Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

इयत्ता दहावी, मराठी,७.गवताचे पाते

                        गवताचे पाते गवताचे पाते



हिवाळा नुकताच सुरू झालेला होता.

झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. 

पट...पट...पट...

त्यांचा तो पट...पट...असा कर्णकटू आवाज...

तो आवाज ऐकून धरणीमातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. 

गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले,

‘‘पडता पडता किती कटकट करतोयस तू? तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड 

स्वप्नांचा चुराडा झाला की!’’

पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, ‘‘अरे जा! चिडखोर बिब्बा कुठला! मातीत जन्मून 

मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची 

कल्पना कशी येणार? हा दंगा नाही, बेटा! हे गाणं चाललंय! जन्मात कधी आ न करणाऱ्या

तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही!’’ हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि

धरणीमातेच्या कुशीत झोपी गेले.

ते पुन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने! त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या

जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. 

थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणीमातेच्या कुशीत लपू लागले-झोपू लागले. पण पुन:पुन्हा

त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती...पट पट असा आवाज 

करीत पृथ्वीवर पडत होती!

ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वत:शीच पुटपुटले, ‘काय ही हिवाळ्यातली पानं! 

जीव खाऊन टाकला यांनी अगदी! केवढा हा कर्णकटू आवाज...छी छी छी! माझ्या साऱ्या गोड 

गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला यांनी!


रूपक कथेचा भावार्थ;

अगदी साध्यासुध्या अशा नैसर्गिक गोष्टींतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्यया

कथेत सुंदर रीतीने प्रगट झाले आहे. गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची 

चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात. दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे; पण झाडावरून गळून 

पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानाचा

आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातेही करत सुटते.

मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत. तरुण पिढीच्या 

बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? आठवण करून 

घेऊन मग तरुणांवर तोंडसुख घेण्याची तयारी दर्शवते काय?

...आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय

करते? तीही जुना कित्ताच गिरवत बसते! बाह्य स्वरूप कितीही बदलले, तरी त्याच त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत 

असलेली दिसते अाणि पिढीतील अंतर कायम राहते. 

दुसऱ्याच्या जागी स्वत:ला कल्पून त्याचे सुखदु:ख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची 

प्रवृत्तीच मनुष्यात नाही. मालक आणि मजूर यादोघांच्या स्थानांची अदलाबदल केली, तर त्यांच्या स्वभावात काही बदल 

होईल का?


'गवताचे पाते' या रूपक कथेवरील ऑनलाइन चाचणी सोडविण्यासाठी येथे क्लिक करा





वरील उतारा वाचा आणि दिलेल्या सुचना नुसार कृती करा

कृती-१

आकृत्या पूर्ण करा:

i)पानाची स्वभाव वैशिष्टये:

१) पान उच्च पदाचा खोटा अभिमान वाढते खोटा अभिमान वाढते .

२)गवत पात्याला शूद्र मानते.


ii) गवताच्या पात्या साठी पाठात आलेले शब्द व शब्द समूह समूह शब्द समूह 

चिमणे, चिडखोर बिब्बा, क्षुद्र, अरसिक चिमुकले


(२) नावे लिहा:

 (i) झाडावरून गळून पडणारी -पिकलेली पाने

(ii) कर्णकटू आवाजाने जागे होणारे -गवतपाते

(ii) पानाने गवतपात्याला दिलेली उपमा-चिडखोर बिब्बा

 (iv) संजीवक स्पर्शाने गवतपात्याला जागे करणारे-वसंतऋतु

 (v) नव्या गवतपात्याचा जीव खाऊन टाकणारी-गळणारी पाने


कृती २ : (आकलन कृती) 

(१) रिकाम्या चौकटी भरा : 

(i) गवतपात्याने उराशी बाळगलेली भावना -उच्च पदाचा खोटा अभिमान

(ii) सुंदर स्वप्नांमध्ये दंग असणारे- गवतपाते

 (iii) तरुण पिढी बेजबाबदार आहे, असे मानणारी -वडील पिढी

(iv) वडील पिढी कटकटी असते, असे मानणारी-तरुण पिढी


रूपक कथेची वैशिष्ट्ये 

रूपककथा आकाराने लहान

आशयसमृद्धी 

सूचकता →

 नाट्यात्मकता, आलंकारिकता आणि संदेशपरता

 वाच्यार्थ क्षणोक्षणी कमी कमी होत जाऊन लक्ष्यार्थ प्रभावीपणे सूचित होतो.


 गवतपात्याची स्वभाववैशिष्ट्ये 

निवांत झोपता येणे आणि झोपेत सुखस्वप्ने पाहणे हेच सर्वोच्च सुख, गवतपाते मानते.

 सुखस्वप्ने भंग पावल्याची सतत तक्रार करते. 

चिडखोर. 

गळणारे पान व गवतपाते यांच्यात एकच जीवनरस आहे, हे वास्तव गवतपाते समजून घेत नाही. 


(३) (i) झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्याने गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली; कारण त्याची झोपमोड होऊन त्याच्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला होता.

 (ii) अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही,' असे गळून पडणारे पान म्हणाले; कारण त्याने आयुष्यात गाणे म्हणण्यासाठी कधी 'सुद्धा केला नव्हता. 

iii) वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या संजीवक स्पर्शामध्ये विलक्षण जादू होती.


कृती ३ : (व्याकरण कृती) 

(१) पुढील शब्दांच्या अर्थछटा व्यक्त करणारे शब्द लिहा : (प्रत्येकी ४) 

उत्तरे

(१) (i) कर्णकटू: कर्कश, भसाडा, कर्णकठोर, बेसूर. 


(ii) कटकट कटकट, पिटपिट, किरकिर, भुणभुण. 

(iii) चिडखोर चिडका, चिडचिडा, चिरचिरा, रागीट. 

(iv) चिमुकला: चिमणा, चिटुकला, सानुला, चिमुरडा. 

(v) क्षुद्र: क्षुल्लक, क.पदार्थ, कस्पटासमान, हीन.


 (२) मोठा आवाज व्यक्त करणारे चार शब्द लिहा.

(२) (i) घडामधुडुम (ii) दणदणाट (ii) खणखणाट (iv) घणघणाट


 (३) मंजूळ आवाज व्यक्त करणारे चार शब्द लिहा.

(३) (1) रुणझुण (ii) छुमछुम (iii) कुहू कुहू (iv) किलबिल,



 (४) पुढील शब्दांसाठी तुमच्या मते, योग्य अशी प्रत्येकी दोन विशेषणे लिहा:

(i) थंडी : गुलाबी, झोंबरी. (ii) ऊन रणरणते, दाहक. 

(ii) पाऊस : मुसळधार, रिमझिम, 


 (५) पुढील नामांसाठी पाठातील विशेषणे शोधा

(i) फळे: पिकलेली (iii) आंबा गोड (६) १. (i) समाप्ती x शेवट (ii) संगीत (iv) मंत्र:संजीवक


(६) पुढील गटांमधील (ii) संगीत (iv) मंत्र कोणती जोडी विरुद्धार्थी नाही? 

१. (i) आरंभ x अखेर , उदय×अस्त

(ii) सुरुवात x सांगता, समाप्ती×शेवट

उत्तर-समाप्ती×शेवट


२. (i) राग x प्रेम , संताप× माया

(iii) कोप x ममता , तिडिक × रोष

उत्तर-तिडिक × रोष


३.(i) असत्य x सत्य 

(ii) लबाडी× प्रामाणिकपणा

(iii) फसवेगिरी x प्रतारणा

(iv) खरेपणा xखोटेपणा 

उत्तर- फसवेगिरी x प्रतारणा


कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती) 

(१) तरुण पिढी व वडील पिढी यांची स्वभाववैशिष्ट्ये पाठाच्या आधारे लिहा. उत्तर : तरुण पिढीचे नेहमी असेच असते. आत्ता या क्षणी जे दिसते, वाटते, तेच खरे. वर्तमानकाळ हाच खरा. उद्या-परवा कायहोईस ते महत्वाचे नाही. जे जे वाटते ते ते उत्स्फूर्तपणे कराते वडील पिवीलाहे असे वागणे पटत नाही. आणि म्हणून तरुणांना वडील पिडी अडथळाच वाटतो त्यांची कटकट वारे वडील पितीला वाटते की, तरुण पिढी फक्त मोजमजा करण्यात मुखविलासात लोळण्यात पन्यता मानते. आयुष्याचा खरा अर्थ तरुणांना कळलेला नसतो. मात्र, आपण तरुण असताना काय करीत होतो, हे प्रोवांना आठवत नाही. किंबहुना ते लक्षात घ्यायचा का तयारी नसते. नेमके हेच आता तरुण असलेल्यांच्या बावतोतही वडील पिडीविरुद्ध तक्रार करणारे तरुण जेव्हा आईबाबा होतात े ते स्वतःच्या मुलांशी वडील पिढीप्रमाणेच वागतात, म्हणजे येरे म मागल्या।' असे असूनही कोणीही वास्तव शोधण्याचा प्रयत्न कों नाही. (२) माणसातील ठरावीक मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असते, हे विधान पाठाच्या आधारे स्पष्ट करा. उत्तर : माणसाच्या स्वभावाची एक गंमतच आहे. आमच्या शेजारच्या वासंती काकू त्यांच्या मुलीला सातच्या आत घरात यायला लावतात. "तुम्ही मैत्रिणी कसल्या ग एवढ्या गप्पा मारता हो त्यांचा प्रश्न असतो. माझी आजी सांगते, "ही वासंती संध्याकाळी मैत्रिणी गप्पा मारताना आईने घरी बोलावले की भडकवायची" है दृश्य सगळ्याच घरांत दिसते. आपल्या मुलाने सकाळी लवका उठावे, व्यायाम करावा, नियमित अभ्यास करावा. त्याने चांगल्या मुलांचीच संगत करावी. परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवावेत. वगैरे वगैरे, असे प्रत्येक आईवाबांना वाटते. पण या आईबावांनी त्यांच्या तरुणपणी असे काहीही केलेले नसते. त्या काळात त्यांच्या आईबाबांनी परलेले असले आग्रह यांनी उधळून लावले होते मात्र हे आजच, आधुनिक काळातच, घडते असे नाही जगभर सर्व मानवी समाजांत हेच घडत आलेले आहे. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य आणि नंतर मृत्यू हे चक्र अव्याहत पृथ्वीच्या निर्मितीपासूनच चालू आहे. प्रत्येकजण स्वतःच्या जागेवरून जगाकडे बघत असतो तिथून जग जसे दिसते, तसे आणि तेवढेच खरे आहे, असे तो मानतो म्हणून प्रत्येक पिढीत ते आणि तसेच घडत राहते बारंवा (३) गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता, तर पानाला तुम्ही काय उत्तर दिले असते? उत्तर : मी गवतपाते असतो, तर गळून पडणाऱ्या पानाला पुढीलप्रमाणे माझे म्हणणे सांगितले असते "आजोबा, आपण दोघेही अकारण भांडत आहोत. काय झाले ते पाहा. तुम्ही गिरक्या घेत घेत खाली आलात. त्या वेळी खूप आवाज झाला आणि माझी झोपमोड झाली. मला राग आला आणि तुम्हांला मी रागाने लागेल असे काहीतरी बोललो. तुम्हीसुद्धा मला चिडखोर बिच्या म्हणातात. मला अरसिक म्हणालात. पण मी थोडा अंतर्मुख झालो. विचार केला. माझ्या लक्षात आले की आपण

মिच्या कारणाने भांडत आहोत. आपल्या दोघांचेही दृष्टिकोन भिन्न आहेत. त्यामुळे आपले विचार भिन्न आहेत. आपणा प्रत्येकाला स्वत:च बरोबर आहे, असे वाटते. समोरचा चुकीचा आहे असे वाटते आता हेच पाहा ना. तुम्ही जमिनीपासून उंचावर राहता तुम्हाला दूरदरचा परिसर उंचावरून दिसतो भोवतालच्या परिसराच्या दर्शनाचा आनंद घेता येतो. त्यामुळे तुमाला तुम्ही श्रेष्ठ आहात असे वाटते आम्ही मातीत लोळत राहतो म्हणून आम्ही कमी दर्जाचे आहोत, असे तुम्हाला वाटते. पण आजोबा. आम्ही आत्ता या क्षणी मनसोक्त जगतो. तुम्ही उदयाचा विचार करीत राहता आणि आजचा आनंद गमावता. आपण दोघेही जण आपापल्या जागी बरोबर आहोत आपण दुसऱ्याची स्थिती लक्षात घेतली पाहिजे मग आपल्याला दोघांच्याही भूमिका कळतील आणि आपण भांडत बसणार नाही. आता हे सगळे राहू दया. तुम्ही सांभाळून सांभाळून चाला स्वतःच्या प्रकृतीला जपा. (४) गवताचे पाते व पान यांच्या स्वभाववैशिष्ट्यांत बदल झाला आहे, अशी कल्पना करून कथेचे पुन्लेखन करा. उत्तर : हिवाळा नुकताच सुरू झाला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली, पट पट.. पट. त्यांचा तो पट. पट पट असा कर्णकटू आवाज तो आवाज ऐकून घरणीमातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, "अहो आजोबा आजोबा, केवड्याने पडला। लागलंबिगलं तर नाही ना? पानाला बरे वाटले प्रेमळपणे म्हणाले, "काय रे बाळा? तुला त्रास झाला का रे? "छे, छे, आजोबा. तुम्ही ठीक आहात ना?" "काय सांगू बाळा! इतका झकास तरंगत येताना सारखे वाटत होते की असेच खूप बेळ सुखाने तरंगत राहावे. पण आता वय झाले ना! काय करणार? असे का बोलता? वय झालं म्हणता, पण तरुणांपेक्षाही तुमचे मन तरुण आहे. किती आनंदात आहात तुम्ही।" हे ऐकत ऐकत ते पान आनंदाने मातीत मिसळले. ते पुन्हा जागे झाले. ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने। त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या


चिमुकल्या पाण्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला पाते संताने कुडकुडत होते ते धरणी मातेच्या कुशीत लपू लागलं, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडेतिकडे झाडावर पाने सळसळत होती पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पाहत होती। ते गवताचे पाते लगयगीने उठले स्वत शौच पुटपुटले आज दुसरे आजोबा खाली आता वाटतं. चला बसा पटापट यायला हव एखादया आजोबांना मदतीची गरज असेल कदाचित। (५) पुढे दिलेल्या रूपककधेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा. (ही रूपककथा पाठयपुस्तक पृष्ठ क्र. २६ वर पाहावो ) (टीप: रूपक कथेचा भावार्थ परीक्षेकरिता समाविष्ट केलेला असल्याने तोही पाठाचा भाग म्हणून अभ्यासावा.) उत्तर संपूर्ण जीवनाचे मर्म सांगणारी रूपककथा आहे हो लहान रोपट्याला आपण शेजारच्या वृक्षाप्रमाणे उंच भल्य व्हावे असे वाटत असते लहान असल्यामुळे त्याला भव्यता लाभत नाही दुबळेपणा, क्षुद्रपणा पदरो येतो. मोठेपणाचे सुख लाभत नाही म्हणून रोपटे शेजारच्या उंच वृक्षाकडे स्वतः मोठे होण्याची इच्छा व्यक्त करते. लहान लहान झाडेसुद्धा सुंदर असतात हे वास्तव उंच वृक्ष रोपट्याला समजावून सांगू पाहतो. रोपट्याला ते पटत नाही. उंच वाढणे हे सुद्धा सुंदर असते, ही रोपट्याची समजूत असते वृक्षाला तेवढ्यात कुन्हाड घेऊन येणारा लाकूडतोड्या दिसतो म्हणजे मोठ्या वृक्षाचा मृत्यू चालून येत होता. उंच व मोठा असल्यामुळेच त्याच्यावर मृत्यू ओढवला होता. रोपाला कोणीही हात लावत नाही लहानपणातच सुख असते. मोठेपणात यातना असतात. हे येथे लक्षात येते. तसे पाहिले तर रोप-वृक्षाची ही कथा प्रत्यक्ष जीवनात वेगवेगळ्या रूपांत अवतरताना दिसते लहान मुलांना मोठे व्हावेसे वाटते. मोठ्या माणसांना काहीही करण्याचे, कुठेही जाण्याचे स्वातंत्र असते मुलांवर बंधने असतात. थोडे बारकाईने पाहिले तर मोठ्यांना लाभणारे स्वातंत्र्य भ्रामक असते. मोठ्यांना पोट भरण्यासाठी कामधंदा करावा लागतो. या काळात स्वातंत्र्य बाजूला ठेवावे लागते. मोठ्या माणसांना कायदेकानून, नीती-नियम पाळावे लागतात. पेसा खूप मिळाल्यावर सर्व सुखे उपभोगता येतील, असे सर्वांना वाटत असते. प्रत्यक्षात मात्र स्थिती उलटी असते. खूप पैसे मिळाल्यावर ते पैसे सुरक्षित ठेवण्याच्या चिंतेने माणूस घेरला जातो. रस्त्याच्या फुटपाथवर झोपणान्या माणसाला कोणी चोर येऊन चोरी करील, अशी भीती नसते. पण बगला बांघलेला माणूस सभोवती भक्कम भिंत बांधून पेतो दारावर पहारेकरी ठेवतो यावा अर्थ खूप पैसे मिळाल्यावर सुख मिळते हे खरे नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा