळे अशा प्रदेशात मासे मोठ्या प्रमाणावर येतात. म्हणून उष्ण व शीत सागरी प्रवाह जेथे एकत्र येतात; त्या भागात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. 

(५) पृथ्वीचे तापमान वाढत आहे. 
उत्तर : (१) वातावरणातील अॅरगॉन, कार्बन डायऑक्साइड इत्यादी वायू हे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता दीर्घकाळ स्वत:मध्ये सामावून ठेवू शकतात. (२) या वायूंना 'हरितगृह वायू' म्हणतात. या वायूंमुळे वातावरणातील हवेचे तापमान वाढते. (३) वाढते नागरीकीकरण व औद्योगिकीकरण व कमी होणारे वनाच्छादन यांमुळे हरितगृह वायूंचे प्रमाण वाढत आहे. म्हणून वाढत आहे पृथ्वीचे तापमान.


1 टिप्पणी: